शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

उरुळी कांचनमध्ये एका दिवसात आढळले ४९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत ...

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ दुकानांवर पोलिसांनी कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक जण किरकोळ कारण सांगून संचार करत असताना दिसत आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर तरी दि. १६ एप्रिल २०२१ पासून उरुळी कांचनमधील सर्व व्यवहार दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली. यामधून अत्यावश्यक सेवांना पण सवलत नाही (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) असेही त्यांनी सांगितले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत अहवालानुसार आजपर्यंत १७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी १५७९ बरे होऊन घरी गेले असून सध्या १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर आजअखेर ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.

आकडेवारीचा घोळ

राज्य सरकारने वाढत्या कोरोनाची साखळी तुटण्यासाठी पंधरा दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु उरुळी कांचन शहरात फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. रस्ते तर गर्दीने भरून वाहत आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, चोवीस तासांत ७ जणांना मृत्यूने गाठले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एका वयस्कर महिलेचा मृत्यू रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाला आहे. मात्र अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्षात असणारे रुग्ण आणि झालेले मृत्यू याचा ताळमेळ बसत नसल्याने खासगी रुग्णालये आपल्याकडील माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांना देत नसल्याचे उघड होत असतानाही त्यांचेवर कारवाई होत नाही याचे नेमके कारण काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.