शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू
2
LOC वर ६९ लॉन्चिंग पॅड, १५० दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; भारत पुन्हा 'ऑपरेशन सिंदूर' राबवणार?
3
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट पुन्हा विक्रीसाठी! १.१७ कोटींची बोली लावणाऱ्याचं पुढे काय झालं?
4
ठाण्यातील बेकायदा बांधकामे आतापर्यंत का पाडली नाहीत? बाळकुम, येऊरबाबत हायकोर्टाची विचारणा
5
Karad Bus Accident: कराड जवळ नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; २० फूट खड्ड्यात सहलीची बस कोसळली, ४५ जण जखमी
6
आता आणखी एका सरकारी बँकेतील हिस्सा विकणार सरकार; कोणती आहे बँक, किती कमाई होणार?
7
RSS मुख्यालयाच्या पार्किंगसाठी प्राचीन मंदिरावर बुलडोझर?; स्थानिकांचा आक्रोश, लोक संतापले
8
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजार; ८७ अंकांनी घसरुन २६,०८८ वर उघडला निफ्टी
9
इंजिनीअर तरुणीही रील्स स्टारच्या जाळ्यात; लग्नाच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक
10
अचानक बोगद्यात बंद पडली मेट्रो, लाईटही गेली; प्रवाशांनी मोबाईलचा टॉर्च लावून गाठलं पुढचं स्टेशन!
11
ट्रॉम्बे बनाना म्युटंट-९! 'टेरेस'वरच पिकवा केळी; दीड महिन्यात तयार!
12
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, पोलिसांसमोर त्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
मजा! सोहम-पूजा आज सप्तपदी घेणार, हळद-संगीत फंक्शनमध्ये नवरीच्या डान्सवर खिळल्या नजरा
14
Raj Nidimoru Net Worth: 'द फॅमिली मॅन'चे दिग्दर्शक राज निदिमोरु किती आहेत श्रीमंत? चुपचाप केलं असं काम की होतेय चर्चा?
15
Video: मालवणात मध्यरात्री हायव्हॉल्टेज ड्रामा; भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये सापडली लाखोंची रोकड?
16
पाकिस्तानी विमाने भारतीय हवाई हद्दीत उड्डाण करतील, पाकिस्तानचा अजेंडा ४ तासांत उद्ध्वस्त
17
प्रभादेवी पूल पाडकामासाठी १५ तास ब्लॉक कसा घ्यावा? 'मध्य'ला प्रश्नः ४० एक्सप्रेस १२५० लोकलवर प्रभाव
18
Sanchar Saathi: 'संचार साथी'वर संशयाचे ढग! ॲपच्या अनिवार्यतेवरून विरोधकांनी उठवले रान!
19
Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान
20
सूरज चव्हाणच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर रुग्णालयात दाखल, फोटो शेअर करत म्हणाली - "नजर..."
Daily Top 2Weekly Top 5

मास्कचा योग्य वापर करा अन‌् संसर्गजन्य आजारांना दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST

हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा ...

हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा तब्येतीच्या तक्रारी उद‌्भवू लागतात. त्यामुळे डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या काळात वाढते. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. यंदा मात्र रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मास्कचा वापर आजारांचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. नलिनी भोसले म्हणाल्या, ''मास्कचा वापर हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. लोकांनाही मास्कच्या वापराचे फायदे आणि महत्व बऱ्यापैकी समजले आहे. कोणत्याही विषाणूचा शरीरात शिरकाव सर्वसाधारणपणे नाक किंवा तोंडातून येतो. एखाद्या आजाराचा प्रादुर्भावही खोकला, शिंक, थुंकी इत्यादी माध्यमातून होतो. मास्कच्या वापरामुळे तोंड आणि नाक कायम झाकलेले राहत आहे. त्यामुळे धूलिकण अथवा विषाणू कमी प्रमाणात शरीरात प्रवेश करतात. म्हणूनच कोरोना काळात इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण कमी प्रमाणात पहायला मिळत आहेत. भारतासारख्या कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या देशात सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात नाही. अशा परिस्थितीत किमान दर्जेदार मास्कचा योग्य वापर अत्यंत आवश्यक आहे.''

''कोरोनाच्या भीतीने नागरिकांच्या आहारशैलीत, जीवनशैलीतही बदल झाला आहे. व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून आरोग्य उत्तम राखण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आयुर्वेदिक उपायांचा घरोघरी नियमितपणे अवलंब केला जात आहे. त्यामुळेही दर वर्षीच्या तुलनेत यंदा संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लोकांनी कोरोनाची साथ ओसरली आहे, या भ्रमात न राहता मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या नियमांचे कायमस्वरूपी पालन करायला हवे, असे आवाहन कन्सलटिंग फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी केले.

----

कसा वापरावा मास्क ?

- दररोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा.

- आपल्याकडे अनेक लोकांना अद्याप मास्क वापरण्याचे तंत्र कळलेले नाही. अनेकदा लोक एकटे असताना, एकट्याने प्रवास करताना नाक आणि तोंड झाकले जाईल अशा योग्य पद्धतीने मास्क वापरतात. मात्र दुकानात गेल्यावर अथवा कोणालाही भेटल्यावर तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बोलायला सुरुवात करतात. अशाने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढते.

- मास्कने कायम आपले नाक आणि तोंड पूर्ण झाकलेले असले पाहिजे. मास्कचा दर्जाही चांगल्या पद्धतीचा असावा.

- दोन मास्क वापरताना एक नाका-तोंडावर आणि दुसरा हनुवटीवर अशा पद्धतीने घातलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

- सर्जिकल मास्क आणि एन नाईंटी फाईव्ह मास्क वापरण्याने बराच फायदा होतो. खूप गर्दी असलेल्या ठिकाणी जाताना दुहेरी मास्क वापरणे बंधनकारक मानले पाहिजे.

- एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाने मास्क लावला नसेल तरीही संसर्गाचा धोका वाढतो. याउलट दोन्ही व्यक्तींनी दुहेरी मास्क लावले असतील तर संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते.