शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उजनीच्या पाण्यात दीड महिन्यात १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 01:33 IST

संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे.

पळसदेव : संपूर्ण महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास १२ टक्क्यांनी कमी झाला आहे. ३ आॅगस्ट रोजी उजनी धरणात १०६ टक्के पाणीसाठा होता; मात्र आजमितीला धरणात ९४.०९ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दीड महिन्यात १२ टक्के पाणी कमी झाल्यामुळे आगामी काळात काय परिस्थिती ओढवेल, याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे.उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकºयांवर अन्याय होत आहे. याबाबत इंदापूर तालुक्यातील शेतकºयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उजनी धरणासाठी आम्ही जमिनी दिल्या; मात्र आमचा कोणीही विचार करीत नाही. पुढील वर्षी उजनी भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही शेती करायची कशी? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. आमच्या हक्काचे पाणी ‘आरक्षित’ ठेवून सोलापूर जिल्ह्याला पाणी द्या; मात्र आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा इंदापूर तालुक्यातील ‘उजनी’ लगतच्या शेतकºयांनी दिला आहे.>उजनी धरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की उजनी धरणासाठी जमिनी देऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यामुळे येथील शेतकºयांवर अन्याय होता कामा नये. पाण्याचे वाटप होताना समन्यायी वाटप होणे गरजेचे आहे. आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा देऊन सध्या उजनी धरणातून जेऊर ते परंडा बोगद्याचे काम सुरू आहे; मात्र त्याची खोली वस्तुस्थितीला धरून नाही. कॅनॉलपेक्षा बेड लेवलपेक्षा दोन मीटर खोल असल्याची माहिती जगताप यांनी दिली. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापन समान न्याय अशी मागणी होत आहे.