शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

तुळशीबागेतील अतिक्रमणे हटविली

By admin | Updated: May 19, 2015 01:09 IST

तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली.

पुणे : तुळशीबागेत व्यवसाय करण्यावरून रविवारी ( दि. १७) झालेल्या भांडणाच्या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने सोमवारी दिवसभर तुळशीबागेत अतिक्रमणांवर कारवाई केली. दिवसभर हा परिसर मोकळा दिसत होता. त्यामुळे भांडणानंतर, डोळे उघडलेले प्रशासन या पुढेही अशीच जागरूकता दाखविणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पालिकेने या परिसरात जोरदार कारवाई केली. बेलबाग चौक, बाबू गेनू चौक, तुळशीबाग परिसर आणि मंडई परिसराचा काही भाग, या ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. त्यात सुमारे ४१ पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तुळशीबाग परिसरात रस्त्यावर पथारी मांडण्यावरून यापूर्वीही वाद झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी या परिसरात पथारी लावण्यावरून एकाचा धारदार शस्त्रांनी भर दिवसा खून झाला होता. त्यामुळे परिसरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी फेरीवाला संघटनांकडूनही केली जात होती. पालिकेने गेल्या काही दिवसांपासून त्याकडे दुर्लक्ष केले होते. गेल्या आठवड्यात पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनीही या परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांची अनेकदा कानउघाडणी केलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रविवारी पुन्हा या ठिकाणी रसाचे गुऱ्हाळ लावण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून अतिक्रमणे रोखण्यात महापालिका प्रशासनास अपयश येत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. (प्रतिनिधी)फिक्स पॉइंटचे काय झाले?४या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असल्याने अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फिक्स पॉइंट लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर काही काळ हा पॉइंटही लावण्यात आला होता. त्यानुसार, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या ठिकाणी कायमस्वरूपी गस्त घालत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा फिक्स पॉइंटही बंद करण्यात आला आहे. तर महापालिकेचे पथक बाहेर पडताच अतिक्रमण करणारे पथारी व्यावसायिक तत्काळ गायब होतात. त्यामुळे प्रशासनाचा अतिक्रमणांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे.