शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वृक्ष तोड-लागवडीचे होणार आॅडीट - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 04:05 IST

बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे.

पुणे : बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्या आदींना त्यांच्या आराखड्यानुसार (प्लॅन) झाडे तोडण्याची परवानगी देताना मान्य केल्याप्रमाणे किती झाडांची लागवड केली याचे मागील पाच वर्षांचे आॅडीट केले जाणार आहे. आॅडीटमध्ये दोषी आढळलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दिली.मुंबईसह पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. तसेच विविध कंपन्या, खासगी कार्यालये यांना बांधकामाचे प्लॅन मंजूर करताना येथील जागेतील झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना एका झाडामागे तीन झाडांची अन्यत्र मोकळ्या जागेत लागवड करण्याची अट घातली जाते. मात्र, अनेकदा अट मंजूर करुन घेतली जाते, परंतु झाडेच लावली जात नाहीत. त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होते आहे. बांधकाम व्यावसायिक, कंपन्या, उद्योजक यांच्याकडून झालेल्या वृक्ष लागवडीचे मागील पाच वर्षांचे आॅडीट करुन त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.मुठा नदीची पाहणी करून अहवाल द्यापुण्यातील मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर सांडपाणी सोडण्यात येत असून नदी पात्रात अतिक्रमणे वाढली आहेत. डीपी रस्त्यावर मंगल कार्यालये, लॉन्स आणि हॉटेल्स वाढली आहेत. नदीमधील पाणी प्रचंड प्रदुषित झाले आहे. या सर्व स्थितीचा आढावा घेऊन दोषींवर कारवाई करून सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.संजय राऊत यांच्या टीकेनंतरही आपली भूमिका ठाम‘आपल्याला भाजपा, शरद पवार, नारायण राणे यांच्याबद्दल न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून त्यामुळे घशाला त्रास होतो’ असा उपरोधिक टोला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सध्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राजकीय पक्षांना लगावला. गुढी पाडव्याला प्लॅस्टीक बंदी करण्यावर माझा भर आहे. त्यामुळे राजकारणावर भाष्य टाळत असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्यावतीने विधानभवन येथे महसुली विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबालगन यांच्यासह पाच जिल्ह्णातील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांची बैठक पार पडली. बैठकीदरम्यान त्यांनी फटाके बंदीचा निर्णय योग्य होता आणि त्यामुळे मुंबईत यंदा 70 टक्के कमी फटाके वाजल्याचे स्पष्ट केले.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील नांदेड महापालिकेने शहरात दहा पक्के नाले बांधून सगळे सांडपाणी गोदावरी नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांसह अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच अशोक चव्हाण यांनी आपली भेट घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण त्यांना कायदा म्हणजे कायदा असे सांगितल्याचेही कदम यांनी अधिका-यांना सांगितले.पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना राजकीय प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे टाळत प्लॅस्टीक बंदी आणि थर्मोकोल बंदी हीच आपल्यापुढील महत्वाची कामे असून कायदा बनविण्यात व्यस्त असल्याचे सांगितले. त्यामुळे आपण शरद पवार, नारायण राणे, भाजप आणि विधान परिषद निवडणुकीबद्दल बोलणार नसल्याचे सांगितले.दिवाळीपुर्वी फटाके वाजविण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हिंदुविरोधी निर्णय असल्याची टीका झाली होती. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही त्याला विरोध करीत माझ्यावर टीका केली होती. मात्र, माझी भुमिका योग्य असल्याने आम्ही हा निर्णय लावून धरला. त्याचा परिणाम चांगलाझाल्याचे पहायला मिळाले. यंदा मुंबईमध्ये फटाके वाजविण्याचे प्रमाण 70 टक्क्यांनी कमी झाल्याचे रामदास कदम म्हणाले.

टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमPuneपुणे