शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

संभाजी ब्रिगेडने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, सर्व पक्षांविरोधात उभे राहण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:38 IST

पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले.

पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. सर्वच पक्षांवर जोरदार टीका करीत राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील पहिल्या वर्धापनदिनामित्त पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश संघटक अमोल मिटकरी, प्रवक्ते गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भाणुसे, मराठा सेवा संघाचे मधुकर मेहकरे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्य शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला एका शेतक-याच्या हाताने फाशी देऊन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भांडारकर संस्था प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या कार्यकर्त्यांसह अ‍ॅड. मिलिंद पवार व समीर घाडगे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. इम्तियाज पिरजादे यांनी यावेळी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. आखरे म्हणाले, सध्या सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांचे आपआपसांत लागेबांधे आहे.राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. आज नेतृत्वाचा दुष्काळ असून ही पोकळी भरून काढण्याचे काम करावे लागणार आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्याविरुद्ध आगामी निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी सज्ज राहा. नोटाबंदी करून पंतप्रधानांनी नागरिकांची आर्थिक कोंडी केली आहे. जीएसटीचा निर्णयही चुकला आहे. ब्रिगेडने खुप आंदोलने केली असून आता अंबानींच्या घरासमोर आंदोलन करून दगड मारल्याशिवाय समाधान मिळणार नाही, असे खेडेकर यांनी नमुद केले. बनबरे, मेहकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.-----------------------------आशिष फडणवीस करतात डीलअमृता फडणवीस या भाजपा सरकारच्या पहिल्या लाभार्थी आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे त्यांचे भाऊ आशिष फडणवीस सांभाळतात, अशी जोरदार टीका अमोल मिटकरी यांनी केली. ते कोणत्या हॉटेलमध्ये बसून कुणासोबत डील करतात, याचे सर्व रेकॉर्ड आहे. निवडणुकीवेळी ते बाहेर काढू, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विटकरी यांनी अण्णा हजारे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड