शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

पाटसला हजारो लिटर पाण्याचा अपव्यय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:01 IST

शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

- मनोहर बोडखे पाटस : शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाटस गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पाणी वाया जात असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होत गावाला अपूर्ण स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याची वस्तुस्थिती आहे.पाटस ग्रामपंचायतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेला वेळोवेळी गळती बंद होण्यासंदर्भात लेखी स्वरुपात सूचना करूनदेखील याकडे प्राधिकरण विभागाने दुर्लक्ष केले आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, दररोज हजारो लिटर पाणी वाया जाणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.वरवंड (ता. दौंड) येथील तलावातून पाटस गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी सोडले जाते. हे पाणी पाटस येथील जलशुद्धीकरण केंद्रात येते आणि तेथून गावाला पाणीपुरवठा केला जातो.पाटस गावाच्या जवळील तामखडा येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गेलेली आहे. या जलवाहिनीला ठिकठिकाणी पाण्याची गळती लागल्याने २४ तास पाणी वाया जात आहे. परिणामी ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचलेले आहे. पाटस गावातील काही भागांत पाण्याची टंचाई असल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती होऊन गळती झालेले पाण्याचे रुपांतर सांडपाण्यात होत आहे. तेव्हा शासनाने तातडीने जलवाहिनीची गळती काढून पाणीगळती थांबवणे काळाची गरज आहे.>योजना हस्तांतरितकेली नाहीपाटस गावाला पाणीपुरवठा करणारी योजना ग्रामपंचायतीकडे अद्याप लेखी स्वरुपात हस्तांतरित झालेली नाही. वरवंड ते पाटसदरम्यान जलवाहिनी आहे. या जलवाहिनीला काही ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे पाणी वाया जात आहे. तेव्हा पाणीगळती थांबविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला याबाबत लेखी स्वरुपात गेल्या वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.- वैैजयंता म्हस्के (सरपंच, पाटस)>योजना हस्तांतरित केलीवासुंदे पाणीपुरवठा योजना बंद आहे. तेव्हा या योजनेवर खर्च झालेला पैैसा वाया जाऊ नये, म्हणून तसेच पाटस हे मोठे गाव असल्यामुळे या योजनेचा फायदा पाटसला व्हावा, म्हणून योजनेच्या जलवाहिनीची डागडुजी करून तसेच जलशुद्धीकरण योजना सुरू करून ही योजना पाटस ग्रामपंचायतीला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या योजनेच्या देखभालीची योजना पाटस ग्रामपंचायतीकडे आहे. परिणामी ग्रामपंचायतीला तांत्रिक मदत करता आली तर ती आम्ही करू शकतो.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण>पाण्याचा प्रवाह कमी होत आहेजलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागली आहे. यासंदर्भात परिस्थितीची पाहणी केली असून पाणी वाया जात आहे. त्यामुळे गावाला पाणीपुरवठा करताना पाण्याचा प्रवाह कमी होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- विलास भापकर, ग्रामविस्तार अधिकारी, पाटस