शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
5
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
6
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
7
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
8
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
9
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
10
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
11
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
12
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
13
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
14
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
15
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
16
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
17
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
18
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
19
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
20
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!

परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या होतात हत्या

By admin | Updated: October 2, 2015 00:50 IST

‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही

पुणे : ‘पुराणांमुळे माणसे गुलाम होतात. विद्यापीठांमधून महाभारत, ज्ञानेश्वर कसले शिकवता? समतेचा विचार करणाऱ्यांची संख्या वाढवणारे शिक्षण हवे, कमी करणारे नाही. तसे होत नाही म्हणूनच आजही परिवर्तनाचा विचार मांडणाऱ्यांच्या गोळ्या झाडून हत्या केल्या जातात,’ असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक, आंबेडकरवादी विचारवंत राजा ढाले यांनी केले. महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी ढाले यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार जयदेव गायकवाड, पुरस्कार निवड समितीचे सदस्य प्रा. विलास आढाव, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्विनी कदम, अरविंद शिंदे, बंडू केमसे, राजेंद्र वागस्कर, वासंती गायकवाड आदी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.‘पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाते, माझ्यासारख्याला पुरस्कार दिला जातो, याचा अर्थ पुणे सभ्य झाले आहे, असा घ्यायला हरकत नाही,’ अशा शब्दांत जुन्या पुण्याचे स्मरण करीत ढाले म्हणाले, ‘‘सगळा संघर्ष माणूस होण्याचा आहे. फुले, आंबेडकरांनी तो सुरू केला. त्यांच्यातून माझ्यासारखे अनेक जण तयार झाले. विठ्ठल रामजी शिंदे यांनी इथेच डोंगराएवढे काम केले. महात्मा फुले यांच्या एका विद्यार्थिनीने निबंध लिहिला व अन्यायाला वाचा फोडली, याची दखल घेतली जात आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, संघर्ष संपलेला नाही. आजही प्रतिगामींची संख्याच जास्त व पुरोगामींची कमी आहे. ती वाढते आहे.’’सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)-१९७२मध्ये ढाले यांच्या एका लेखाच्या विरोधात पुणे महापालिकेने तहकुबी आणली होती व आज त्याच महापालिकेकडून त्यांना पुरस्कार दिला जातो आहे, अशी सुरुवात करून अजित पवार यांनी ‘पुणे बदलते आहे,’ असाच याचा अर्थ असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे. महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या नेत्यांमुळे परिवर्तनाची लढाई गतिमान होत गेली. वंचित, उपेक्षित समाजाला बरोबर घेऊनच विकास केला पाहिजे. ढाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दाखवली. त्यांनी समाजाला नवी दृष्टी दिली. आज आर्थिक आरक्षणाचा विचार मांडला जात आहे. मात्र, तो घटनाविरोधी विचार आहे. त्यामुळेच समाजाला आजही ढाले यांच्या नेतृत्वाची, मार्गदर्शनाची गरज आहे.’’