शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

चोवीस दिवसांनंतर पुरंदर उपसा योजना सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:58 IST

२५६ एमसीएफटी पाण्याला फटका : २५०० हेक्टर क्षेत्र अद्यापही वंचित

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करुणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजना २४ दिवसांपासून बंद असल्याने दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिके धोक्यात आली. चोवीस दिवसांनंतर ही योजना आज सुरू करण्यात आली. ही योजना बंद राहिल्याने २५६ एमसीएफटी पाण्याचा लाभ शेतकºयांना मिळू शकला नाही. तसेच या पाण्यापासून भिजणारे २५०० हेक्टर क्षेत्रही कोरडे राहिल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. याचा सर्वाधिक फटका ज्वारी पिकाला बसला. २४ दिवसांनंतर ही योजना सुरू झाल्याने लाभार्थ्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याच्या मागणीत यावर्षी प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजतागायत एवढ्या अडचणी कधीच आल्या नाहीत. मात्र, या वर्षी या योजनेचे योग्य नियोजन झाले नाही. यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजले. योजना एक दिवसही बंद राहणार नसल्याची ग्वाही जलसंपदा व जलसंधारणमंत्री विजय शिवतारे यांनी दिली होती. मात्र दिवाळीत ही योजना बंद होती. त्यानंतर शिंदवणे येथे अचानक वॉल सोडल्याने पुन्हा सुरळीत चालू असणारी योजना बंद झाली. त्यानंतर ५ डिसेंबरला माळशिरस वितरिकेचे पाणी राजेवाडी वितरिकेला दिल्याने जादा पाणी झाल्याने दाब येऊन राजेवाडी वितरिका तुटली. यामुळे पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे सुरू असलेले पाणी १५ डिसेंबरपासून बंद झाले. वास्तविक पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करणे गरजेचे होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. दुरुस्ती करणाºया विभागाने याकडे पूर्ण काणाडोळा केला. येथील शेतकºयांनी गहू, हरभरा, वाटाणा, ज्वारी, कांदा इत्यादी पिके घेतली. या पाण्याने भिजवलीदेखील, मात्र ही योजना बंद राहिल्याने रब्बी हंगामातील पिके जळून गेली.ही योजना सुरू झाल्यानंतर पाणी कधी मिळेल, अशी विचारणा आज जोर धरू लागली आहे. मात्र, ज्या शेतकºयांना पैसे भरून पाणी दिले गेले नाही त्या शेतकºयांना सध्या पाणी दिले जात आहे. आपल्याला पाणी मिळावे यासाठी शेतकरी अधिकाºयांकडे पैसे भरत आहेत. एकंदरीत सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता ही योजना बंद राहणार नाही व बंद राहिली तरी शेतकºयांना परवडणार नाही, याची अधिकारी, कर्मचारी व शेतकºयांनी काळजी घेणेगरजेचे आहे.

टॅग्स :Puneपुणे