शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
5
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
6
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
7
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
8
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
9
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
10
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
11
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
12
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
14
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
15
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
16
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
17
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
18
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
19
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
20
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

उत्तरप्रदेश विकासाच्या वाटेवर, मजूरांचे महाराष्ट्रात येणेही कमी- राम नाईक

By राजू इनामदार | Published: August 13, 2022 6:12 PM

हे राज्य विकासाच्या वाटेवर आहे....

पुणे: उत्तरप्रदेशची देशात असलेली प्रतिमा बदलते आहे. हे राज्य विकासाच्या वाटेवर आहे, त्यामुळेच आता तिथून महाराष्ट्रात येणाऱ्या मजूरांची संख्या कमी झाली आहे असा दावा त्या माजी राज्यपाल राम नाईक यांनी केला. महाराष्ट्राच्या राज्यपालासंबधी बोलण्याबाबत स्पष्ट शब्दात नकार देत त्यांनी असे करणे योग्य नाही असे सांगितले.

पुण्यात खासगी कार्यक्रमासाठी म्हणून आलेल्या नाईक यांनी शनिवारी दुपारी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकारांबरोबर संवाद साधला. जुलै २०१४ ते जुलै २०१९ या कालावधीत नाईक उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. त्या कालावधीत तिथे केलेल्या कामांची सविस्तर माहिती त्यांनी दिली. नाईक म्हणाले, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. या पदावरून उत्तरप्रदेशमध्ये चांगले काम करता आले. त्या राज्याचा स्थापना दिवस, शहिद सैनिकांचे पुतळे व स्मृती उद्यान, कुंभ मेळा नियोजन समिती, थोर पुरूषांच्या नावाचे चुकीचे उल्लेख बरोबर करणे, कुष्ठपिडितांनी अर्थसाह्य अशी बरीच कामे तिथे करता आली. राज्य सरकार तसेच विरोधी पक्षांचेही त्यासाठी चांगले सहकार्य मिळाले.

काही गोष्टी नकारात्मकही झाल्या. त्यात प्रामुख्याने राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी घटनेत जे निकष दिले आहे, त्यासाठी आग्रही राहणे, लोकायुक्तांची नियुक्ती अशा काही गोष्टींबाबत वाद झाले, मात्र नियम, संकेत. घटनेला अपेक्षित असलेल्या गोष्टी याबाबत आग्रही राहिलो. तेच बरोबर असल्याचे नंतरच्या काळात सिद्ध झाले. त्यामुळेच निवृत्त झाल्यानंतर मागे वळून पाहताना जे केले त्याबद्दल समाधान आहे असे नाईक म्हणाले.

राज्यपाल घटनेने बांधलेले आहे. राजकीय पक्षांबरोबरच त्यांचे राज्यातील जनतेबरोबरही चांगले संवाद सातत्य रहायला हवे. तसेच अपेक्षित आहे. वादविषयांपेक्षाही राज्यात सुरळीतपणे कसा राहिल हे पाहणे महत्वाचे आहे असे मत नाईक यांनी व्यक्त केले. मागासलेले राज्य अशी उत्तरप्रदेशची प्रतिमा आता वेगात बदलते आहे. तिथे उद्योग येत आहेत, नव्याने गुंतवणूक होते आहे. २४ तास वीज, मोठे प्रशस्त रस्ते, पाणी यांची व्यवस्था राज्य करत असल्यामुळे तिथून अन्य राज्यात जाणाऱ्या मजूरांचे प्रमाणही लक्षणीयरित्या घटले आहे असा दावा नाईक यांनी केला. संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट यांनी स्वागत केले. सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :PuneपुणेRam Naikराम नाईकyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश