शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गायी आणताना दोन दिवसांचा केला प्रवास -अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:20 IST

तो काळ १९७५ चा असेल. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या.

बारामती : तो काळ १९७५ चा असेल. त्यावेळी अप्पासाहेबकाका आणि भाऊसाहेबकाकांनी गायी आणायच्या ठरवल्या. त्या गायी आणण्यासाठी बेंगलोरला मला आणि राजूदादाला पाठवले. त्यावेळी आम्ही दोघे १५— १६ वयाचे असू. स्कूटर घेऊन जाणाऱ्या तीन ट्रकमध्ये २४ गायी आम्ही आणल्या. गायी आणताना दोन रात्री व दोन दिवसांचा प्रवास केला. या दरम्यान, गायींचे मध्येच दूध काढले, त्यानंतर ते दूध हॉटेलवाल्यांना विकले. शेण काढायचे. रस्त्याला दिसेल तेथे पाणी शेंदायचे. आज पवार कुटुंबीयांनी मिळविलेल्या यशामागे आम्ही केलेले बरेच काम आहे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांनी मिश्कीलपणे कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला. तसेच बंधुत्वाच्या लहानपणीच्या आठवणी जागविल्या. या वेळी पवार म्हणाले, आबा (ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार) आणि बाईंनी (ज्येष्ठ नेते शरद पवार यांची आई शारदाबाई पवार) संपूर्ण पवार कुटुंब वाढविले. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दुसºया पिढीने देखील खूप कष्ट केले. अडचणीच्या काळातही प्रत्येकाला संस्कार देऊन शिक्षित केले. एसटीच्या प्रवासात जेवणाचे डबे विटायचे. मात्र सगळ्या काकांनी तसले डबे खाऊन आपापले शिक्षण पूर्ण केले. तिसरी पिढी म्हणून आमच्यावर प्रेशर होते.राजूदादा माझ्यापेक्षा १३ महिन्यांनी मोठा आहे. आमचे एकमेकांना सगळे माहिती आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्यावर आम्ही एकमेकांचे काहीच सांगितले नाही. सर्व झाकून ठेवले. तुम्ही किती वाकून पाहिले तरी तुमच्या हाती काहीच येणार नाही, असे म्हणून अजित पवार काही क्षण थांबले. त्यानंतर ‘आमचे बर चाललंय, तुम्हाला पवार अजूनही समजलेच नाहीत, असे मिश्कीलपणे पवार म्हणाले. त्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.या वेळी बारामती एमआयडीसीतील गदिमा सभागृहात अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनीदेखील त्यांच्या भाषणातून कौटुंबिक आठवणींना उजाळा दिला.>...गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढलीत्यावेळी शरदकाका मुंबईत होते. आम्ही मुंबईत एका कामासाठी गेलो होतो. माझ्याकडून काही चूक झाली होती. शरदकाका रागावतील या भीतीने आम्ही तिकडे गेलोच नाही. मात्र, मुंबईत गिरगावच्या चौपाटीवरील वाळूत आम्ही रात्र काढली. अशी जुन्या काळातील मुंबईची आठवण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली. ही आठवण ऐकताना सभागृह स्तब्ध होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार