शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:55 IST

शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. 

ठळक मुद्देहुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय किसान परिषद२६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची करण्यात येणार आखणी

पुणे : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने काही केले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. देशात शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. हुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला देशभरातील चौदा राज्यांमधील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांना घातक असलेली धोरणं बदलायला तयार नाही. त्यामुळे जनतेला एकत्र करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तिसऱ्या पर्यायाचा विचार पुढे आला आहे. जनआंदोलन उभे करुन जनमत एकत्र करावे लागणार आहे. देशपातळीवर २६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची आखणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला व्यथित करुन देशात बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी असा विकास केला जात आहे. मात्र, विकासाच्या खोट्या स्वप्नांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडत नाही. भाजपा, काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी शेती आणि शेतकऱ्याला ओझे समजूनच आजवरची वाटचाल केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जनता शहरात जाऊन मोलमजुरी करते. देशातील ८0 टक्के जनतेला गुलाम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का असा प्रश्नही करण्यात आला. शेतकऱ्यांनी संघटित होणे, संघर्ष करणे अपरिहार्य झाले असून त्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून आशा राहिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचे हिन दिन असे रंगवले जाणारे चित्र बदलले पाहिजे. आम्हाला या राजकीय पक्षांपेक्षाही नेमका पर्याय द्या अशी मागणीही संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. शेतकऱ्यांनी मुलांना अत्याधुनिक शिक्षणासोबतच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्यास शेतीचे चित्र पालटेल असा विश्वास व्यक्त झाला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार-खासदार बड्या उद्योजकांच्या आणि भांडवलदारांच्या मांडीला मांडी लावून बसतात. तेच शेतकऱ्यांचे नुकसान करतात. जेव्हा ते गावाकडे परत येतात तेव्हा हाच शेतकरी त्यांचे हार तुरे घालून सत्कार करतो. त्यांना हारतुरे घालणे बंद करुन थेट जाब विचारण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय केले याचा जाहीर जाब विचारुन नेमक्या कोणत्या योजना आणल्या याचे स्पष्टीकरण मागा असे मत हरियाणाहून आलेले समशेरसिंग दहिया यांनी व्यक्त केले.आजच्या सत्रांमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील,  ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखोले, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, किशोर ढमाले, गणेश जगताप, समशेरसिंग दहिया, योगेश दहिया, सतनामसिंग बेरु,चेगल रेड्डी, आर. व्हि. गिरी, शांताकुमार, लिलाधर राजपूत, कन्हैलाल सिहाग आणि दशरथ रेड्डी यांच्यासह विविध राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे