शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

वैचारिकतेला धक्का न लावता कलाकृती समजून घ्यावी : उमा कुलकर्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 15:36 IST

तिसरे विचार भारती साहित्य संमेलन 

अनुवाद शैली वेगळी असते का? प्रत्येक लेखकाची वेगळी शैली असते. ती कलाकृतीतून घ्यावी लागते. अनुवादकाने बेधडकपणे अनुवाद करायला सुरुवात केली पाहिजे. लेखकाची कलाकृती तुम्ही अनुवाद करत असलेल्या लेखनाची आवश्यक ती शैली बनवून घेते. त्यानंतर अनुवाद करण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्हाला अनुवाद करण्यासाठी निवडीचे स्वातंत्र्य असते; परंतु एकदा अनुवाद करण्याचे आव्हान स्वीकारल्यानंतर उत्तम अनुवाद करणे, ही तुमची जबाबदारी आहे. कन्नड लोकांच्या मराठी साहित्याबद्दल काय कल्पना आहेत?कन्नड लोकांना मराठी साहित्याबद्दल विचारले तर ते सांगतात की, आम्ही गळकनाथ वाचत मोठे झालो. गळकनाथ हे मराठीतील साहित्य कन्नडमध्ये घेऊन जाणारे मोठे साहित्यिक होते. त्यांनी ऐतिहासिक कादंबºयांचा कन्नड अनुवाद केला. त्यांना मराठी लेखकाची नावे माहीत नाहीत; परंतु कर्नाटकातील विचारवंत आणि लेखकांनी मराठीतील वैचारिक साहित्य वाचले आहे. काही विद्वान लोकांनी रा. चिं. ढेरे यांची पुस्तके वाचली आहेत. दाक्षिणात्य भाषा उत्तरेकडे चालत नाही. उत्तरेकडील लोक दाक्षिणात्य स्वीकारत नाहीत. हा विरोध कमी करण्यासाठी साहित्य उपयोगी पडेल का?माणसाचे भावजीवन हे ललित साहित्यातून कळते. वैचारिक साहित्य डोक्यात शिरते. त्यानंतर हृदयापर्यंत पोहोचते. ललित साहित्य हृदयाला स्पर्श करते. ललित कलामुळे देवाण घेवाण याचे प्रमाण वाढते. मग भाषांमधील सामंजस्यपणा सुधारतो.भारतीय प्रांतातील लेखकांची ओळख एकमेकांना प्रांताने करून दिली आहे का?विरुपाक्ष यांनी मराठी पुस्तके कन्नड भाषेत अनुवादित केली. वाचकांची भूक वाढत चालली आहे. त्याला स्वभाषेव्यतिरिक्त इतर साहित्य जाणून घेण्याची इच्छा आहे. त्याप्रमाणे अनुवादकही निरनिराळ्या भाषेत अनुवाद करत आहेत. चंद्रकांत पोकळे यांच्यासारख्या अनुवादकाने १०० पेक्षा जास्त पुस्तके अनुवादित केली आहेत. मराठी भाषेतून इतर भाषेत अनुवाद करणाºया लोकांचा सत्कार केला, तर ते अतिउत्साहाने काम करतील.  अनुवाद करताना अनुवादकाने कोणती काळजी घ्यावी? शब्दार्थ चालतील, पण शब्द नको यावर तुमचे मत काय? लेखकाची संपूर्ण कलाकृती काय सांगू पाहते, याचा वेध घ्यावा. काहींची कलाकृती शब्दप्रधान, तर काहींची भावनेला महत्त्व देणारी असू शकते. मी त्यांच्या वैचारिकतेला कधीही तडजोड केली नाही. अनुवाद करताना त्यांच्या भावनेचा, भाषेचा जास्त विचार केला. 

......

साहित्यात सोशल मीडियामुळे काय बदल जाणवत आहे?नवीन पिढीला आपले लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. ते सोशल मीडियावर पोस्ट करतात. तरुण मंडळी पोस्टला लाइक मिळाल्याने आनंदी होतात; परंतु आपण एखादे पुस्तक तयार केले, की ते घेऊन प्रकाशकाकडे जातो. प्रकाशकाला पुस्तक आवडले तरच त्याचे प्रकाशन होते. नाहीतर आपल्याला पुन्हा पाठवले जाते. त्या साहित्यावर पुन्हा कष्ट घेतले जातात. म्हणूनच जुनी पुस्तके अजूनही वाचली जातात. त्यांचे अनुवाद होतात. पुढील काळात नवीन मुलांना जुन्या लेखकांच्या भेटीही होणार नाहीत. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य