शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

सरकारी ‘डेडलाइन’ पाळताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:19 IST

शासनाने नागरिकांना आयटी रिर्टन भरण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांना ‘महाराष्ट्र रिअल इस्टेच रेग्युलेटरी अथॉरिटी(रेरा) कायद्याअतंर्गत नोंदणी करणे

पुणे : शासनाने नागरिकांना आयटी रिर्टन भरण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांना ‘महाराष्ट्र रिअल इस्टेच रेग्युलेटरी अथॉरिटी(रेरा) कायद्याअतंर्गत नोंदणी करणे, शेतकºयांना सन २०१७ च्या खरीप हंगामा अतंर्गत पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल करणे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार नाव नोंदणी मोहिमे अतंर्गत अर्ज दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अखेरची मुदत होती.त्यात अखेरच्या क्षणी संकेतस्थळ हॅग होणे,आधार लिंक न होणे, एकाच केंद्रावर प्रचंड गर्दी यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत नागरिकांना ही ‘डेड लाईन’ पाळताना प्रचंड दमछाक झाली. यामध्ये आयटी रिर्टन, रेराची नोंदणी आणि पीक विमाचे अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.रेराची नोंदणीसाठी शेवटपर्यंत ओढाताण-बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्या अतंर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदा तयार केला. महाराष्ट्र शासनाने १ मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये इंटरनेटची सुविधेचा अभाव, अर्जामध्ये असलेली क्लिष्टता, सोबत द्यावयाची प्रचंड कागदपत्रे आणि शेवटच्या क्षणापर्यंत अनेक गोष्टींबाबत स्पष्टता नसल्याने अद्यापही हजरो प्रकल्पांची रेरा अंतर्गत नोंद झालेली नाही. राज्यात हजारो प्रकल्प सुरु असताना ३१ जुलै अखेर पर्यंत केवळ साडे आठ ते नऊ हजार प्रकल्पांची नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे यासाठी देखील मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा बोजवारा-४शासनाने यंदा पीक विमा योजनेचे अर्ज आॅनलाईन भरणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडालेला असताना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना तासतास रांगामध्ये उभे राहावे लागत आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील३१ जुलै ही अखेरची मुदत होती. बोगस शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ मिळू नये यासाठी देखील आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु प्रयत्न करून देखील राज्यातील लाखो शेतक-यांना पीक विमा योजनेचे अर्ज दाखल करता आलेले नाही. यासाठी मुदत वाढ द्यावी म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.