शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

उज्ज्वला गॅसचा वापर केवळ ‘चहा’ साठीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 06:00 IST

स्वयंपाकासाठी सकाळ, संध्याकाळ चुली पेटवल्या जातात.

ठळक मुद्देजिल्ह्यात १ लाख ४५ हजार ४१२ कुटुंबांना उज्ज्वला गॅसचे वाटपकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : चुलीच्या धुरापासून गरीब व सर्वसामान्य महिलांची सुटका व्हावी यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत पुणे जिल्ह्यातील तब्बल १ लाख ४५ हजार ४१२ कुटुंबांना गॅस जोडणी देण्यात आली. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना देखील यामध्ये गॅस सिलिंडर देण्यात आला. परंतु यापैकी तब्बल ६० टक्क्यांपेक्षा गॅस सिलिंडरचा वापर केवळ ‘चहा’साठीच होत असून, स्वयंपाकासाठी महिलांना सकाळ, संध्याकाळ चुली पेटवल्या जातात असल्याची माहिती समोर आली आहे.     केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असून, या योजनेचा शुभारंभ १ मे २०१६ रोजी करण्यात आला होता. ग्रामीण भागात स्वयंंपाकासाठी आजही मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जात आहे. यामुळे वायू प्रदूषणाबरोबर पर्यावरणाचाही -हास होत आहे. गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना चुलीवर जेवण करताना त्रास होतो. त्यामुळे श्वासाचेही आजर जडून आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. यामुळे चुलीच्या धुरापासून महिलांची सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजने अतंर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली. यामध्ये पहिले तीन महिने सवलतीच्या दरामध्ये गॅस सिलिंडर देण्यात आला. परंतु त्यानंतर संबंधित कुटुंबाला स्वखर्चाने गॅस सिलिंडर भरुन आणावा लागतो. त्यात गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमती अनेक कुटुंबांना परवडणारी नाही.     पुणे जिल्ह्यातील तब्बल दीड लाख कुटुंबांना उज्ज्वला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. परंतु यापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबामध्ये या गॅस सिलिंडरचे वाटप केवळ ऐनवेळी आलेल्या पै-पाहुण्यांना चहा करुन देण्यासाठीच होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे एकदा भरलेला गॅस सिलिंडर तब्बल दोन-तीन महिन्यांपेक्षा अधिक दिवस चालतो. परंतु उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळालेले बहुतेक कुटुंब आजही सकाळ-संध्याकाळ चुलीवरच स्वयंपाक करत असल्याचे वास्तव आहे.------------------

रॉकेलचा कोटा वाढून द्या    जिल्ह्यात ज्या कुटुंबाला उज्ज्वला गॅस सिलिंडरचा वाटप करण्यात आले अशा कुटुंबांना रॉकेलाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. परंतु उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळाल्यानंतर ही बहुतेक कुटुंब चुलीवरच स्वयंपका करत असल्याने रॉकेलची मागणी कायम आहे. परंतु शासनाकडून जिल्ह्याचा रॉकेटला कोटा मात्र कमी केला आहे. याबाबत  नुकत्याच  झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यासाठी अत्यंत कमी रॉकेलचा पुरवठा होत असून, यामध्ये वाढ करण्याची मागणी केली. ही परिस्थिती जिल्ह्यातील अन्य तालुक्यांची देखील आहे. परंतु गॅस सिलिंडरही परवडत नाही आणि रॉकेलही मिळत नाही यामुळे अनेक गरीब कुटुंबांची अडचण निर्माण झाली आहे.-------------------------

जिल्ह्यात उज्ज्वला गॅस सिलिंडरचे तालुकानिहाय वाटप

आंबेगाव-११ हजार १७, बारामती-१२ हजार ४९२, भोर-५ हजार १६२, दौंड-११ हजार ४९८, हवेली - ३१ हजार ८२८, इंदापूर-२१ हजार ४५०, जुन्नर-१४ हजार ४२७, खेड-१० हजार ३७६, मावळ-६ हजार १३९, मुळशी-११ हजार ६, पुरंदर - ९ हजार ८३८, शिरुर- ८ हजार ६१६, वेल्हा-१ हजार ४६३, असे एकूण पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात १ लाख ४५ हजार ४१२ कुटुंबांना उज्ज्वला गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारCylinderगॅस सिलेंडरWomenमहिलाfoodअन्न