शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उत्तरा-पूर्वा, हस्त नक्षत्रांत पाऊस पडेल

By admin | Updated: February 16, 2017 02:56 IST

यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी

खळद : यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी यांच्यामागची रोगराई हटेल; पण माणसाला मात्र साधारण रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक (भविष्यवाणी) आज पंचामीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक यात्रेत देवाचे मानकरी तात्या बुरुंगले यांनी केली. श्रीक्षेत्र वीर येथे शुक्रवार (दि. १०) माघ शु. पौर्णिमेपासून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दहा दिवसांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. आजपासून पंचमीच्या दिवशी भाकणुकीला, नवसाचे व कुळाचाराप्रमाणे गज-गोपाळ (जेवण) घालण्यास सुरुवात झाली. तर, उद्यापासून मारामारीपर्यंत तात्या बुरुंगले, दादा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक होईल.आज पहाटे ४ वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता दर्शनासाठी पुन्हा तो खुला करण्यात आला. ११ वाजता विश्रांतीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. ११.३० वाजता दर्शनासाठी पुन्हा खुला करण्यात आला. एक वाजण्याच्या सुमारास मानाच्या कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई, सोनवडी या पालख्या व २२ काठ्या देऊळवाड्यात आल्या. एका कोपऱ्यात सव्वा महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात एक महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात पाऊण महिन्याचा खडा पडेल तर एक ा कोपऱ्यात बळीच्या घासाला पुरणार नाही. एका कोपऱ्यात सव्वा शेर उत्पन्न निघेल, एका कोपऱ्यात एक शेर उपन्न निघेल, एका कोपऱ्यात पाऊण शेर उपन्न निघेल. तर, एका कोपऱ्यात दुष्काळ पडेल व ज्याची गादी त्याला मिळेल. गादीचा मालक गादीवर येईल. गाईगुरांना, शेळ्यामेंढ्यांची रोगराई हटेल व मनुष्याच्या मागे मात्र खातापिता आटापिटा राहील, अशी भविष्यवाणी या वेळी करण्यात आली.मंगळवार (दि.२१) माघ वद्य दशमी (मारामारी) हा यात्रेचा शेवटचा मुख्य दिवस आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. त्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे देवस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर यांनी सांगितले.