शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

उरुळी कांचन ग्रामपंचायत : सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:47 IST

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

उरुळी कांचन - उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन मात्र यावेळी गैरहजर राहिल्या, हे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार पिसाळ यांच्याकडे दिला होता. त्यानुसार पिसाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ७) विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत गुप्त मतदान घेण्याची मागणी लेखी स्वरूपात एका सदस्याने केली होती.त्याला अनुसरून घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत १६ सदस्य हजर होते, पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्यांनी कोरी मतपत्रिका टाकून मतदानापासून अलिप्त राहणे पसंत केले. महिला सरपंच असल्याने नियमानुसार ३/४ सदस्यांचा म्हणजे, १२ सदस्यांचा अविश्वास ठरवाला पाठिंबा आवश्यक होता. तो १३ सदस्यांनी सह्या केल्याने पूर्ण झाला होता. आज प्रत्यक्षात १४ सदस्यांनी त्या बाजूने मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास अधोरेखित केला.आजच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याची बैठक अतिसंवेदनशील वातावरणात झाली; मात्र सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मंडलाधिकारी दीपक चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पीठासीन अधिकारी प्रशांत पिसाळ यांना मदत केली.उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक २४ आॅगस्ट २०१५ रोजी झाली होती. यामध्ये ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना भविष्यात या पदावर काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, अशी चर्चा नाराज सदस्यांमध्ये होती.प्रत्यक्षात तसे न घडल्याने मागील वर्षभरापासून सर्व सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी, बंडाळी सुरू होती. याचाच परिपाक म्हणून संतोष हरिभाऊ कांचन या सत्ताधारी गटाच्या असंतुष्ट सदस्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १७ पैकी १५ सदस्य म्हणजे सरपंच - उपसरपंच सोडून बाकीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. त्यापैकी १३ सदस्यांनी सह्या करून सोमवार, दि. २ जुलै रोजी सरपंचांवर सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, सदस्यांना तुच्छतेची वागणूक देणे, सरपंच पती राजेंद्र बबन कांचन यांची ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ व सरपंचाच्या परस्पर निर्णय घेणे या कारणांसाठी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव दाखल केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊ कांचन, सागर कांचन, जितेंद्र बडेकर, राजेंद्र जगताप,रोहित ननावरे, राजश्री वनारसे, सारिका मुरकुटे, समता जगताप, सारिका लोणारी, कविता खेडेकर, ज्योती पाथरकर या सदस्यांचा समावेश होता.  यावेळी पिसाळ म्हणाले की, या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलात जाण्यासाठी ७ दिवसांची मुदत सदरच्या पदाधिकाºयाला मिळते, त्यावर ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, नंतरच नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या