शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

समताधिष्ठित ध्यासपर्वाचा अंत, भाई वैैद्य यांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 04:13 IST

जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे - जातीयुद्ध, धर्मयुद्ध थांबविण्यासाठी बाबासाहेबांचा कृती कार्यक्रम राबवावा, सर्व चळवळींची एकजूट व्हावी, अशी भार्इंची इच्छा होती. त्यांच्या निधनाने मूल्याधिष्ठित आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीच्या ध्यासपर्वाचा अंत झाला आहे, अशा शब्दांत मान्यवरांनी ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृह राज्यमंत्री भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला. सुनीती सु.र. यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचा शोकसंदेश वाचून दाखविला. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्यासह डॉ. अभिजित वैद्य, सोशलिस्ट पार्टी (इंडिया)चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या इला दलवाई म्हणाल्या, ‘‘मेहरुन्निसा दलवार्इंपाठोपाठ भाईही गेले. मुस्लिम पुरोगामी चळवळ कशी असावी, याबाबत भार्इंचे विचार ठोस होते. मात्र, आपले विचार त्यांनी कधीच कोणावर लादले नाहीत. त्यांच्याकडे चळवळीसाठी दूरदृष्टी होती. आमच्या दोन्ही कुटुंबांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गेल्या काही काळात मुस्लिम पुरोगामी चळवळीबाबत भार्इंनी मलाही मार्गदर्शन केले. हमीद दलवार्इंना जगाला परिचित करून देण्याचे श्रेय त्यांना जाते. दलवार्इंच्या माहितीपटाच्या कामात ते सहभागी झाले. त्यांच्या निधनाने मुस्लिम पुरोगामी चळवळीला कायम उणीव भासणार आहे.’’ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी म्हणाले, ‘‘भार्इंनी कायम समाजाच्या समतेचा विचार मांडला. कळत्या वयापासून मावळत्या वयापर्यंत समाजवादावर अविरत निष्ठा असणारे ते कलासक्त कर्मयोगी होते. ते समाजाच्या विशाल वर्गाचे शिक्षक होते. समाजाच्या वाळवंटात समाजवादाची स्वस्तिक चिन्हे उमटविण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्नकेला.’’मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे सय्यदभाई, एस. एम. जोशी फाउंडेशनचे अभय जोशी, किसान संघर्ष समितीचे सुनीलम, अंनिसचे मिलिंद देशमुख, बाळासाहेब शिवरकर, कम्युनिस्ट नेते अजित अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.सेवा दलाचे काम घराघरांत हीच श्रद्धांजलीराष्ट्र सेवा दलाचे अल्लाउद्दीन शेख म्हणाले, ‘‘भाई आपल्यात नाहीत ही बाब अजूनही मनाला पटत नाही. ते आमचे खंदे मार्गदर्शक होते. त्यांच्या रूपाने कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याशी चर्चा म्हणजे कार्यकार्यांना मेजवानी असायची. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून आता चाचपडत चालावे लागणार आहे. सेवा दलाचे काम गावागावांत, घराघरांत पोहोचविणे हीच भार्इंना खरी श्रद्धांजली ठरेल.’’पुढील काळात देशात जातीयुद्ध आणि धर्मयुद्ध पेटणार आहे, याचा उल्लेख भाई गेल्या काही काळात वारंवार करायचे. या युद्धाचा सामना करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कृती कार्यक्रम राबवावा, अशी त्यांची इच्छा होती.सध्या देशाचे संविधान धोक्यात आले आहे. असहिष्णुता वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक चळवळीने वेगळा लढा उभारण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.- म. ना. कांबळे

टॅग्स :Bhai Vaidyaभाई वैद्यPuneपुणे