शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:10 IST

सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, असे मत लोकगीत गायकांनी व्यक्त केले.

पुणे : सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, असे मत लोकगीत गायकांनी व्यक्त केले.मानसिक शांती मिळवण्याचा, आनंदी राहण्याचा रामबाण उपाय म्हणजे संगीत. अनेक गाण्यांवर आपण ठेका धरतो, उडत्या चालीच्या गाण्यांवर आपली पावले थिरकतात. परंतु, या गायकांचे चेहरे आपल्या कधीच समोर आलेले नसतात. लोकगीते रचणारे गायक, संगीतकार यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जागतिक संगीत दिनानिमित्त संवाद साधला. ‘सुया घे, पोत घे’, ‘आला बाबुराव’, ‘खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी, ‘ओ माय गॉड, मला लागलं तुझं याड’ अशी गाणी त्यांनी गायली.प्रदीप कांबळे म्हणाले, ‘लोकगीतांना गेल्या काही काळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिकीकरणाचे वारे वाहत असले तरी सामान्यांचे मातीशी असलेली नाळ अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील, बोलीभाषेतील शब्द लोकांना आपलेसे वाटतात. त्यामुळे ही गाणी अल्पावधीत लोकप्रिय होतात.’सचिन अवघडे म्हणाले, ‘इतर गायकांच्या तुलनेत बरेचदा आमच्यासारखे कलाकार प्रसिध्दीपासून दूर राहतात. मात्र, एकदा गाणी हिट झाली की चांगले कार्यक्रमही मिळतात. त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळते.’राखी चौरे म्हणाल्या, ‘लोकगीतांमध्ये मुलींची संख्या नक्कीच कमी आहे. मात्र, आपला आवाजही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे वाटले. तुझ्या खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी’ या गाण्याचे तुफान लोकप्रियता मिळवून दिली. मला लहानपणापासून गवळणीसारखे प्रकार ऐकायला आवडतात. गाण्यांचे जुने प्रकारही नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत.’रोमिओ कांबळे म्हणाले, ‘शासनाने लोककलावंतांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोककलावंतांनी आपली संस्कृती, परंपरा ख-या अर्थाने जपली आहे. त्यामुळे कलेबाबतची सरकारची उदासिनता दूर होणे आवश्यक आहे.’  

टॅग्स :music dayसंगीत दिनmusicसंगीतcultureसांस्कृतिक