शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षकी पेशाकडे विद्यार्थ्यांचा कल कमीच; ४५ हजार जागा राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 03:12 IST

यंदा केवळ १० हजार प्रवेश

पुणे : प्राथमिक शाळांमधील शिक्षक पदाची पात्रता असलेल्या डीएड (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या शेवटची फेरी संपत आली तरी अद्याप केवळ १० हजार ३०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत, त्यामुळे राज्यभरातून यंदा ४५ हजार ३३८ जागा रिक्त राहणार आहेत. शासनाने शिक्षक भरती बंद करून डीएड पदविकाधारकांबाबत दाखवलेल्या प्रचंड उदासीनतेमुळे विद्यार्थी डीएडऐवजी इतर अभ्यासक्रमांकडे वळू लागले आहेत.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ८४७ डी.एड. महाविद्यालयांच्या ५५ हजार ६४४ जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. शेवटची फेरी येत्या ३१ जुलै रोजी संपत आहे. आतापर्यंत केवळ १० हजार ३०६ विद्यार्थ्यांनी डिएड अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला. शासकीय अनुदानित असलेल्या २५ हजार तर एकूण ४५ हजार ३३८ जागा रिक्त राहत आहे.सहा-सात वर्षांपूर्वी बारावी चांगले मार्क मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही डिएड अभ्यासक्रमास असायची, त्यामुळे डिएडला प्रवेश मिळणे मोठे जिकिरीचे ठरत होते. दरम्यानच्या काळात मोठया प्रमाणात डिएड कॉलेजला मान्यता देण्यात आल्या. त्याचबरोबर शिक्षकांची नोकरी भरतीच बंद करून टाकली. परिणामी अनेक डिएड कॉलेज बंद पडत असून प्रवेशाच्या हजारो जागा रिक्त राहू लागल्या आहेत.शासनाने सन २०१२ शिक्षक भरतीवर बंदी घातली आहे, त्यामुळे गेल्या ६ वर्षांपासून डिएड करून बाहेर पडलेले लाखो पदविकाधारक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर प्राथमिकला शिक्षक म्हणून नोकरी करायची असेल तर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. या परीक्षेची काठिण्यपातळी अधिक ठेवण्यात आल्याने अनेकजण ती उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. त्याचबरोबर आता गुणवत्तेच्या आधारावर नोकरी देणार असे स्पष्ट करून राज्यभरातील डिएड उमेवादारांची आणखी एक शिक्षक अभियोग्यता परीक्षा शासनाकडून घेण्यात आली आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारावर नोकरी दिली जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या परीक्षेचा निकाल लागून अनेक महिने उलटले तरी अद्याप शासनाने शिक्षक भरती सुरू केलेली नाही. त्यामुळे डिएड झाल्यानंतर टीईटी उत्तीर्ण होणे, त्यानंतर अभियोग्यता चाचणीच्या तीव्र स्पर्धेला सामोरे जाणे. हे दिव्य पार पाडल्यानंतर ३ वर्षे तुटपुंज्या पगारावर शिक्षण सेवक म्हणून काम करणे शिक्षकांना भाग आहे. त्यामुळे शिक्षकी पेशाकडे वळण्यास विद्यार्थी नकार देऊ लागले आहेत.शिक्षकी भरती केव्हा?राज्य शासनाकडून २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आलेली आहे. त्याचे दूरगामी परिणाम शिक्षकी वर्तुळात होत आहेत.जून २०१८ मध्ये शिक्षक भरतीवरील बंदी उठविली जाईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले होते. मात्र जुलै महिना उलटला तरी अद्याप शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यात आली नाही. त्यामुळे डिएड व बीएड पदवीधारक विद्यार्थ्यांमध्ये मोठयाप्रमाणात नाराजीची भावना आहे.१०३ कॉलेज बंद अन् साडेचार हजार जागा कमीमागील वर्षी डीएडच्या ९४९ कॉलेजमध्ये ६० हजार जागा उपलब्ध होत्या. विद्यार्थ्यांनी डीएडच्या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्याने १०२ डीएड कॉलेज बंद पडले असून ४ हजार ३५६ जागा कमी झाल्या आहेत. तरीही यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकEducationशिक्षण