शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव-राणे वादंगामुळे याद आली ‘गुंड, षंढ आमदारां’ची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:15 IST

- सुकृत करंदीकर (लेखक ‘लोकमत’चे सहसंपादक आहेत.) ---------------------- वर्ष होतं १९८२. बॅॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या गच्छंतीनंतर बॅॅॅरिस्टर बाबासाहेब ...

- सुकृत करंदीकर

(लेखक ‘लोकमत’चे सहसंपादक आहेत.)

----------------------

वर्ष होतं १९८२. बॅॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या गच्छंतीनंतर बॅॅॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद चालून आलं. हे बॅॅरिस्टर तोलूनमापून बोलण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. मनात येईल ते बोलून मोकळे होणारा हा नेता. मुख्यमंत्रिपद जसं अचानक आलं तसंच ते गेलंही. त्यांचं तोंडंच त्याला कारणीभूत ठरलं. या फटकळ बाबासाहेबांना थेट इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. ‘हायकमांडने लादलेले’ असल्यानं कॉंग्रेस आमदारांनी त्यांना मनापासून कधी स्वीकारलं नव्हतं. साहजिकच मंत्रालयातल्या मजल्यांवर आणि विधिमंडळातल्या दालनांमध्ये बाबासाहेबांच्या विरोधातली कुजबूज चालू असायची. कॉंग्रेस आमदार बाबासाहेबांच्या विरोधात बंड करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला. साहजिकपणे पत्रकारांनी मुख्यमंत्री भोसले यांना विचारणा केली. त्यावर बॅॅरिस्टर बाबासाहेब उत्तरले, “आमच्या आमदारांची भाषा बंडाची, वृत्ती गुंडाची आणि कृती षंढाची असते. त्यांनी माझं सरकार पाडून दाखवावंच.” हे आव्हान देऊन ते थांबले नाहीत. पत्रकारांसोबतच्या याच गप्पांमध्ये त्यांनी स्वपक्षीय कॉंग्रेस आमदारांना उल्लेखून ‘गिधाडे’, ‘खटमल’, ‘मच्छर’ अशा उपमाही सढळपणे दिल्या.

नशीब त्याकाळी आत्तासारखा ‘सोशल मीडिया’ नव्हता. तरीही बॅॅरिस्टरांचे शब्द कॉंग्रेस आमदारांपर्यंत पोहोचले आणि स्फोटच झाला. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसच्याच आमदारांचं केलेलं हे वर्णन सामान्य माणसासाठी खूप गंमतीचं ठरलं. आमदार मात्र संतापले. चिडलेल्या आमदार नानाभाऊ एंबडवार यांनी स्वत:च्याच मुख्यमंत्र्यांविरोधात थेट हक्कभंग दाखल केला. हा अभूतपूर्व पेचप्रसंग होता. ‘हायकमांड’नं मध्यस्थी करत भोसलेंची पाठराखण केली. एवढं प्रक्षोभक बोलल्यानंतरही त्यांचं मुख्यमंत्रिपद शाबूत राहिलं. “निदान त्यांनी तरी मला शहाणपणा शिकवण्याची गरज आहे, असे मला वाटत नाही,” असं शरदराव पवार यांना विधानसभेतच सुनावण्याइतका फटकळपणा बॅॅरिस्टर भोसले यांच्याकडे होता. त्यांच्या अशाच शब्दांचा डोंगर साचत गेला आणि त्यांची खुर्ची गेली. त्याहीवेळी हा माणूस म्हणाला, “माझं मुख्यमंत्रिपद काढून घेतलं. पण ‘माजी मुख्यमंत्री’ हे बिरुद आता कायमचं लागलंय. ते कोण काढू शकतो?”

सभांमध्ये बोलताना श्रोत्यांच्या प्रतिसादामुळे चेकाळून जाणाऱ्यांचं काय होतं हे अजित पवार, प्रशांत परिचारक यांच्या रूपानं महाराष्ट्रानं अलिकडच्या काही वर्षात पाहिलं. सार्वजनिक आयुष्यात शब्द, शब्द जपून तोलून वापरला पाहिजे हा संकेत झाला. पण या संकेतभंगाची उदाहरणे पूर्वापार चालत आली आहेत. यशवंतराव चव्हाण यांना ‘सुसंस्कृत नेते’ म्हणून ओळखलं जातं ते केवळ त्यांच्या ग्रंथसंग्रहामुळं किंवा साहित्यिकांशी असलेल्या त्यांच्या व्यक्तिगत मैत्रीमुळं किंवा केवळ काही पुस्तकं लिहिली म्हणून नव्हे तर सार्वजनिक जीवनात आयुष्यभर त्यांनी भान राखलं म्हणून. त्यांचं नाव घेऊन राजकारण करणारे पुष्कळ आहेत, पण यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा अंगभूत सुसंस्कृतपणा किती जणांकडं असतो आणि सुसंस्कृतपणाचा वर्ख किती जणांवर असतो, हा कळीचा प्रश्न आहे. अगदी त्यांचे मानसपुत्र म्हणवल्या जाणाऱ्या शरद पवार यांनीही त्राग्यातून का होईना मित्रपक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारल्याची भाषा केली.