शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

समानतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 01:39 IST

तृप्ती देसाई : देहूगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

देहूगाव : महिला आणि पुरुष समानतेसाठीच्या संघर्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जातो. संघर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती आणि राज्यघटना यामुळे यश मिळाले आहे. महिलांनी आमच्या पुढे जाऊ नये यासाठीच धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी काही प्रथा व नियम केले आहेत, असे मत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूगावच्या माळीनगर येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देसाई बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब जांभूळकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला काळोखे, सचिन विधाटे, पूनम काळोखे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश हगवणे, प्रकाश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मावळ तालुका उपाध्यक्षा वैशाली टिळेकर, ज्योती रोहिदास टिळेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच ज्योती टिळेकर यांचा या वेळी नागरी सत्कार करण्यात आला. रवींद्र जांभूळकर यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळशी तालुक्यातील लवळे येथील सर्जेराव खेडकर यांचाही या वेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. माळीनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले होते. सुरेश कुरपे यांनी प्रास्ताविक केले. शेखर परंडवाल यांनी सूत्रसंचालन केले. सुनील विधाटे, अशोक परंडवाल यांनी परिश्रम घेतलेआपल्या देशात स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. समाजात प्रत्येकाला आई, बहीण व बायको हवी मात्र मुलगी नको असते. मुलगा आणि मुलगी दोघेही आपले वारसदार आहेत. त्यांना आपल्या घरापासूनच समानतेची शिकवण दिली पाहिजे. समाजाने मुलींच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, वेळप्रसंगी महिलांनी व मुलींनी आक्रमक होऊन दुर्गेचे रूप घेतले पाहिजे तरच अन्याय दूर होतील.- तृप्ती देसाई, प्रमुख, भूमाता ब्रिगेडदेशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी सामान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. महिला जगल्या तरच समाज जगणार आहे. महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी लढले पाहिजे. मानसिकता बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलली जाणार नाही. याच देशात ‘बेटी बचाव’ कार्यक्रम करावे लागत आहेत. समाजाची नेमकी समस्या समजली पाहिजे, त्याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. स्त्रीयांच्या संरक्षणाची गरज आहे. यासाठी मुलींनी व महिलांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. - प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड

टॅग्स :PuneपुणेSabarimala Templeशबरीमला मंदिर