शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

कर्जमाफीसाठीचे तब्बल १ लाख अर्ज अपात्र , उर्वरित गावांतील चावडी वाचन लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 03:00 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते.

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभासाठी आलेल्या अर्जांपैकी तब्बल १ लाख १४ हजार ८४६ अर्ज अपात्र ठरले आहेत. या योजनेसाठी २ लाख ९८ हजार ५६ आॅनलाइन अर्ज आले होते, अशी माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. अर्ज बाद झाल्याची अधिकृत आकडेवारी सल्याचे सहकार विभागातील अधिकाºयांनी सांगितले आहे. परंतु, एकूण अर्जांपैकी दहा ते बारा टक्के अर्जबाद होणार असल्याचे दिसून आल्याचे सांगितले आहे.कर्जमाफीचा लाभ मिळविण्याकरिता राज्यातील शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी २२ सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली. त्यानुसार पुणे जिल्ह्यातून २ लाख ९८ हजार अर्ज आले. ३० जून रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. तर कर्ज परतफेड करणाºयांना पंचवीस टक्के तर, कमाल पंचवीस हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी अशा तीन टप्प्यांत लाभ देण्यात येणार आहे.दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे २ लाख ९९ हजार, व्यावसायिक आणि खासगी बँकांचे अनुक्रमे ४० हजार असे एकूण ३ लाख ३९ हजार कर्जदार शेतकरी जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारला दिली होती.पुण्यात शेती असलेल परंतु, पुण्याबाहेर राज्यभरातील विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या शेतकºयांची संख्या ५ हजार ४३५ एवढी असल्याचे छाननी प्रक्रियेमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातून आलेल्या २ लाख ९८ हजार ५६ अर्जांमध्ये या अर्जांची भर पडली असून, जिल्ह्यातून कर्जमाफीकरिता एकूण ३ लाख ३ हजार ४९१ अर्ज प्राप्त झाल्याची नोंद शासन स्तरावर आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील १ हजार ४६४ गावांमध्ये कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ योजनेच्या अर्जदारांच्या याद्यांचे जाहीर चावडी वाचन करण्यात आले आहे.चावडी वाचनामध्ये १ हजार २४१ गावांमध्ये चावडीवाचन पूर्ण झाले आहे तर, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने २२३ गावांमध्ये चावडीवाचनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया संपल्याबरोबरच लागलीच उर्वरित गावांमधील चावडीवाचन होणार आहे.कोणते टप्प्यातील अर्ज अधिक बाद ?योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी करताना एकूण अर्जांपैैकी दहा ते बारा टक्के अर्ज बाद होण्याचा अंदाज होता. मात्र, जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी अपात्र झाल्याची अधिकृत आकडेवारी आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. राज्य शासनाकडून तीन टप्प्यांमध्ये कर्जमाफी मिळणार आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या टप्प्यातील आकडेवारी समोर आली आहे, याबाबत माहिती नाही, अशी माहिती सहकार विभागाकडून मंगळवारी देण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार