शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तीस वर्षांत झाल्या तेरा पोटनिवडणुका

By admin | Updated: January 8, 2015 01:06 IST

महापालिकेची स्थापना झाल्यापासून शहरामध्ये आतापर्यंत पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यातील अनेक निवडणुका वेगवेगळ््या कारणासाठी गाजल्या आहेत.

पिंपरी : महापालिकेची स्थापना झाल्यापासून शहरामध्ये आतापर्यंत पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यातील अनेक निवडणुका वेगवेगळ््या कारणासाठी गाजल्या आहेत. १४ वी पोटनिवडणुक अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वार्ड क्र. ४३ अ मध्ये १८ जावेवारी २०१५ रोजी होत आहे. महापालिकेच्या निवडणुक विभागातून मिळालेल्या माहितीवरुन महापालिकेची स्थापना झाल्यानंतर १९८६ मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणुक झाली. त्यांतर ६ सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. तर १३ पोटनिवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये पदावर असताना नगरसेवकाचा मृत्यू तर जातीचा दाखला अवैध ठरणे, दोन नगरसेवकांच्या हत्या तर काही जणांनी राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणुका झाल्या आहेत. पहिली पोटनिवडणूकही १९८६ मध्येच झाली आहे. त्यानंतर अनेक पोटनिवडणूका झाल्या आहेत. कोणत्याही कारणास्तव पद सोडावे लागले तरी नियमानुसार ६ महिन्यांच्या आता पोटनिवडणुक घ्यावी लागते. त्यासाठी ही प्रभागापुरती आचारसंहिता असते. त्यामुळे निवडणुका रंगतदार होतात. कारण एकाच ठिकाणी निवडणुक असल्यामुळे संपूर्ण शहराचे लक्ष वा राजकीय व्यक्ती त्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे त्यामध्ये अधिकच रंगत असते. दोन नगरसेवक आमदार झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिली. आमदार झाल्यामुळे आपला उमेदवार निवडूण आणन्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकत पणाला लावली होती. तर त्यांच्या विरोधकांनीही त्यांचा उमेदवार पाडण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यामुळे त्या निवडणुका अतिशय रंगतदार व चर्चेच्या ठरल्या होत्या.शहरात आतापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये संबंधीत व्यक्तीचे राजकीय वारसदार विजयी झाले आहेत. किंवा सरासरी त्याच पक्षाच्या उमेदवाराचा वरचष्मा राहिलेला दिसून योतो. कारण निवडुन येणाऱ्या उमेदवाराचा त्या विभागात प्रभाव असतो. त्यामुळे त्यांनी ज्या व्यक्तीला पाठिंबा दिला तीच व्यक्ती साधारणपणे निवडून येते. मात्र, काही वेळा विरोधकही या निवडणुका जिंकलेले आहेत. निवडणुकीत खोटे जात प्रमाणपत्र जोडून अनेकवेळा मतदारांची फसवणूक केली जाते. हे समोर आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशामुळे पद सोडलेले असले तरी त्या व्यक्तीची राजकीय ताकत तिच असते. त्यांचाही पोटनिवडणुकीवर प्रभाव असतो. शहरातील विविध पोटनिवडणुकिमध्ये पक्षाचा विचार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा वरचष्मा राहिल्याचे दिसून येते. त्यामध्ये या पक्षाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. तर भाजप, शिवसेना, हे पक्ष शहरातील पोटनिवडणुकीमध्येही मागे पडले असल्याचे दिसून आले आहे. १९८६ मध्ये फकीरभाई पानसरे यांचे निधन झाल्यामुळे आझमभाई पानसरे येथून निवडूण आले. १९९७ मध्ये अनिल उर्फ बाळकृष्ण हेगडे यांची हत्या झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली. त्या ठिकाणी प्रतीक झुंबरे हे विजयी झाले होते. २००६ मध्ये अंकुश कोकणे यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली त्या ठिकाणी त्यांचा मुलागा संतोष कोकणे विजयी झाले आहेत. आमदार म्हणून निवडूण आल्यामुळे विलास लांडे २००५ मध्ये यांनी राजीनामा दिला. त्यावेळी महेश लांडगे निवडुन आले. गोस्वामी मोहन बाबूलाल यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग ३० मध्ये पोटनिवडणुक झाली. तेथे रामाधार धारीया निवडुण आले होते. श्रीरंग आप्पा बारणे यांनी २००९ मध्ये राजीनामा दिल्यामुळे पोटनिवडणुक झाली. शैलेजा धाडगे २००२ मध्ये मृत्यू झाल्यामुळे येथे पोटनिवडणुक झाली. तेथून स्मिता कुलकर्णी निवडुण आल्या. संजय काळे यांची १९९२ मध्ये हत्या झाल्यामुळे पोटनिवडणुक झाली. त्यावेळी तेथून काळे यांचे भाऊ राजेंद्र काळे निवडुण आले होते. भिकू वाघेरे पाटील महापौर असताना मृत्यू पावले. त्याच्या ठिकाणी त्यांचा मुलगा संजोग वाघेरे निवडुण आले. (प्रतिनिधी)जात प्रमाणपत्र अवैध४१९९७ मध्ये महापौर मधुकर पवळेयांचे निधन झाल्यामुळे निवडणुक झाली. त्यावेळी दत्ता पवळे निवडुण आले होते. अशोक कदम २००३ मध्ये जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली त्यावेळी इश्वर ठोंबरे हे विजयी झाले होते. सुजीत पाटील २००५ मध्ये जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली. त्यावेळी शरद बारहाते निवडुण आले. २०१२ मध्ये भोसरीतील सिमा फुगे यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे निवडणुक झाली. येथून श्रद्धा लांडे विजयी झाल्या आहेत.