शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

समानतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 01:39 IST

तृप्ती देसाई : देहूगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

देहूगाव : महिला आणि पुरुष समानतेसाठीच्या संघर्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जातो. संघर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती आणि राज्यघटना यामुळे यश मिळाले आहे. महिलांनी आमच्या पुढे जाऊ नये यासाठीच धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी काही प्रथा व नियम केले आहेत, असे मत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूगावच्या माळीनगर येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देसाई बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब जांभूळकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला काळोखे, सचिन विधाटे, पूनम काळोखे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश हगवणे, प्रकाश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मावळ तालुका उपाध्यक्षा वैशाली टिळेकर, ज्योती रोहिदास टिळेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच ज्योती टिळेकर यांचा या वेळी नागरी सत्कार करण्यात आला. रवींद्र जांभूळकर यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळशी तालुक्यातील लवळे येथील सर्जेराव खेडकर यांचाही या वेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. माळीनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले होते. सुरेश कुरपे यांनी प्रास्ताविक केले. शेखर परंडवाल यांनी सूत्रसंचालन केले. सुनील विधाटे, अशोक परंडवाल यांनी परिश्रम घेतलेआपल्या देशात स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. समाजात प्रत्येकाला आई, बहीण व बायको हवी मात्र मुलगी नको असते. मुलगा आणि मुलगी दोघेही आपले वारसदार आहेत. त्यांना आपल्या घरापासूनच समानतेची शिकवण दिली पाहिजे. समाजाने मुलींच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, वेळप्रसंगी महिलांनी व मुलींनी आक्रमक होऊन दुर्गेचे रूप घेतले पाहिजे तरच अन्याय दूर होतील.- तृप्ती देसाई, प्रमुख, भूमाता ब्रिगेडदेशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी सामान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. महिला जगल्या तरच समाज जगणार आहे. महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी लढले पाहिजे. मानसिकता बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलली जाणार नाही. याच देशात ‘बेटी बचाव’ कार्यक्रम करावे लागत आहेत. समाजाची नेमकी समस्या समजली पाहिजे, त्याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. स्त्रीयांच्या संरक्षणाची गरज आहे. यासाठी मुलींनी व महिलांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. - प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड

टॅग्स :PuneपुणेSabarimala Templeशबरीमला मंदिर