शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

उरुळी कांचनमध्ये एका दिवसात आढळले ४९ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:10 IST

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत ...

उरुळी कांचन : येथील परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४९ बाधित आढळले असून २४ तासांत सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ दुकानांवर पोलिसांनी कारवाई करून नऊ हजारांचा दंड वसूल केला आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र, या आदेशामध्ये स्पष्टता नसल्याने अनेक जण किरकोळ कारण सांगून संचार करत असताना दिसत आहे. त्यामुळे उरुळी कांचन पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकानदार, भाजीवाले, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला. मास्क न घालणाऱ्या नागरिकांना पहिल्यांदा पाचशे रुपये, तर दुसऱ्यांना मास्क न घातल्याचे आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्याचबरोबर तरी दि. १६ एप्रिल २०२१ पासून उरुळी कांचनमधील सर्व व्यवहार दुपारी २ वाजता बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असल्याची माहिती सरपंच संतोष हरिभाऊ कांचन यांनी दिली. यामधून अत्यावश्यक सेवांना पण सवलत नाही (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) असेही त्यांनी सांगितले. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकृत अहवालानुसार आजपर्यंत १७६६ जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी १५७९ बरे होऊन घरी गेले असून सध्या १५१ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत, तर आजअखेर ३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी दिली.

आकडेवारीचा घोळ

राज्य सरकारने वाढत्या कोरोनाची साखळी तुटण्यासाठी पंधरा दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. परंतु उरुळी कांचन शहरात फारसा परिणाम झाला नसल्याचे चित्र आहे. रस्ते तर गर्दीने भरून वाहत आहेत. तर कोरोना रुग्णांची संख्या मात्र झपाट्याने वाढत आहे, चोवीस तासांत ७ जणांना मृत्यूने गाठले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे एका वयस्कर महिलेचा मृत्यू रेमडेसिविर इंजेक्शन व ऑक्सिजन बेड न मिळाल्याने झाला आहे. मात्र अधिकृत आकडेवारी व प्रत्यक्षात असणारे रुग्ण आणि झालेले मृत्यू याचा ताळमेळ बसत नसल्याने खासगी रुग्णालये आपल्याकडील माहिती शासनाच्या अधिकाऱ्यांना देत नसल्याचे उघड होत असतानाही त्यांचेवर कारवाई होत नाही याचे नेमके कारण काय? असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे.