शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

उरुळीची वाहतूककोंडी फुटणार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:02 IST

नित्याचीच समस्या : पोलीस यंत्रणा कामाला

उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात होणारी वाहतूककोंडी नित्याचीच आहे. या परिसरात वाहतुकीचे नियम न पाळता वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बेशिस्तपणाचे दर्शन घडवत असते. या वाहतूककोंडीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे; पण यावर नेमका तोडगा काढून जनतेला दिलासा देणारी कोणतीच यंत्रणा किंवा योजना कार्यान्वित करण्यासाठी पोलीस प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला दिसत नव्हते. ‘ही उरुळी कांचन परिसराची शोकांतिका’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये मंगळवारच्या (दि.२८) अंकात प्रसिद्ध झाली.

या बातमीची तत्काळ दखल घेत लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूककोंडीमुक्त पुणे-सोलापूर रस्ता करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु करून आपल्या अखत्यारीत स्वतंत्र वाहतूक पोलीस विभाग सुरु केला आहे. या विभागासाठी एक पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करून त्यांच्याबरोबर प्रत्येक पोलीस चौकीचा एक पोलीस कर्मचारी मदतीला देण्याचा निर्णय घेतला तसेच लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन, देवाची उरुळी, वडकी आदी ग्रामपंचायतींना एक एक वाहतूक वॉर्डन देण्याची विनंती केली. ती मागणी बहुतेक सर्व ग्रामपंचायतींनी मान्य केल्याने हे काम आणखी सुकर होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली. ते म्हणाले, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाºयांनी फक्त वाहतूक सुरळीत राहील याची दक्षता घ्यायची अशा सूचना देत अवैध व अस्ताव्यस्त पार्किंग करणारी वाहने आणि वाहनचालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.तसेच सातत्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही मौलिक सूचना देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या दोन प्रतिनिधींचा समावेश असलेली तसेच काही अधिकारी व एक सल्लागार समिती नियुक्त केली. त्यांच्या सूचनांच्या आधारित वाहतूक नियंत्रण करण्याच्या कामातसुधारणा करण्यात येतील असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी