शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:01 IST

शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

- मनोहर बोडखे पाटस : शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होत गावाला अपूर्ण स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे.पाटस ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेला वेळोवेळी गळती बंद होण्यासंदर्भात लेखी स्वरुपात सूचना करूनदेखील याकडे प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.वरवंड (ता. दौंड) येथील तलावातून पाटस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडले जाते. हे पाणी पाटस येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते आणि तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो.पाटस गावाच्या जवळील तामखडा येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी पाण्याची गळती लागल्याने २४ तास पाणी वाया जात आहे. परिणामी ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. पाटस गावातील काही भागांत पाण्याची टंचाई असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन गळती झालेले पाण्याचे रुपांतर सांडपाण्यात होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने जलवाहिनीची गळती काढून पाणीगळती थांबवणे काळाची गरज आहे.>योजना हस्तांतरितकेली नाहीपाटस गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ग्रामपंचायतीकडे अद्याप लेखी स्वरुपात हस्तांतरित झालेली नाही. वरवंड ते पाटसदरम्यान जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला याबाबत लेखी स्वरुपात गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- वैैजयंता म्हस्के (सरपंच, पाटस)>योजना हस्तांतरित केलीवासुंदे पाणीपुरवठा योजना बंद आहे. तेव्हा या योजनेवर खर्च झालेला पैैसा वाया जाऊ नये, म्हणून तसेच पाटस हे मोठे गाव असल्यामुळे या योजनेचा फायदा पाटसला व्हावा, म्हणून योजनेच्या जलवाहिनीची डागडुजी करून तसेच जलशुद्धीकरण योजना सुरू करून ही योजना पाटस ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या योजनेच्या देखभालीची योजना पाटस ग्रामपंचायतीकडे आहे. परिणामी ग्रामपंचायतीला तांत्रिक मदत करता आली तर ती आम्ही करू शकतो.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण>पाण्याचा प्रवाह कमी होत आहेजलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यासंदर्भात परिस्थितीची पाहणी केली असून पाणी वाया जात आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- विलास भापकर, ग्रामविस्तार अधिकारी, पाटस