शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

पालखीतून थर्माकोल, प्लॅस्टिक हद्दपार, पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 1:39 AM

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीहि सुस्वरे आळविती तुका म्हणे होय मानसी संवाद आपुलाची वाद आपणासी या अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती.

- प्रशांत ननवरेवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेपक्षीहि सुस्वरे आळवितीतुका म्हणे होय मानसी संवादआपुलाची वाद आपणासीया अभंगाद्वारे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी सुमारे ४०० वर्षांपूर्वी निसर्गाचे महत्व विशद केले आहे. त्यांना त्या काळातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रकर्षाने झाली होती. वरील अभंगाद्वारे तुकोबांनी अधोरेखित केलेले पर्यावरण जपण्याचे केलेले आवाहन दुर्लक्षित करुन चालणार नाही. राज्य शासनाने केलेली प्लॅस्टिकबंदी यंदा संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांनी जपली आहे. दिंड्यांमधुन थर्माकोल, प्लॅस्टिकच्या थाळ्या वाट्यांना मूठमाती देण्यात आली आहे. पारंपरिक द्रोण पत्रावळ्यांचा वापर सुरु सोहळ्यात झाला आहे. याबाबत पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना माहिती दिली.सोहळाप्रमुख मोरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, ४०० वर्षांपूर्वी संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांना पर्यावरणाचे महत्व समजले होते. त्यांनी त्यावेळी रचलेल्या अभंगांतून याबाबत माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीचे संस्थानासह वारकरी भाविकांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. पावसापासून वापरण्यात येणारा कागद वगळता सोहळ्यात वारकरी भाविकांनी प्लॅस्टिकबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. त्यासाठी जेवण, अल्पोपहार करण्यासाठी वापरात असणारी प्लॅस्टीक आणि थर्माकोलची ताटे पुर्णपणे वापर थांबविण्यात आला आहे. तसेच, सक्षम दिंड्यांमध्ये स्टील ताटे, वाट्यांचा वापर करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी पारंपरिक पत्रावळ्यांचा वापर करीत आहेत.संत तुकाराम महाराज यांचा यंदाचा ३३३ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी वारीमध्ये ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तर ३ .५० ते ३.७५ लाख वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ््यासोबत चालत आहेत. निर्मल वारी अभियानाचे देखील संस्थानाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या सुविधेमुळे उघड्यावर शौचास जाण्याचे प्रमाण थांबले आहे. प्रत्येक ठीकाणी २५ एकराचा पालखी तळ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व दिंड्या एकत्रित केंद्रीत होण्यास मदत होईल. गेल्या दोन वर्षांपासुन याबाबत पाठपुरावा सुरु आहे. त्यापैकी पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर, अंथुर्णेसह अकलुजच्या पुढील मुक्कामी असणाऱ्या बोरगांव येथे जागा मिळाल्या आहेत.शासनाकडे मागणी केल्याप्रमाणे प्रत्येक तळावर सगळ्या विभागाचे अधिकारी उपलब्ध आहेत. त्या सर्वांकडे वॉकीटॉकी उपलब्ध आहेत. त्यामुळे जलद गतीने समन्वय साधुन कोणतीली समस्या सोडविण्यास मदत होते. शासनाच्या वतीने सोयीसुविधांबाबत चांगला पाठपुरावा सुरु आहे, असे सोहळा प्रमुख मोरे यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीPandharpur Wariपंढरपूर वारी