शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

‘मेट्रो’साठी तीन कंपन्या पात्र; ३५ वर्षांच्या करारासाठीचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 06:08 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केल्या जाणा-या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पासाठी टाटा रिलायन्स- सिमेन्स, आयएलएफएस आणि आयबीआर या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) केल्या जाणा-या शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पासाठी टाटा रिलायन्स- सिमेन्स, आयएलएफएस आणि आयबीआर या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत.त्यातील कमीतकमी व्यवहार्यता अनुदान निधी (गॅप फंडिंग) मागणा-या कंपनीला निविदेच्या माध्यमातून काम दिलेजाणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी ३५ वर्षांचा करार केला जाणार असून, कराराचा मसुदा तयार करण्याचेकाम सुरू आहे.पीएमआरडीएने पहिल्या निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण केले असून, दुसºया टप्प्यातील कामास सुरुवात केली आहे. नोव्हेंबरमध्ये अंतिम निविदेचे काम पूर्णकेले जाणार आहे. त्यानंतर संबंधित कंपन्यांना बाजारात पैसे उभे करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यातयेईल. परिणामी मेट्रोचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यास २०१८ उजाडणार आहे. प्रकल्पासाठी पात्र ठरलेल्या दोन कंपन्यांना मेट्रोचा अनुभव आहे.निविदेच्या दुसºया टप्प्यात गॅप फंडिंग होईल. किमान गॅप फंडिंग मागणाºया कंपनीला मेट्रोचे काम देण्याची शक्यता आहे. संबंधित कंपनीला काम देण्यापूर्वी निश्चित तिकीट दर, स्थानक संख्या आदी गोष्टी निश्चित केल्या जातील.कर्ज घेण्यास मान्यता देणार...मेट्रो प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला तीस टक्के स्वत:चा निधी, तर सत्तर टक्के कर्ज घेण्यास मान्यता दिली जाणार आहे.त्यासाठी संबंधित कंपनीला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्याचा अनुभव असणे अपेक्षित आहे, आदी गोष्टी तपासून संबंधित कंपनीला मेट्रोचे काम दिले जाईल.निविदेच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो प्रकल्पासाठी कोणती निविदा पात्र आहे, याबाबतच्या पाहणीनुसार एका लाईनवर सुमारे ३ लाख वाहतूक होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रस्तावित मार्गावर एवढी वाहतूक आहे का? तसेच ५ ते ३ मिनिटांनी सुटणाºया मेट्रोला एवढे प्रवासी मिळतील का? तिकीट दर किती ठेवावा, प्रकल्पाची रक्कम ८ ते १० वर्षांत वसूल होणार असल्याने तांत्रिक, कायदेशीर, आर्थिक हे सर्व पैलू पहिल्या टप्प्यात पडताळून पाहण्यात आले.शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो प्रकल्पाचे सिव्हिल व रोलिंगचे काम एकच कंपनी करणार आहे. प्रत्येक कामासाठी येथे वेगळी निविदा काढली जाणार नाही. निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित कंपनीला बाजारातून पैसे उभे करण्यास अवधी दिला जाईल. त्यानंतर मेट्रोच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यात येईल.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :Metroमेट्रो