शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठीचे तब्बल १ लाख अर्ज अपात्र , उर्वरित गावांतील चावडी वाचन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. अर्ज बाद झाल्याची अधिकृत आकडेवारी सल्याचे सहकार विभागातील अधिकाºयांनी सांगितले आहे. परंतु, एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्जबाद होणार असल्याचे दिसून आल्याचे सांगितले आहे.कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता राज्यातील शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार अर्ज आले. ३० जून रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर कर्ज परतफेड करणाºयांना पंचवीस टक्के तर, कमाल पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी अशा तीन टप्प्यांत लाभ देण्यात येणार आहे.दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख ९९ हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे ४० हजार असे एकूण ३ लाख ३९ हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिली होती.पुण्यात शेती असलेल परंतु, पुण्याबाहेर राज्यभरातील विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या शेतकºयांची संख्या ५ हजार ४३५ एवढी असल्याचे छाननी प्रक्रियेमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून आलेल्या २ लाख ९८ हजार ५६ अर्जांमध्ये या अर्जांची भर पडली असून, जिल्ह्यातून कर्जमाफीकरिता एकूण ३ लाख ३ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाल्याची नोंद शासन स्तरावर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १ हजार ४६४ गावांमध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अर्जदारांच्या याद्यांचे जाहीर चावडी वाचन करण्यात आले आहे.चावडी वाचनामध्ये १ हजार २४१ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे तर, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने २२३ गावांमध्ये चावडीवाचनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपल्याबरोबरच लागलीच उर्वरित गावांमधील चावडीवाचन होणार आहे.कोणते टप्प्यातील अर्ज अधिक बाद ?योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना एकूण अर्जांपैैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होण्याचा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झाल्याची अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. राज्य शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यातील आकडेवारी समोर आली आहे, याबाबत माहिती नाही, अशी माहिती सहकार विभागाकडून मंगळवारी देण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार