शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी ‘डेडलाइन’ पाळताना दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:19 IST

शासनाने नागरिकांना आयटी रिर्टन भरण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांना ‘महाराष्ट्र रिअल इस्टेच रेग्युलेटरी अथॉरिटी(रेरा) कायद्याअतंर्गत नोंदणी करणे

पुणे : शासनाने नागरिकांना आयटी रिर्टन भरण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांना ‘महाराष्ट्र रिअल इस्टेच रेग्युलेटरी अथॉरिटी(रेरा) कायद्याअतंर्गत नोंदणी करणे, शेतकºयांना सन २०१७ च्या खरीप हंगामा अतंर्गत पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज दाखल करणे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विशेष मतदार नाव नोंदणी मोहिमे अतंर्गत अर्ज दाखल करण्यासाठी ३१ जुलै ही अखेरची मुदत होती.त्यात अखेरच्या क्षणी संकेतस्थळ हॅग होणे,आधार लिंक न होणे, एकाच केंद्रावर प्रचंड गर्दी यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत नागरिकांना ही ‘डेड लाईन’ पाळताना प्रचंड दमछाक झाली. यामध्ये आयटी रिर्टन, रेराची नोंदणी आणि पीक विमाचे अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.रेराची नोंदणीसाठी शेवटपर्यंत ओढाताण-बांधकाम क्षेत्रावर नियंत्रण आणण्यासाठी आणि ग्राहकांना अधिकाधिक कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्या अतंर्गत महाराष्ट्र शासनाने रियल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (रेरा) हा बांधकाम क्षेत्राच्या नियमनासाठी स्वतंत्र कायदा तयार केला. महाराष्ट्र शासनाने १ मे पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आता प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी बांधकाम व्यावसायिकांना किंवा विकासकांना या प्राधिकरणाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये इंटरनेटची सुविधेचा अभाव, अर्जामध्ये असलेली क्लिष्टता, सोबत द्यावयाची प्रचंड कागदपत्रे आणि शेवटच्या क्षणापर्यंत अनेक गोष्टींबाबत स्पष्टता नसल्याने अद्यापही हजरो प्रकल्पांची रेरा अंतर्गत नोंद झालेली नाही. राज्यात हजारो प्रकल्प सुरु असताना ३१ जुलै अखेर पर्यंत केवळ साडे आठ ते नऊ हजार प्रकल्पांची नोंदणीसाठी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे यासाठी देखील मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटीचा बोजवारा-४शासनाने यंदा पीक विमा योजनेचे अर्ज आॅनलाईन भरणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागात इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडालेला असताना आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शेतक-यांना तासतास रांगामध्ये उभे राहावे लागत आहे. सन २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील३१ जुलै ही अखेरची मुदत होती. बोगस शेतकºयांना पीक विमा योजनेचा लाभ मिळू नये यासाठी देखील आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले. परंतु प्रयत्न करून देखील राज्यातील लाखो शेतक-यांना पीक विमा योजनेचे अर्ज दाखल करता आलेले नाही. यासाठी मुदत वाढ द्यावी म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.