शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

पंढरपूर वारी २०१९ : पंढरीच्या वाटेवर चालताना मिळतो सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2019 13:47 IST

गावात मिळणारी अपमानास्पद वागणूक, कुटुंबाने बाहेर काढले, समाजाने नाकारले, नशिबी केवळ उपेक्षाच. मात्र पंढरीच्या वाटेवर चालताना वारकरी चांगली वागणूक देतात हिच विठ्ठलाची कृपा

अमोल अवचिते 

माळशिरस : गावात मिळणारी अपमानास्पद वागणूक, कुटुंबाने बाहेर काढले, समाजाने नाकारले, नशिबी केवळ उपेक्षाच. मात्र पंढरीच्या वाटेवर चालताना वारकरी चांगली वागणूक देतात हिच विठ्ठलाची कृपा, हे बोल आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाळखी सोहळ्यात यवतमाळहून आलेले तृतीयपंथी वारकरी शिवाजी संजय तिडके यांचे. घरची वारकरी परंपरा असून ती सुरू ठेवण्यासाठी ते वारी करत आहेत. 

टाळी वाजवून पैशांची मागणी करून कसाबसा उदरनिर्वाह केला जातो. मात्र फक्त पैसा हेच सर्वस्व नसतो. तृतीयपंथी यांना देखील देव असतो. आणि तो आमचा देव म्हणजे विठ्ठल आहे. असे तिडके या भक्ताला वाटते. म्हणून वारीत असताना कधीही पैशाची तो मागणी करत नाहीत. त्याच्या सोबत वारीत आणखी पन्नास जण आहेत. ते वारीत आले ते केवळ विठ्ठलासाठीच. 

पाच वर्षांपासून सोहळ्यात सहभागी होऊन माऊलींची सेवा करण्याची संधी मिळते. वारकऱ्यांनी दिलेली चांगली वागणूक हाच विठ्ठलाचा आशीर्वाद त्यांना वाटतो. दरवर्षी  येणाऱ्या चांगल्या अनुभवांमुळे गावात मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचा त्यांना विसर पडतो. तृतीय  समाजाकडे तिरस्काराने  न पाहाता त्याला सन्मान द्यावा जेणे करून आमच्या समाजला जगण्याची इच्छा  राहील. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील हर्सूल दिग्रज गावात ते युवकांसाठी नवचेतना युवा विकास संस्थेच्या माध्यमातून काम करतात.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीPuneपुणे