शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
2
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
3
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
4
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
5
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
6
किडनी विक्रीतून रामकृष्णने घेतली २० एकर जमीन; फेसबुक ग्रुपद्वारे विणले अवयव तस्करीसाठी एजंटांचे जाळे
7
नव्या वर्षापासून UPI साठी लागू होणार नवा नियम; ई-कॉमर्स कंपन्यांच्या चलाखीवर बसणार चाबूक, प्रकरण काय?
8
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार की उद्धवसेनेत?; उद्धव ठाकरेंचा फोन, पुण्यात राजकीय ट्विस्ट
9
नवीन वर्षात गुंतवणुकीचा श्रीगणेशा! 'या' आहेत श्रीमंत करणाऱ्या टॉप ५ योजना; सुरक्षा आणि दमदार परतावा
10
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
11
Vijay Hazare Trophy : कोण आहे Devendra Bora? ज्याच्यासमोर हिटमॅन रोहित 'गोल्डन डक'सह ठरला फ्लॉप
12
भारतातील युपीआय व्यवहारांत मोठी प्रादेशिक दरी; महाराष्ट्र अग्रस्थानी तर बिहार पिछाडीवर, कारण काय?
13
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
14
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
15
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
16
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
17
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
18
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
19
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
20
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत १४.९६ टीएमसी गाळ

By admin | Updated: February 3, 2016 01:18 IST

गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

इंदापूर : गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्या पाण्याचा उपयोग धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यात असणाऱ्या; मात्र गेली दहा ते बारा वर्षे सिंचनापासून वंचित असणाऱ्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूरच्या टप्प्यातील १९ हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्रास होणार आहे. तथापि, गाळ काढण्यास धरणक्षेत्रातील शेतकरी व मच्छीमारांचा विरोध आहे. त्यामुळे सन २०११-१२ च्या सुमारास गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, आजच्या घडीला गाळामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्याकरिता, गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे अपरिहार्य आहे,अशी वस्तुस्थिती आहे. उजनी धरणाची मुळची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. सन १९७७ ला पहिल्यांदा धरणात पाणी अडविण्यात आले. सन १९८० मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले होते. मागील ३४ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. शासनाच्या ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. याच संस्थेने सन २००७ मध्ये पुन्हा गाळाचे सर्वेक्षण केले. त्या वेळी गाळाचे प्रमाण ८.४० टीएमसी होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून,जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ टीएमसी गाळ हा धरणातील उपयुक्त साठ्यात, तर ११.९६ टीएमसी गाळ मृत साठ्यात असल्याचे ही निष्पन्न झाले. साठलेल्या गाळाचा धरणांमधून कालवा व बोगद्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गाळामुळे साठवणुकीत घट झाली आहे. प्रकल्पिय तरतुदी नुसार गृहीत धरलेले सिंचन होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी गाळ काढणे अपरिहार्य आहे. धरणाचा पसारा व विस्तार पाहता, हे काम सोपे नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, बऱ्याच ठिकाणचा रस्त्यांचा अभाव आहे. जलवाहिनींचे जाळे, गाळ काढण्याऐवजी आत्ता काळ्या सोन्याचे मोल आलेली जलसाठ्यात खोलवर दडलेली वाळू उपसण्याकडेच असणारा कल, गाळ कोठे टाकायचा, हा उभा ठाकलेला प्रश्न ही सारी आव्हाने समोर आहेत. गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा लागणार आहे. उजव्या व डाव्या तीरावर सहा ते सात ठिकाणी टप्पे करावे लागणार आहेत. गाळपेर क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी उपाय करावे लागणार आहेत. उजनी धरणास स्वत:चे असे हक्काचे पाणलोट क्षेत्र नाही. त्या बाबतीत उजनी परावलंबी धरण आहे. दौंड ते उजनीपर्यंतच्या भागात अत्यल्प पाऊस पडतो. मावळ व भीमाशंकर खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला तरच उजनी भरते, अशी परिस्थिती आहे.