शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक काढण्यापूर्वीच चांगला भाव देण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आश्वासन

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 1, 2022 16:29 IST

शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत...

पुणे : देशाचा विकास व्हायचा असेल तर कृषी क्षेत्राला मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे. कृषीचा विकास व्हायला हवा. त्यामुळेच शेतकरी समृध्द होईल. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. फलोत्पादन करणे ही आजची गरज आहे. त्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. उत्पादन वाढल्यास निर्यातही करता येईल. शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी (१ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात फलोत्पादन पिकांमधील मुल्य साखळी वृध्दी-क्षमता या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, मनोज आहुजा, एकनाथ ढोले आदी उपस्थित होते.

फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या 'ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते झाले.

आता प्रत्येकाला वाटतं शेती करावी

काही वर्षांपूर्वी इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर व्हावा, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक व्हावा, पण शेतकऱ्याला वाटत नव्हते की, त्याचा मुलगा शेतकरी व्हावा. पण आता हे चित्र बदलले आहे. उच्च शिक्षण घेतलेले लोकही आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करू पाहत आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की, माझ्याकडे शेती असावी आणि ती करावी, हे चित्र आशादायक आहे, असे नरेंद्र तोमर म्हणाले.

पावसावर कोणाचे नियंत्रण नसते. हवामान बदलामुळे अतिवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकार पंचनामे करत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.- नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री

 

सध्या रासायनिक शेती खूप वाढली आहे. त्यापासून फळांचे उत्पादन वाढले. या रासायनिकमुळे अनेकांना कॅन्सर होत आहे. तो होऊ नये म्हणून आता सेंद्रीय पध्दतीने फळांची निर्मिती होत आहे. असे प्रयोग देशभर गेले पाहिजेत.- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती