शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पैसे नसल्यामुळे येत आहे विद्यार्थ्यांवर जीव देण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 23:51 IST

इंदापूर तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. अशा विपरीत परिस्थितीमुळेच विद्यार्थ्यांना खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागतो.

भिगवण : इंदापूर तालुक्यात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था एक आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या हजारोच्या घरात आहे. अशा विपरीत परिस्थितीमुळेच विद्यार्थ्यांना खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घ्यावा लागतो. अशा संस्थांमध्ये प्रवेशशुल्काच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांवर जीव देण्याची वेळ येते, अशी भावना मदनवाडीच्या साईनाथ पोपळभट याच्या आत्महत्येनंतर व्यक्त होत आहे.

इंदापूर तालुका औद्योगिक उत्पादने तयार करण्याबाबत जगाच्या नकाशावर नाव कोरणारा तालुका आहे. संरक्षण दलातील उत्पादनांपासून विमानाचे भाग बनविण्यासाठी या तालुक्यातील वालचंदनगरची ओळख आहे. तीन साखर कारखाने आणि फॅब्रिकेशन उत्पादनांचे प्रकल्प असणाºया या तालुक्यात एमआयडीसीही सुरू करण्यात आली आहे. अनेक उद्योजकांना येथे गुंतवणुकीस प्रोत्साहन देऊन रोजगार वाढविण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. असे असताना या प्रकल्पांसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मात्र एकच आहे. करोडो रुपयांच्या जाहिराती करणाºया शासकीय यंत्रणेने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या वाढविली असती, तर फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे जीव द्यायची वेळ साईनाथ पोपळभट या विद्यार्थ्यावर आली नसती. त्यामुळे शासनाने इंदापूर तालुक्यात कळस- लासुर्णे भागात तसेच भिगवणसारख्या व्यावसायिक बाजारपेठेसारख्या गावात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची उभारणी करणे गरजेचे आहे. यातून फी भरता येत नाही, म्हणून आणखीन कोणी साईनाथ गळफास लावून घेणार नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. साईनाथच्या अचानक जाण्याने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आश्रमशाळांच्या ठिकाणी मदत करणाºया भिगवणकरांनी साईनाथची मदत करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक एम. जी. जगताप यांनी केला.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची अपुरी संख्यातालुक्याची भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा हे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे या भागातील तरुणांना आयटीआय प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो रुपयांची फी भरून खासगी केंद्रात प्रवेश घ्यावा लागतो. ज्यांना फी भरणे शक्य होते असे विद्यार्थी प्रवेश घेतात; मात्र ज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे अशांना आपल्या इच्छेला मुरड घालून इतर कोर्सकडे वळावे लागते.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSuicideआत्महत्या