शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

इंग्रजी माध्यमाची हजारो मुले मराठी शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:08 IST

चाकण : खेड तालुक्यात मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे. शाळांमधून भौतिक सुविधा, स्पर्धापरीक्षा, नावीन्यपूर्ण उपक्रम, ...

चाकण : खेड तालुक्यात मागील तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली आहे. शाळांमधून भौतिक सुविधा, स्पर्धापरीक्षा, नावीन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर यामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागले आहे. नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध व मंथन यांसारख्या स्पर्धापरीक्षांच्या कार्यशाळा, सराव परीक्षा व नियमित मार्गदर्शन मिळू लागल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील मुले मराठी शाळेत दाखल होऊ लागली आहेत. गेल्या तीन वर्षांत खेड तालुक्यात एकूण दोन हजार १५५ मुले इंग्रजी माध्यमातून पुन्हा मराठी माध्यमात दाखल झाली आहेत अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळांत क्रीडास्पर्धा व सांस्कृतिक स्पर्धा, विविध नावीन्यपूर्ण उपक्रम, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर तसेच मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती, विविध शासकीय योजनांचा लाभ, सायकली, दुपारचे भोजन व लेखन साहित्य विद्यार्थ्यांना मिळत असल्याने गरीब, होतकरू मुलांनाही शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे उच्चशिक्षित असून नावीन्यपूर्ण उपक्रम, जादा तास, स्पर्धापरीक्षांचा सराव, वैयक्तिक मार्गदर्शन, मातृभाषेतून अध्यापन व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे.

अभ्यासक्रमातील नवनवीन बदल व तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रशिक्षण, प्रोत्साहन, तसेच पुरेसे वेतन शिक्षकांना मिळत असल्याने ते प्रामाणिकपणे अध्यापनाचे काम करतात . मेडिकल, इंजीनियरिंग , कृषी व स्पर्धापरीक्षांचा विचार करता आजही मराठी माध्यमातील मुलांचा वरचष्मा दिसून येतो.

इंग्रजी माध्यमामुळे मुलांचे शिक्षण इंग्रजीतून आणि घरातील संभाषण मराठीतून होत असे, यामुळे मुलांना व्यवस्थित आकलन होत नव्हते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना चांगले आकलन होते. हसत-खेळत शिक्षणामुळे बालपण अनुभवायला मिळते. विविध उपक्रमातून त्यांचा सर्वांगीण विकास होतो . हे आता पालकांना पटू लागले आहे.

मनोहर मोहरे (उपक्रमशील शिक्षक - पठारवाडी )

प्राथमिक शाळांतील बहुतांश शिक्षक हे उच्चशिक्षित असून तंत्रज्ञानातही त्यांचा हातखंडा आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये डिजिटल क्रांती घडून आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा समतोल विकास साधला जात आहे.

मच्छिंद्र शेटे ( तंत्रस्नेही शिक्षक - वराळे )