शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

देहू अन् आळंदी युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत: खासदार संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 19:49 IST

केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन

पिंपरी: संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे देहूगाव आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे क्षेत्र युनेस्कोच्या जागतिक अमृत हेरिटेजमध्ये समाविष्ट करावीत, यासाठी मी केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देहू येथे दिले.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीमहाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अनुबंध उलगडताना संभाजी महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांची गुरुस्थानी मानले होते आणि तुकाराम महाराजांनी सांगितले, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे, अशी आमची भावना आहे.’’.................................संभाजीराजे म्हणाले, ‘‘युनिस्कोमध्ये जागतिक वारसा हक्क मध्ये दोन प्रकार असतात. एक म्हणजे अमृत जागतिक वारसा हक्क आणि दुसरे म्हणजे मृत जागतिक वारसा हक्क. महाराष्ट्रातील जागतिक वारसा हक्क म्हणून तीन स्थळांची नोंद आहे. एक म्हणजे अजंठा- वेरुळची लेणी, दुसरा एलिफंटा आणि तिसरा मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस हे होय. ज्या गोष्टीला स्पर्श करता येत नाही अशा अमृत वारसा हक्क मध्ये नोंद करता येते. वारीला साडे तीनशे वर्षांची परंपरा आहे. या सोहळ्यात २० लाख लोक एकत्र येतात. ही गोष्ट अमृत वारसा हक्क यामध्ये नोंदविली जावी, यासाठी युनेस्कोमध्ये नोंद होण्यासाठी दोन वर्षे अगोदर मी संसदेत विषय मांडला होता. रायगडास मृत वारसा हक्क मध्ये नोंद करण्याबरोबरच देहू आणि आळंदीला मोठी परंपरा आहे. या स्थळांची नोंद अमृत जागतिक वारसा हक्कमध्ये करावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’......................घरीच बसून वारी करासंभाजीमहाराज यांनी वारकऱ्यांनी घरीच बसून वारी करावी, असे आवाहन केले आहे. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संकटात आपण सगळे आहोत. त्यामुळे वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. संकटातून बाहेर येण्यासाठी आपण सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यामुळे यंदाची वारी ही घरीच बसून अनुभवावी. कोरोना गेल्यानंतर पुढील वर्षी आपण मोठ्या उत्साहाने हा सोहळा साजरा करू.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant tukaramसंत तुकारामAlandiआळंदी