शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

उजनीच्या पाण्यात दीड महिन्यात १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:33 IST

संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे.

पळसदेव : संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. ३ आॅगस्ट रोजी उजनी धरणात १०६ टक्के पाणीसाठा होता; मात्र आजमितीला धरणात ९४.०९ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दीड महिन्यात १२ टक्के पाणी कमी झाल्यामुळे आगामी काळात काय परिस्थिती ओढवेल, याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे.उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय होत आहे. याबाबत इंदापूर तालुक्यातील शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उजनी धरणासाठी आम्ही जमिनी दिल्या; मात्र आमचा कोणीही विचार करीत नाही. पुढील वर्षी उजनी भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही शेती करायची कशी? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. आमच्या हक्काचे पाणी ‘आरक्षित’ ठेवून सोलापूर जिल्ह्याला पाणी द्या; मात्र आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा इंदापूर तालुक्यातील ‘उजनी’ लगतच्या शेतकºयांनी दिला आहे.>उजनी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की उजनी धरणासाठी जमिनी देऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर अन्याय होता कामा नये. पाण्याचे वाटप होताना समन्यायी वाटप होणे गरजेचे आहे. आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा देऊन सध्या उजनी धरणातून जेऊर ते परंडा बोगद्याचे काम सुरू आहे; मात्र त्याची खोली वस्तुस्थितीला धरून नाही. कॅनॉलपेक्षा बेड लेवलपेक्षा दोन मीटर खोल असल्याची माहिती जगताप यांनी दिली. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापन समान न्याय अशी मागणी होत आहे.