शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:52 IST

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील पंधरा गावांना बीएसएनएल कंपनीचे टॉवर मंजूर झाले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून हे टॉवर मंजूर झाले असून वर्षानुवर्षे नॉट रीचेबाल असणारी आंबेगाव तालुक्यातील दुर्गम खेडी आता रिचेबल होणार आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या. या भागात बीएसएनएलचे कंपनीचे टॉवर व्हावेत अशी लोकांची मागणी होती. त्या नुसार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन महीन्यापूर्वी संबंधित विभागाला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

बीएसएनएल कंपनीने केलेल्या सर्व्हे नुसार तालुक्याच्या दुर्गम भागातील साकेरी, मेघोली, नांदूरकीचीवाडी, फुलवडे ,पिंपरी, सावारली, कुशिरे बुद्रुक, पाटण, न्हावेड, बोरघर, तिरपाड, आघाने, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव आणि तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या आहुपे गावांसाठी बीएसएनएल कंपनीचे एकूण पंधरा टॉवर मंजूर करण्यात केले आहेत. टॉवर उभारण्याचे काम एप्रील २०२३ अखेर पर्यंत पूर्ण होणार असून संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी केले आहे.ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी लगेच काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएल कंपनीकडून देण्यात आली. 

टॅग्स :ambegaonआंबेगावBSNLबीएसएनएलMobileमोबाइलGovernmentसरकार