शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

किरकोळ कारणावरून प्राणघातक हल्ला करणा-या तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:30 IST

लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे.

 

पुणे : लाईट बंद का केला नाही म्हणून लाकडी बांबू, लोखंडी सळईच्या सहाय्याने प्राणघातक हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी करणा-या तिघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे़ निवृत्ती किसन शिलीमकर (वय ३०, रा. कोथरूड), व्यंकटेश शिवशंकर अनपुर (वय ३१), लहु यादव शेडगे (वय २३,  दोघेही रा़ वारजे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़ शंकर हनुमंत धोत्रे (वय ३७,रा. वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये धोत्रे यांचा चुलत मेव्हणा राजू बजरंग कुसाळकर (वय ३८,रा. वारजे) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला ३४ टाके पडले आहेत. तर शंकर धोत्रेही जखमी झाले आहेत. हा प्रकार वारजे येथीलगोकुळनगर येथे  मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे.धोत्रे हे कॅब चालविण्याचा व्यावसाय करतात. ते घरी जातअसताना, वाटेत त्यांचे चुलत मेव्हणे राजू एकटेच बसलेले दिसले़ धोत्रे यांनी गाडी चालू ठेवून खाली आले आणि दोघे बोलत थांबले होते. यावेळी पुढे काही अंतरावर उभा असलेल्या एकाने त्यांना शिवीगाळ करत लाईट बंद करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी घाबरून जाऊन लाईट बंद केली. तरी देखील आरोपीने लाकडी बांबूने राजू यांच्या डोक्यात जोरात फटके मारले. रक्तबंबाळ अवस्थेत राजू खाली पडले. त्यानंतर दुसºया एकाने देखील लोखंडी सळईने छातीवर व डोक्यात मारहाण केली. हा सर्व प्रकार सुरू असताना धोत्रे यांनी धावत गाडीतून मेव्हण्याला सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना देखील मारहाण केली. त्यांच्या गाडीचीकाच फोडली व ते पळून गेले़ राजू कुसाळकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले़ दारू पिण्यासाठी आरोपी त्या ठिकाणी बसले होते. गाडीची लाईट अंगावर पडल्यामुळे हा प्रकार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे़

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असली तरी तिघांनी केलेल्या हल्ल्यात राजू कुसाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत़ त्यांच्या डोक्यात ३४ टाके पडले आहेत़ असे असतानाही पोलिसांनी ३०७ खुनाचा प्रयत्न चे कलम न लावता ३२६, ३४१, ३२३, ५०४, ४२७ अशी किरकोळ कलमांखाली गुन्हा दाखल केला असल्याचे कुसाळकर यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे़ स्थानिक परिसरात राहणाºया नागरिकांनी सांगितले की, मागील अनेक दिवसापासून या परिसरात सराईतांचा वावर वारला असून, किरकोळ कारणातून नागरिकांना विनाकारण मारहाण केली जात आहे. तसेच दारुड्यांनी उच्छाद मांडला आहे़ परिसरातील लोकांवर अचानक हल्ला करणे, दारु राडा करणे, वाहनांची तोडफोड करणे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईकरावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत.