शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

By admin | Updated: June 25, 2017 04:45 IST

आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांवरच आज बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कभोसरी : आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांवरच आज बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. स्थानिक म्हणून सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरीपासून डावलल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नोकरी देणे हा ज्या त्या कंपनीच्या व्यवस्थापनाचा अधिकार असल्याने डावलले गेल्यास तक्रारही दाखल करता येत नसल्याने यावर राजकीय वरदहस्ताशिवाय दुसरा उपाय सापडत नाही. ज्या तरुणांना असा वरदहस्त लाभत नाही, त्यांना मात्र बेरोजगारीच्या दलदलीतून बाहेर पडणे अशक्य होत आहे.याबाबत कंपन्यांचे म्हणणेही विचारात घ्यायला हवे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक तरुण कंपनीत दंडेलशाही करतात. प्रसंगी वरिष्ठांना मारहाणही करतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना कंपनीची दारे बंद केली जात असल्याचे समोर येत आहे. परंतु काही मूठभर व्यक्तींच्या दंडेलशाही प्रवृत्तीत सर्वच स्थानिक तरुणांचे मोजमाप करणे कितपत योग्य आहे, एकामुळे सर्वांवरच अन्याय का, असा प्रश्न काही होतकरू स्थानिक तरुण उपस्थित करीत आहेत. या जटिल प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा.या प्रश्नाबाबत एका खासगी बड्या कंपनीच्या अधिकाऱ्यास विचारले असता, त्यांनी सांगितले, की स्थानिक मुले बदलून दिलेल्या शिफ्टमध्ये काम करू इच्छित नसतात. त्यात बाहेरील राज्यांतील, जिल्ह्यांतील मुले सुपरवायजर, वरिष्ठ अधिकारी म्हणून नेमल्यास त्यांचा हुकूम ऐकणे, त्यांच्या हाताखाली काम करणे येथील मुलांना कमीपणाचे वाटते. त्यात कामावरून तणाव, वाद निर्माण झाल्यास थेट स्थानिक म्हणून दंडेलशाही दाखवून वरिष्ठांना मारहाणही करतात. यावर उपाय म्हणूनच स्थानिकांना न घेण्याचा पायंडाच कंपनीत पाडला जातो.याबाबत तरुणांनी प्रयत्न करूनही केवळ स्थानिक असल्याच्या निकषावर त्यांना डावलले जाते त्याचा त्रास पालकांना होत आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरुण व्यसनाकडे वळत असल्याने पालक चिंताग्रस्त होत असल्याचे दिसत आहे.1उद्योगनगरीतील अशा बेरोजगारांची संख्या हजारोंच्या वर असून दर वर्षी त्यात भरच पडत आहे. स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याकरिता त्यांना आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्याकरिता शासनाने परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या आहेत. येथील स्थानिक मुलेही येथून प्रशिक्षण पूर्ण करीत असतात. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या अनुभव प्रशिक्षणास सरकारी, निमसरकारी व काही बड्या कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येते. मात्र, हा सहा महिन्यांचा प्रशिक्षण काळ संपल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने कायमस्वरूपी रोजगार मिळविण्याचा शोध सुरू होतो. 2तेव्हा त्यांना स्थानिक म्हणून नोकरी नाही या वास्तवाला सामोरे जावे लागते. त्यांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आजपर्यंत अनेक पक्ष व नेत्यांनी कार्यक्रमात आश्वासने दिली. पण प्रत्येक तरुणाला आजही आश्वासने फोल ठरल्याचे वाटत आहे. यामुळे असे बेरोजगार तरुण व्यसनांच्या आहारी जात असून, हे व्यसन करण्यासाठी लागणारे पैसे मिळविण्यासाठी ते झटपट पैसे मिळवून देणारे उद्योग शोधू लागतात. यातूनच गुन्हेगारीही वाढताना दिसून येते. या सर्व गोष्टींचा परिणाम त्याला एकट्यालाच सहन करावे लागत नसून, त्याच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही सहन करावे लागत आहे.आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांवरच आज बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. स्थानिक म्हणून सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरीपासून डावलल्याच्या घटना समोर येत आहेत.या भागात आहेत अघोषित निर्बंधउद्योगनगरीतील भोसरी एमआयडीसी, तळवडे, निगडी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसर या परिसरात व उद्योगनगरीनजीक चाकण, महाळुंगे, निघोजे, आळंदी फाटा आदी ठिकाणी असलेल्या बड्या कंपन्यांमधून स्थानिकांना पात्रता असूनही डावलले जाते. काहीही कारण सांगून फक्त नाव विचारूनच तो स्थानिक आहे की नाही याची खात्री केली जाते व त्यानंतरच नोकरीसंदर्भात माहिती दिली जाते. त्यामुळे स्थानिक सुशिक्षित तरुणांवर उद्योगनगरीत अघोषित निर्बंधच असल्याचे दिसून येते.