शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

पीक काढण्यापूर्वीच चांगला भाव देण्याचा प्रयत्न; केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आश्वासन

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: November 1, 2022 16:29 IST

शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत...

पुणे : देशाचा विकास व्हायचा असेल तर कृषी क्षेत्राला मजबूत करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याचे उत्पन्न वाढले पाहिजे. कृषीचा विकास व्हायला हवा. त्यामुळेच शेतकरी समृध्द होईल. आधुनिक तंत्रज्ञानाने शेतकऱ्याने शेती केली पाहिजे. फलोत्पादन करणे ही आजची गरज आहे. त्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. उत्पादन वाढल्यास निर्यातही करता येईल. शेतीच्या मालाला पीक काढण्यापूर्वी चांगला भाव मिळेल, अशी सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मंगळवारी (१ नोव्हेंबर) पुणे दौऱ्यावर आले होते. पुण्यात फलोत्पादन पिकांमधील मुल्य साखळी वृध्दी-क्षमता या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन वैंकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत त्यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, केंद्र सरकारच्या कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन, मनोज आहुजा, एकनाथ ढोले आदी उपस्थित होते.

फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणारे शेतकरी, एफपीओ, कृषी आधारित स्टार्ट-अप, उद्योजक, बँकर्स यांचा कृषीमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. सेंद्रीय मूल्य साखळीवर आधारित, फलोत्पादन क्षेत्रातील यशोगाथांचे संकलन असणाऱ्या 'ऑरगॅनिक पॅकेजिंग ऑफ प्रॅक्टीस फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप्स' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशनही कृषीमंत्र्यांच्या हस्ते झाले.

आता प्रत्येकाला वाटतं शेती करावी

काही वर्षांपूर्वी इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर व्हावा, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक व्हावा, पण शेतकऱ्याला वाटत नव्हते की, त्याचा मुलगा शेतकरी व्हावा. पण आता हे चित्र बदलले आहे. उच्च शिक्षण घेतलेले लोकही आधुनिक तंत्रज्ञानाची शेती करू पाहत आहेत. प्रत्येकाला वाटत आहे की, माझ्याकडे शेती असावी आणि ती करावी, हे चित्र आशादायक आहे, असे नरेंद्र तोमर म्हणाले.

पावसावर कोणाचे नियंत्रण नसते. हवामान बदलामुळे अतिवृष्टी होत आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ पडतो. यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. राज्य सरकार पंचनामे करत आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल.- नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय कृषीमंत्री

 

सध्या रासायनिक शेती खूप वाढली आहे. त्यापासून फळांचे उत्पादन वाढले. या रासायनिकमुळे अनेकांना कॅन्सर होत आहे. तो होऊ नये म्हणून आता सेंद्रीय पध्दतीने फळांची निर्मिती होत आहे. असे प्रयोग देशभर गेले पाहिजेत.- अब्दुल सत्तार, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :Puneपुणेagricultureशेती