शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उजनीत १४.९६ टीएमसी गाळ

By admin | Updated: February 3, 2016 01:18 IST

गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे.

इंदापूर : गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. त्या पाण्याचा उपयोग धरणाच्या मूळ सिंचन आराखड्यात असणाऱ्या; मात्र गेली दहा ते बारा वर्षे सिंचनापासून वंचित असणाऱ्या मंगळवेढा, दक्षिण सोलापूरच्या टप्प्यातील १९ हजार हेक्टर कोरडवाहू क्षेत्रास होणार आहे. तथापि, गाळ काढण्यास धरणक्षेत्रातील शेतकरी व मच्छीमारांचा विरोध आहे. त्यामुळे सन २०११-१२ च्या सुमारास गाळ काढण्याच्या प्रक्रियेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, आजच्या घडीला गाळामुळे धरणाच्या पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्याकरिता, गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे अपरिहार्य आहे,अशी वस्तुस्थिती आहे. उजनी धरणाची मुळची पाणी साठवण क्षमता ११७ टीएमसी आहे. सन १९७७ ला पहिल्यांदा धरणात पाणी अडविण्यात आले. सन १९८० मध्ये पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यात आले होते. मागील ३४ वर्षांत धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. शासनाच्या ‘मेरी’ या नाशिक येथील संस्थेने सन २००२ मधे धरणातील गाळाचा अभ्यास केला. त्या काळात त्या संस्थेच्या अहवालानुसार धरणात ८.५८ टीएमसी गाळ साठल्याचे निदर्शनास आले होते. याच संस्थेने सन २००७ मध्ये पुन्हा गाळाचे सर्वेक्षण केले. त्या वेळी गाळाचे प्रमाण ८.४० टीएमसी होते. नोव्हेंबर २०११ मध्ये नवी दिल्ली येथील केंद्रीय जल आयोगाने ‘टुजो विकास’ या संस्थेच्या माध्यमातून,जीपीएस पद्धतीने गाळाचे फेरसर्वेक्षण केले. त्याचा अंतिम अहवाल मार्च २०१२ ला शासनास सादर केला, त्या वेळी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला असल्याचे स्पष्ट झाले. यापैकी ४ टीएमसी गाळ हा धरणातील उपयुक्त साठ्यात, तर ११.९६ टीएमसी गाळ मृत साठ्यात असल्याचे ही निष्पन्न झाले. साठलेल्या गाळाचा धरणांमधून कालवा व बोगद्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. गाळामुळे साठवणुकीत घट झाली आहे. प्रकल्पिय तरतुदी नुसार गृहीत धरलेले सिंचन होत नाही, अशी वस्तुस्थिती आहे.उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी गाळ काढणे अपरिहार्य आहे. धरणाचा पसारा व विस्तार पाहता, हे काम सोपे नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध, बऱ्याच ठिकाणचा रस्त्यांचा अभाव आहे. जलवाहिनींचे जाळे, गाळ काढण्याऐवजी आत्ता काळ्या सोन्याचे मोल आलेली जलसाठ्यात खोलवर दडलेली वाळू उपसण्याकडेच असणारा कल, गाळ कोठे टाकायचा, हा उभा ठाकलेला प्रश्न ही सारी आव्हाने समोर आहेत. गाळ काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा लागणार आहे. उजव्या व डाव्या तीरावर सहा ते सात ठिकाणी टप्पे करावे लागणार आहेत. गाळपेर क्षेत्र कसणाऱ्या शेतकऱ्यांचा विरोध मोडीत काढण्यासाठी उपाय करावे लागणार आहेत. उजनी धरणास स्वत:चे असे हक्काचे पाणलोट क्षेत्र नाही. त्या बाबतीत उजनी परावलंबी धरण आहे. दौंड ते उजनीपर्यंतच्या भागात अत्यल्प पाऊस पडतो. मावळ व भीमाशंकर खोऱ्यात समाधानकारक पाऊस झाला तरच उजनी भरते, अशी परिस्थिती आहे.