शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीतील गाढवांच्या बाजारात ३ कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 20:20 IST

दीड हजारावर गाढवांची खरेदी-विक्री..

ठळक मुद्देजेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी पुरातन काळापासून प्रसिद्धराज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बारा बलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी-विक्री काठेवाडी गाढवाला ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव..

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीनगरीमध्ये सालाबादप्रमाणे व परंपरेनुसार पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त गाढवांचा बाजार भरला आहे. बुधवार (दि. ८)पासून सुरू झालेल्या बाजारात विविध जातींच्या गाढवांची खरेदी-विक्री होत असून या बाजारात दोन दिवसांत तीन कोटींची उलाढाल झाली आहे.जेजुरीत भरणारी पौष पौर्णिमा यात्रा गाढवांच्या बाजारासाठी पुरातन काळापासून प्रसिद्ध आहे. जेजुरीच्या खंडेरायाला साक्षी ठेवून गडाच्या पायथ्याला असलेल्या बंगाली पटांगणात शेकडो वर्षांपासून येथे राज्यातून व राज्याबाहेरून गावगाड्यातील आलेला बारा बलुतेदार परंपरेतले विविध जातींचे समाजबांधव गाढवांची खरेदी-विक्री करतात. मात्र, सध्या सगळा रोखीचा मामला झाला आहे. या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, कर्नाटक, आंध्र या राज्यांसह महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कराड, बार्शी, नगर, बारामती, पुणे, फलटण, जामखेड आदी ठिकाणांवरून वैदू, वडार, कैकाडी, बेलदार (पाथरवट) आदी समाजबांधव येथे विविध जातींच्या गाढवांसह दाखल होतात. गाढवांच्या खरेदी-विक्रीबरोबरच देवदर्शन, कुलधर्म-कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम येथे होतात.पूर्वीच्या काळी गाढवांचा वापर जड मालाच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर होत असे. आजच्या यांत्रिक युगामध्ये ओझे वाहण्यासाठी गाढवांचा वापर कमी झाला असला, तरी दऱ्या खोऱ्यांमध्ये व डोंगरमाथ्यावर, बहुमजली इमारतीच्या ठिकाणी अथवा जेथे वाहन जाणार नाही अशाठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा वापर आजही केला जातो. यंदाही दीड हजार विविध जातींची गाढवे जेजुरीच्या बाजारात दाखल झाली होती. विशेषत: राजस्थानी-काठेवाडी जातीच्या गाढवाला सर्वांत जास्त २५ ते ४० हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला. तर, गावरान -पुणेरी गाढवाला ७ ते २० हजार रुपये भावाची बोली लागत होती. राजस्थानी-काठेवाडी गाढव पांढरेशुभ्र असेल तर त्याला जास्तीचा बाजारभाव मिळत होता. कर्नाटक-आंध्र येथून आलेले व्यापारी भावांमध्ये घासाघीस करताना दिसून येत होते. पूर्वीच्या काळी गारुडी, कुंभार, परीट समाजबांधवही बाजारात दिसून येत. आता मात्र फक्त मोजकेच समाजबांधव खरेदी-विक्री करताना दिसतात. ............

गाढवाच्या दातावरून त्याच्या वयाचे अनुमान काढले जाते. दोन दातांचे ‘दुवान’ हे गाढव तरुण मानले जाते. चार दातांचे ‘चौवान’ हे मध्यमवयीन, तर ‘कोरा’ म्हणजे नुकतेच वयात येणारे असे अनुमान काढत त्यांचे दर ठरवले जातात. रंगावरूनही किमत करण्यात येते. पांढºयाशुभ्र जनावराला चांगला दर मिळतो. या बाजारात प्रथमच काळ्या रंगाचे उमदे जनावर भाव खात होते. त्यानंतर गडद जांभळा, तपकिरी लालसर, करडा अशा रंगाच्या प्रतवारीनुसार दर आकारले जात असल्याची माहिती पुणे येथील व्यापारी बापू धोत्रे यांनी दिली.

पूर्वीच्या काळी येथील बाजारात व तीन ते चार दिवस चालणाºया यात्रेत गाढवांच्या खरेदी-विक्रीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असे; परंतु सध्या परिस्थिती तशी राहिलेली नाही. केवळ वाडवडिलांनी घालून दिलेली येथील परंपरा जोपासण्यासाठी ही यात्रा करायची, असे काही समाजबांधवांनी सांगितले.

पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भातू कोल्हाटी आणि वैदू समाज यांच्या जातपंचायती भरतात. मात्र, या जातपंचायती वादग्रस्त ठरल्याने दोन वर्षांपासून त्या बंद झालेल्या आहेत.  पोलिसांकडून परवानगी नसल्याने त्या याही वर्षी होणार नाहीत. काल ‘लोकमत’ने या बाजारातील असुविधांबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी घेतली. ‘यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांना कोणत्याही असुविधा निर्माण होऊ नयेत, यात जातीने लक्ष घालत आहे. त्याचबरोबर ही परंपरा जतन करण्यासाठी पालिका प्रशासनासह आम्ही सर्वच जण भविष्यात योग्य ते नियोजन करू,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा