शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

संभाजी ब्रिगेडने फुंकले निवडणुकीचे रणशिंग, सर्व पक्षांविरोधात उभे राहण्याचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2017 19:38 IST

पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले.

पुणे : प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात उभे राहून जनतेला चांगला पर्याय देण्याचा निर्धार करीत संभाजी ब्रिगेडने कार्यकर्ता महामेळाव्यात राज्यात 2019मध्ये होणा-या निवडणुकांचे रणशिंग फुंकले. सर्वच पक्षांवर जोरदार टीका करीत राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले.संभाजी ब्रिगेडच्या राजकारणातील पहिल्या वर्धापनदिनामित्त पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते. ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. मनोज आखरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश संघटक अमोल मिटकरी, प्रवक्ते गंगाधर बनबरे, डॉ. शिवानंद भाणुसे, मराठा सेवा संघाचे मधुकर मेहकरे, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्य शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याला एका शेतक-याच्या हाताने फाशी देऊन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. भांडारकर संस्था प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या कार्यकर्त्यांसह अ‍ॅड. मिलिंद पवार व समीर घाडगे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. इम्तियाज पिरजादे यांनी यावेळी ब्रिगेडमध्ये प्रवेश केला. आखरे म्हणाले, सध्या सर्व राजकीय पक्षांतील नेत्यांचे आपआपसांत लागेबांधे आहे.राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायला हवेत. आज नेतृत्वाचा दुष्काळ असून ही पोकळी भरून काढण्याचे काम करावे लागणार आहे. प्रस्थापित राजकारण्यांच्याविरुद्ध आगामी निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी सज्ज राहा. नोटाबंदी करून पंतप्रधानांनी नागरिकांची आर्थिक कोंडी केली आहे. जीएसटीचा निर्णयही चुकला आहे. ब्रिगेडने खुप आंदोलने केली असून आता अंबानींच्या घरासमोर आंदोलन करून दगड मारल्याशिवाय समाधान मिळणार नाही, असे खेडेकर यांनी नमुद केले. बनबरे, मेहकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.-----------------------------आशिष फडणवीस करतात डीलअमृता फडणवीस या भाजपा सरकारच्या पहिल्या लाभार्थी आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत. त्यांची भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणे त्यांचे भाऊ आशिष फडणवीस सांभाळतात, अशी जोरदार टीका अमोल मिटकरी यांनी केली. ते कोणत्या हॉटेलमध्ये बसून कुणासोबत डील करतात, याचे सर्व रेकॉर्ड आहे. निवडणुकीवेळी ते बाहेर काढू, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. विटकरी यांनी अण्णा हजारे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

टॅग्स :Puneपुणेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेड