शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

उरुळीची वाहतूककोंडी फुटणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:02 IST

नित्याचीच समस्या : पोलीस यंत्रणा कामाला

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात होणारी वाहतूककोंडी नित्याचीच आहे. या परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बेशिस्तपणाचे दर्शन घडवत असते. या वाहतूककोंडीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे; पण यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नव्हते. ‘ही उरुळी कांचन परिसराची शोकांतिका’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारच्या (दि.२८) अंकात प्रसिद्ध झाली.

या बातमीची तत्काळ दखल घेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूककोंडीमुक्त पुणे-सोलापूर रस्ता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून आपल्या अखत्यारीत स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग सुरु केला आहे. या विभागासाठी एक पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करून त्यांच्याबरोबर प्रत्येक पोलीस चौकीचा एक पोलीस कर्मचारी मदतीला देण्याचा निर्णय घेतला तसेच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, देवाची उरुळी, वडकी आदी ग्रामपंचायतींना एक एक वाहतूक वॉर्डन देण्याची विनंती केली. ती मागणी बहुतेक सर्व ग्रामपंचायतींनी मान्य केल्याने हे काम आणखी सुकर होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. ते म्हणाले, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाºयांनी फक्त वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यायची अशा सूचना देत अवैध व अस्ताव्यस्त पार्किंग करणारी वाहने आणि वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.तसेच सातत्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मौलिक सूचना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश असलेली तसेच काही अधिकारी व एक सल्लागार समिती नियुक्त केली. त्यांच्या सूचनांच्या आधारित वाहतूक नियंत्रण करण्याच्या कामातसुधारणा करण्यात येतील असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी