शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

चोवीस दिवसांनंतर पुरंदर उपसा योजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

२५६ एमसीएफटी पाण्याला फटका : २५०० हेक्टर क्षेत्र अद्यापही वंचित

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करुणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजना २४ दिवसांपासून बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात आली. चोवीस दिवसांनंतर ही योजना आज सुरू करण्यात आली. ही योजना बंद राहिल्याने २५६ एमसीएफटी पाण्याचा लाभ शेतकºयांना मिळू शकला नाही. तसेच या पाण्यापासून भिजणारे २५०० हेक्टर क्षेत्रही कोरडे राहिल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका ज्वारी पिकाला बसला. २४ दिवसांनंतर ही योजना सुरू झाल्याने लाभार्थ्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याच्या मागणीत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एवढ्या अडचणी कधीच आल्या नाहीत. मात्र, या वर्षी या योजनेचे योग्य नियोजन झाले नाही. यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले. योजना एक दिवसही बंद राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र दिवाळीत ही योजना बंद होती. त्यानंतर शिंदवणे येथे अचानक वॉल सोडल्याने पुन्हा सुरळीत चालू असणारी योजना बंद झाली. त्यानंतर ५ डिसेंबरला माळशिरस वितरिकेचे पाणी राजेवाडी वितरिकेला दिल्याने जादा पाणी झाल्याने दाब येऊन राजेवाडी वितरिका तुटली. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले पाणी १५ डिसेंबरपासून बंद झाले. वास्तविक पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुरुस्ती करणाºया विभागाने याकडे पूर्ण काणाडोळा केला. येथील शेतकºयांनी गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी, कांदा इत्यादी पिके घेतली. या पाण्याने भिजवलीदेखील, मात्र ही योजना बंद राहिल्याने रब्बी हंगामातील पिके जळून गेली.ही योजना सुरू झाल्यानंतर पाणी कधी मिळेल, अशी विचारणा आज जोर धरू लागली आहे. मात्र, ज्या शेतकºयांना पैसे भरून पाणी दिले गेले नाही त्या शेतकºयांना सध्या पाणी दिले जात आहे. आपल्याला पाणी मिळावे यासाठी शेतकरी अधिकाºयांकडे पैसे भरत आहेत. एकंदरीत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता ही योजना बंद राहणार नाही व बंद राहिली तरी शेतकºयांना परवडणार नाही, याची अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांनी काळजी घेणेगरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणे