शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तुळशीबागेतील अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: May 19, 2015 01:09 IST

तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली.

पुणे : तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली. दिवसभर हा परिसर मोकळा दिसत होता. त्यामुळे भांडणानंतर, डोळे उघडलेले प्रशासन या पुढेही अशीच जागरूकता दाखविणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पालिकेने या परिसरात जोरदार कारवाई केली. बेलबाग चौक, बाबू गेनू चौक, तुळशीबाग परिसर आणि मंडई परिसराचा काही भाग, या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यात सुमारे ४१ पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तुळशीबाग परिसरात रस्त्यावर पथारी मांडण्यावरून यापूर्वीही वाद झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या परिसरात पथारी लावण्यावरून एकाचा धारदार शस्त्रांनी भर दिवसा खून झाला होता. त्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी फेरीवाला संघटनांकडूनही केली जात होती. पालिकेने गेल्या काही दिवसांपासून त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांची अनेकदा कानउघाडणी केलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रविवारी पुन्हा या ठिकाणी रसाचे गुऱ्हाळ लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून अतिक्रमणे रोखण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (प्रतिनिधी)फिक्स पॉइंटचे काय झाले?४या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फिक्स पॉइंट लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही काळ हा पॉइंटही लावण्यात आला होता. त्यानुसार, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी गस्त घालत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा फिक्स पॉइंटही बंद करण्यात आला आहे. तर महापालिकेचे पथक बाहेर पडताच अतिक्रमण करणारे पथारी व्यावसायिक तत्काळ गायब होतात. त्यामुळे प्रशासनाचा अतिक्रमणांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.