शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

समानतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 01:39 IST

तृप्ती देसाई : देहूगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

देहूगाव : महिला आणि पुरुष समानतेसाठीच्या संघर्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जातो. संघर्षासाठी प्रामाणिक प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती आणि राज्यघटना यामुळे यश मिळाले आहे. महिलांनी आमच्या पुढे जाऊ नये यासाठीच धर्माच्या तथाकथित ठेकेदारांनी काही प्रथा व नियम केले आहेत, असे मत भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त देहूगावच्या माळीनगर येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी देसाई बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, स्वातंत्र्यसेनानी बाळासाहेब जांभूळकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला काळोखे, सचिन विधाटे, पूनम काळोखे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य प्रकाश हगवणे, प्रकाश टिळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या मावळ तालुका उपाध्यक्षा वैशाली टिळेकर, ज्योती रोहिदास टिळेकर आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव व हवेली पंचायत समितीच्या सभापती हेमलता काळोखे, सरपंच ज्योती टिळेकर यांचा या वेळी नागरी सत्कार करण्यात आला. रवींद्र जांभूळकर यांना युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुळशी तालुक्यातील लवळे येथील सर्जेराव खेडकर यांचाही या वेळी विशेष नागरी सत्कार करण्यात आला. माळीनगर येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानतर्फे आयोजन करण्यात आले होते. सुरेश कुरपे यांनी प्रास्ताविक केले. शेखर परंडवाल यांनी सूत्रसंचालन केले. सुनील विधाटे, अशोक परंडवाल यांनी परिश्रम घेतलेआपल्या देशात स्त्री-पुरुषांना समानतेचा अधिकार मिळाला असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. याची सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे. समाजात प्रत्येकाला आई, बहीण व बायको हवी मात्र मुलगी नको असते. मुलगा आणि मुलगी दोघेही आपले वारसदार आहेत. त्यांना आपल्या घरापासूनच समानतेची शिकवण दिली पाहिजे. समाजाने मुलींच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत, वेळप्रसंगी महिलांनी व मुलींनी आक्रमक होऊन दुर्गेचे रूप घेतले पाहिजे तरच अन्याय दूर होतील.- तृप्ती देसाई, प्रमुख, भूमाता ब्रिगेडदेशात सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. त्यासाठी सामान्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. महिला जगल्या तरच समाज जगणार आहे. महिलांनी स्वत:च्या हक्कांसाठी लढले पाहिजे. मानसिकता बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलली जाणार नाही. याच देशात ‘बेटी बचाव’ कार्यक्रम करावे लागत आहेत. समाजाची नेमकी समस्या समजली पाहिजे, त्याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. स्त्रीयांच्या संरक्षणाची गरज आहे. यासाठी मुलींनी व महिलांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. - प्रवीण गायकवाड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य संभाजी ब्रिगेड

टॅग्स :PuneपुणेSabarimala Templeशबरीमला मंदिर