शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन ग्रामपंचायत : सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:47 IST

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

उरुळी कांचन - उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन मात्र यावेळी गैरहजर राहिल्या, हे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार पिसाळ यांच्याकडे दिला होता. त्यानुसार पिसाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ७) विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत गुप्त मतदान घेण्याची मागणी लेखी स्वरूपात एका सदस्याने केली होती.त्याला अनुसरून घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत १६ सदस्य हजर होते, पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्यांनी कोरी मतपत्रिका टाकून मतदानापासून अलिप्त राहणे पसंत केले. महिला सरपंच असल्याने नियमानुसार ३/४ सदस्यांचा म्हणजे, १२ सदस्यांचा अविश्वास ठरवाला पाठिंबा आवश्यक होता. तो १३ सदस्यांनी सह्या केल्याने पूर्ण झाला होता. आज प्रत्यक्षात १४ सदस्यांनी त्या बाजूने मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास अधोरेखित केला.आजच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याची बैठक अतिसंवेदनशील वातावरणात झाली; मात्र सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मंडलाधिकारी दीपक चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पीठासीन अधिकारी प्रशांत पिसाळ यांना मदत केली.उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक २४ आॅगस्ट २०१५ रोजी झाली होती. यामध्ये ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना भविष्यात या पदावर काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, अशी चर्चा नाराज सदस्यांमध्ये होती.प्रत्यक्षात तसे न घडल्याने मागील वर्षभरापासून सर्व सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी, बंडाळी सुरू होती. याचाच परिपाक म्हणून संतोष हरिभाऊ कांचन या सत्ताधारी गटाच्या असंतुष्ट सदस्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १७ पैकी १५ सदस्य म्हणजे सरपंच - उपसरपंच सोडून बाकीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. त्यापैकी १३ सदस्यांनी सह्या करून सोमवार, दि. २ जुलै रोजी सरपंचांवर सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, सदस्यांना तुच्छतेची वागणूक देणे, सरपंच पती राजेंद्र बबन कांचन यांची ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ व सरपंचाच्या परस्पर निर्णय घेणे या कारणांसाठी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव दाखल केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊ कांचन, सागर कांचन, जितेंद्र बडेकर, राजेंद्र जगताप,रोहित ननावरे, राजश्री वनारसे, सारिका मुरकुटे, समता जगताप, सारिका लोणारी, कविता खेडेकर, ज्योती पाथरकर या सदस्यांचा समावेश होता.  यावेळी पिसाळ म्हणाले की, या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलात जाण्यासाठी ७ दिवसांची मुदत सदरच्या पदाधिकाºयाला मिळते, त्यावर ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, नंतरच नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या