शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

आंबेगाव तालुक्यातील १५ गावात BSNL कंपनीचे टॉवर; दुर्गम आदिवासी खेडी होणार रिचेबल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 15:52 IST

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील पंधरा गावांना बीएसएनएल कंपनीचे टॉवर मंजूर झाले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नांतून हे टॉवर मंजूर झाले असून वर्षानुवर्षे नॉट रीचेबाल असणारी आंबेगाव तालुक्यातील दुर्गम खेडी आता रिचेबल होणार आहेत.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील काही गावांत अजूनही मोबाईलच्या रेंज मिळण्यास अडचणी येत होत्या. या भागात बीएसएनएलचे कंपनीचे टॉवर व्हावेत अशी लोकांची मागणी होती. त्या नुसार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन महीन्यापूर्वी संबंधित विभागाला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

बीएसएनएल कंपनीने केलेल्या सर्व्हे नुसार तालुक्याच्या दुर्गम भागातील साकेरी, मेघोली, नांदूरकीचीवाडी, फुलवडे ,पिंपरी, सावारली, कुशिरे बुद्रुक, पाटण, न्हावेड, बोरघर, तिरपाड, आघाने, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव आणि तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या आहुपे गावांसाठी बीएसएनएल कंपनीचे एकूण पंधरा टॉवर मंजूर करण्यात केले आहेत. टॉवर उभारण्याचे काम एप्रील २०२३ अखेर पर्यंत पूर्ण होणार असून संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी केले आहे.ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील त्या ठिकाणी लगेच काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएल कंपनीकडून देण्यात आली. 

टॅग्स :ambegaonआंबेगावBSNLबीएसएनएलMobileमोबाइलGovernmentसरकार