शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या होतात हत्या

By admin | Updated: October 2, 2015 00:50 IST

‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही

पुणे : ‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही. तसे होत नाही म्हणूनच आजही परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या गोळ्या झाडून हत्या केल्या जातात,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरवादी विचारवंत राजा ढाले यांनी केले. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी ढाले यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जयदेव गायकवाड, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. विलास आढाव, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, अरविंद शिंदे, बंडू केमसे, राजेंद्र वागस्कर, वासंती गायकवाड आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.‘पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाते, माझ्यासारख्याला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थ पुणे सभ्य झाले आहे, असा घ्यायला हरकत नाही,’ अशा शब्दांत जुन्या पुण्याचे स्मरण करीत ढाले म्हणाले, ‘‘सगळा संघर्ष माणूस होण्याचा आहे. फुले, आंबेडकरांनी तो सुरू केला. त्यांच्यातून माझ्यासारखे अनेक जण तयार झाले. विठ्ठल रामजी शिंदे यांनी इथेच डोंगराएवढे काम केले. महात्मा फुले यांच्या एका विद्यार्थिनीने निबंध लिहिला व अन्यायाला वाचा फोडली, याची दखल घेतली जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, संघर्ष संपलेला नाही. आजही प्रतिगामींची संख्याच जास्त व पुरोगामींची कमी आहे. ती वाढते आहे.’’सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)-१९७२मध्ये ढाले यांच्या एका लेखाच्या विरोधात पुणे महापालिकेने तहकुबी आणली होती व आज त्याच महापालिकेकडून त्यांना पुरस्कार दिला जातो आहे, अशी सुरुवात करून अजित पवार यांनी ‘पुणे बदलते आहे,’ असाच याचा अर्थ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे परिवर्तनाची लढाई गतिमान होत गेली. वंचित, उपेक्षित समाजाला बरोबर घेऊनच विकास केला पाहिजे. ढाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दाखवली. त्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली. आज आर्थिक आरक्षणाचा विचार मांडला जात आहे. मात्र, तो घटनाविरोधी विचार आहे. त्यामुळेच समाजाला आजही ढाले यांच्या नेतृत्वाची, मार्गदर्शनाची गरज आहे.’’