शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

उरुळी कांचनमध्ये एका दिवसात आढळले ४९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत ...

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ दुकानांवर पोलिसांनी कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक जण किरकोळ कारण सांगून संचार करत असताना दिसत आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर तरी दि. १६ एप्रिल २०२१ पासून उरुळी कांचनमधील सर्व व्यवहार दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली. यामधून अत्यावश्यक सेवांना पण सवलत नाही (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) असेही त्यांनी सांगितले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत अहवालानुसार आजपर्यंत १७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी १५७९ बरे होऊन घरी गेले असून सध्या १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर आजअखेर ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.

आकडेवारीचा घोळ

राज्य सरकारने वाढत्या कोरोनाची साखळी तुटण्यासाठी पंधरा दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु उरुळी कांचन शहरात फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. रस्ते तर गर्दीने भरून वाहत आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, चोवीस तासांत ७ जणांना मृत्यूने गाठले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एका वयस्कर महिलेचा मृत्यू रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाला आहे. मात्र अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्षात असणारे रुग्ण आणि झालेले मृत्यू याचा ताळमेळ बसत नसल्याने खासगी रुग्णालये आपल्याकडील माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांना देत नसल्याचे उघड होत असतानाही त्यांचेवर कारवाई होत नाही याचे नेमके कारण काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.