शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो : लोकगीत गायकांनी व्यक्त केले मत (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:10 IST

सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, असे मत लोकगीत गायकांनी व्यक्त केले.

पुणे : सध्याचा जमाना सोशल मिडियाचा आहे. लोकगीतांनाही सोशल मिडियाने तारले आहे. पूर्वी गाणे गणेशोत्सव, दहीहंडीमध्ये वाजले की सुपरहिट व्हायचे. आताच्या गाण्यांचा ट्रेंड टिक टॉकवरुन ठरतो. एखादे गाणे टिक टॉकसाठी सातत्याने वापरले गेल्यास ते सर्वत्र लोकप्रिय होते, असे मत लोकगीत गायकांनी व्यक्त केले.मानसिक शांती मिळवण्याचा, आनंदी राहण्याचा रामबाण उपाय म्हणजे संगीत. अनेक गाण्यांवर आपण ठेका धरतो, उडत्या चालीच्या गाण्यांवर आपली पावले थिरकतात. परंतु, या गायकांचे चेहरे आपल्या कधीच समोर आलेले नसतात. लोकगीते रचणारे गायक, संगीतकार यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने जागतिक संगीत दिनानिमित्त संवाद साधला. ‘सुया घे, पोत घे’, ‘आला बाबुराव’, ‘खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी, ‘ओ माय गॉड, मला लागलं तुझं याड’ अशी गाणी त्यांनी गायली.प्रदीप कांबळे म्हणाले, ‘लोकगीतांना गेल्या काही काळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. जागतिकीकरणाचे वारे वाहत असले तरी सामान्यांचे मातीशी असलेली नाळ अधिकाधिक घट्ट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील, बोलीभाषेतील शब्द लोकांना आपलेसे वाटतात. त्यामुळे ही गाणी अल्पावधीत लोकप्रिय होतात.’सचिन अवघडे म्हणाले, ‘इतर गायकांच्या तुलनेत बरेचदा आमच्यासारखे कलाकार प्रसिध्दीपासून दूर राहतात. मात्र, एकदा गाणी हिट झाली की चांगले कार्यक्रमही मिळतात. त्यातून समाधानकारक उत्पन्न मिळते.’राखी चौरे म्हणाल्या, ‘लोकगीतांमध्ये मुलींची संख्या नक्कीच कमी आहे. मात्र, आपला आवाजही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, असे वाटले. तुझ्या खिशात असंल मनी, तर मागं लागतील सतरा जणी’ या गाण्याचे तुफान लोकप्रियता मिळवून दिली. मला लहानपणापासून गवळणीसारखे प्रकार ऐकायला आवडतात. गाण्यांचे जुने प्रकारही नव्या पिढीपर्यंत पोचले पाहिजेत.’रोमिओ कांबळे म्हणाले, ‘शासनाने लोककलावंतांची दखल घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोककलावंतांनी आपली संस्कृती, परंपरा ख-या अर्थाने जपली आहे. त्यामुळे कलेबाबतची सरकारची उदासिनता दूर होणे आवश्यक आहे.’  

टॅग्स :music dayसंगीत दिनmusicसंगीतcultureसांस्कृतिक