शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक काढण्यापूर्वीच चांगला भाव देण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आश्वासन

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 1, 2022 16:29 IST

शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत...

पुणे : देशाचा विकास व्हायचा असेल तर कृषी क्षेत्राला मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे. कृषीचा विकास व्हायला हवा. त्यामुळेच शेतकरी समृध्द होईल. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. फलोत्पादन करणे ही आजची गरज आहे. त्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. उत्पादन वाढल्यास निर्यातही करता येईल. शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी (१ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात फलोत्पादन पिकांमधील मुल्य साखळी वृध्दी-क्षमता या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, मनोज आहुजा, एकनाथ ढोले आदी उपस्थित होते.

फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या 'ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते झाले.

आता प्रत्येकाला वाटतं शेती करावी

काही वर्षांपूर्वी इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर व्हावा, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक व्हावा, पण शेतकऱ्याला वाटत नव्हते की, त्याचा मुलगा शेतकरी व्हावा. पण आता हे चित्र बदलले आहे. उच्च शिक्षण घेतलेले लोकही आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करू पाहत आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की, माझ्याकडे शेती असावी आणि ती करावी, हे चित्र आशादायक आहे, असे नरेंद्र तोमर म्हणाले.

पावसावर कोणाचे नियंत्रण नसते. हवामान बदलामुळे अतिवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकार पंचनामे करत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.- नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री

 

सध्या रासायनिक शेती खूप वाढली आहे. त्यापासून फळांचे उत्पादन वाढले. या रासायनिकमुळे अनेकांना कॅन्सर होत आहे. तो होऊ नये म्हणून आता सेंद्रीय पध्दतीने फळांची निर्मिती होत आहे. असे प्रयोग देशभर गेले पाहिजेत.- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती