शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
2
कीपॅड मोबाईल, ओटीपी नाही, युपीआय नाही, तरीही पैसे गायब; गिरणी कामगाराचे ७ लाख सायबर चोरट्याकडून लंपास
3
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
4
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
5
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
6
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
7
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
8
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
9
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
10
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
11
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
12
लग्नाच्या दिवशी वधूचा अपघात, डॉक्टरांच्या साक्षीने हॉस्पिटलमध्येच नवरदेवाने बांधली लग्नगाठ  
13
IND vs SA : 'आत्मनिर्भर' बुमराह! मार्करमला बोल्ड केल्यावर KL राहुलसोबतचं सेलिब्रेशन ठरलं खास (VIDEO)
14
हृदयद्रावक! यूट्यूबवर एअर शोचा Video पाहत होते विंग कमांडरचे वडील, मिळाली लेकाच्या मृत्यूची माहिती
15
'ईठा'च्या शूटवेळी श्रद्धा कपूरला दुखापत, शूटिंग थांबलं; तमाशा सम्राज्ञी विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार
16
पायलटचे नियंत्रण सुटले की ब्लॅकआउटमुळे अपघात झाला? संरक्षण तज्ञांनी तेजस अपघाताचे कारण सांगितले
17
Multibagger Stock: पैसाच पैसा! ₹२८ च्या शेअरनं केलं मालामाल; ५ वर्षात दिला ५६,०००% पर्यंतचा तुफान रिटर्न
18
५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश
19
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
'संगीत देवबाभळी' फेम अभिनेत्री घटस्फोटाच्या ३ महिन्यानंतर दुसऱ्यांदा बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो केले शेअर
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिकतेला धक्का न लावता कलाकृती समजून घ्यावी : उमा कुलकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 15:36 IST

तिसरे विचार भारती साहित्य संमेलन 

अनुवाद शैली वेगळी असते का? प्रत्येक लेखकाची वेगळी शैली असते. ती कलाकृतीतून घ्यावी लागते. अनुवादकाने बेधडकपणे अनुवाद करायला सुरुवात केली पाहिजे. लेखकाची कलाकृती तुम्ही अनुवाद करत असलेल्या लेखनाची आवश्यक ती शैली बनवून घेते. त्यानंतर अनुवाद करण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हाला अनुवाद करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य असते; परंतु एकदा अनुवाद करण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर उत्तम अनुवाद करणे, ही तुमची जबाबदारी आहे. कन्नड लोकांच्या मराठी साहित्याबद्दल काय कल्पना आहेत?कन्नड लोकांना मराठी साहित्याबद्दल विचारले तर ते सांगतात की, आम्ही गळकनाथ वाचत मोठे झालो. गळकनाथ हे मराठीतील साहित्य कन्नडमध्ये घेऊन जाणारे मोठे साहित्यिक होते. त्यांनी ऐतिहासिक कादंबºयांचा कन्नड अनुवाद केला. त्यांना मराठी लेखकाची नावे माहीत नाहीत; परंतु कर्नाटकातील विचारवंत आणि लेखकांनी मराठीतील वैचारिक साहित्य वाचले आहे. काही विद्वान लोकांनी रा. चिं. ढेरे यांची पुस्तके वाचली आहेत. दाक्षिणात्य भाषा उत्तरेकडे चालत नाही. उत्तरेकडील लोक दाक्षिणात्य स्वीकारत नाहीत. हा विरोध कमी करण्यासाठी साहित्य उपयोगी पडेल का?माणसाचे भावजीवन हे ललित साहित्यातून कळते. वैचारिक साहित्य डोक्यात शिरते. त्यानंतर हृदयापर्यंत पोहोचते. ललित साहित्य हृदयाला स्पर्श करते. ललित कलामुळे देवाण घेवाण याचे प्रमाण वाढते. मग भाषांमधील सामंजस्यपणा सुधारतो.भारतीय प्रांतातील लेखकांची ओळख एकमेकांना प्रांताने करून दिली आहे का?विरुपाक्ष यांनी मराठी पुस्तके कन्नड भाषेत अनुवादित केली. वाचकांची भूक वाढत चालली आहे. त्याला स्वभाषेव्यतिरिक्त इतर साहित्य जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे अनुवादकही निरनिराळ्या भाषेत अनुवाद करत आहेत. चंद्रकांत पोकळे यांच्यासारख्या अनुवादकाने १०० पेक्षा जास्त पुस्तके अनुवादित केली आहेत. मराठी भाषेतून इतर भाषेत अनुवाद करणाºया लोकांचा सत्कार केला, तर ते अतिउत्साहाने काम करतील.  अनुवाद करताना अनुवादकाने कोणती काळजी घ्यावी? शब्दार्थ चालतील, पण शब्द नको यावर तुमचे मत काय? लेखकाची संपूर्ण कलाकृती काय सांगू पाहते, याचा वेध घ्यावा. काहींची कलाकृती शब्दप्रधान, तर काहींची भावनेला महत्त्व देणारी असू शकते. मी त्यांच्या वैचारिकतेला कधीही तडजोड केली नाही. अनुवाद करताना त्यांच्या भावनेचा, भाषेचा जास्त विचार केला. 

......

साहित्यात सोशल मीडियामुळे काय बदल जाणवत आहे?नवीन पिढीला आपले लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. तरुण मंडळी पोस्टला लाइक मिळाल्याने आनंदी होतात; परंतु आपण एखादे पुस्तक तयार केले, की ते घेऊन प्रकाशकाकडे जातो. प्रकाशकाला पुस्तक आवडले तरच त्याचे प्रकाशन होते. नाहीतर आपल्याला पुन्हा पाठवले जाते. त्या साहित्यावर पुन्हा कष्ट घेतले जातात. म्हणूनच जुनी पुस्तके अजूनही वाचली जातात. त्यांचे अनुवाद होतात. पुढील काळात नवीन मुलांना जुन्या लेखकांच्या भेटीही होणार नाहीत. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य