शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
3
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
4
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
5
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
6
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
7
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
8
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
9
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
10
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
11
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

उरुळी कांचनमध्ये एका दिवसात आढळले ४९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत ...

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ दुकानांवर पोलिसांनी कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक जण किरकोळ कारण सांगून संचार करत असताना दिसत आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर तरी दि. १६ एप्रिल २०२१ पासून उरुळी कांचनमधील सर्व व्यवहार दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली. यामधून अत्यावश्यक सेवांना पण सवलत नाही (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) असेही त्यांनी सांगितले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत अहवालानुसार आजपर्यंत १७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी १५७९ बरे होऊन घरी गेले असून सध्या १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर आजअखेर ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.

आकडेवारीचा घोळ

राज्य सरकारने वाढत्या कोरोनाची साखळी तुटण्यासाठी पंधरा दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु उरुळी कांचन शहरात फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. रस्ते तर गर्दीने भरून वाहत आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, चोवीस तासांत ७ जणांना मृत्यूने गाठले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एका वयस्कर महिलेचा मृत्यू रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाला आहे. मात्र अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्षात असणारे रुग्ण आणि झालेले मृत्यू याचा ताळमेळ बसत नसल्याने खासगी रुग्णालये आपल्याकडील माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांना देत नसल्याचे उघड होत असतानाही त्यांचेवर कारवाई होत नाही याचे नेमके कारण काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.