शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

चार खासदार असणाऱ्या शरद पवारांवर राजकीय निवृत्तीची वेळ

By admin | Updated: January 22, 2017 04:37 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे.

बारामती : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे खासदार कधी पक्ष सोडतील याची शाश्वती नाही, लोकसभेत केवळ चार खासदार असणाऱ्या शरद पवार यांची राजकीय निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधानांना बारामतीची एकच बाजू दाखवण्यात आली, त्यामुळे त्यांनी कौतुक केले. मात्र, सतत दुष्काळात असलेल्या अर्ध्या बारामतीची परिस्थिती वेगळीच आहे. बारामती तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ही वस्तुस्थिती देखील पुढे आली पाहिजे, अशी परखड टीका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. बारामती तालुक्यातील कारखेल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना देशमुख यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका केली. अर्ध्या बारामतीची जनता दुष्काळाने ग्रस्त आहे, असे असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदान करून नेते तयार केले काय अशी शंका येते, अशीही टीका त्यांनी केली. अजित पवार यांच्या कार्यकाळात सिंचनावर ७० हजार कोटी रुपये खर्च झाले, परंतु बारामतीचा दुष्काळदेखील त्यांना हटवता आला नाही, यासारखे दुर्दैव नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शरद पवार २००४ मध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. ते शक्य झाले नाही. आता तर तशी परिस्थिती राहिलेली नाही. सध्या केवळ चार खासदार असलेल्या पवारांना निवृत्तीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीचा दौरा केला. तो पवार यांच्या खासगी संस्थांचा. त्यांना बारामतीचा एक भाग दाखवण्यात आला. परंतु, उर्वरित बारामतीची स्थिती वेगळीच आहे. हे चित्रदेखील जगापुढे आले पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या खासदारांची स्थिती देखील दोलायमान आहे. ते कधी पक्ष सोडतील, याची शाश्वती नाही, अशी टिप्पणीदेखील त्यांनी केली. यावेळी महात्मा फुले समता परिषदेच्या तालुकाध्यक्षांसह अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करताना छगन भुजबळ यांना तुरुंगात डांबण्याची व्यवस्था राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केली, असा आरोप केला. (प्रतिनिधी)