शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:55 IST

शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. 

ठळक मुद्देहुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय किसान परिषद२६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची करण्यात येणार आखणी

पुणे : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने काही केले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. देशात शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. हुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला देशभरातील चौदा राज्यांमधील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांना घातक असलेली धोरणं बदलायला तयार नाही. त्यामुळे जनतेला एकत्र करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तिसऱ्या पर्यायाचा विचार पुढे आला आहे. जनआंदोलन उभे करुन जनमत एकत्र करावे लागणार आहे. देशपातळीवर २६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची आखणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला व्यथित करुन देशात बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी असा विकास केला जात आहे. मात्र, विकासाच्या खोट्या स्वप्नांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडत नाही. भाजपा, काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी शेती आणि शेतकऱ्याला ओझे समजूनच आजवरची वाटचाल केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जनता शहरात जाऊन मोलमजुरी करते. देशातील ८0 टक्के जनतेला गुलाम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का असा प्रश्नही करण्यात आला. शेतकऱ्यांनी संघटित होणे, संघर्ष करणे अपरिहार्य झाले असून त्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून आशा राहिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचे हिन दिन असे रंगवले जाणारे चित्र बदलले पाहिजे. आम्हाला या राजकीय पक्षांपेक्षाही नेमका पर्याय द्या अशी मागणीही संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. शेतकऱ्यांनी मुलांना अत्याधुनिक शिक्षणासोबतच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्यास शेतीचे चित्र पालटेल असा विश्वास व्यक्त झाला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार-खासदार बड्या उद्योजकांच्या आणि भांडवलदारांच्या मांडीला मांडी लावून बसतात. तेच शेतकऱ्यांचे नुकसान करतात. जेव्हा ते गावाकडे परत येतात तेव्हा हाच शेतकरी त्यांचे हार तुरे घालून सत्कार करतो. त्यांना हारतुरे घालणे बंद करुन थेट जाब विचारण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय केले याचा जाहीर जाब विचारुन नेमक्या कोणत्या योजना आणल्या याचे स्पष्टीकरण मागा असे मत हरियाणाहून आलेले समशेरसिंग दहिया यांनी व्यक्त केले.आजच्या सत्रांमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील,  ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखोले, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, किशोर ढमाले, गणेश जगताप, समशेरसिंग दहिया, योगेश दहिया, सतनामसिंग बेरु,चेगल रेड्डी, आर. व्हि. गिरी, शांताकुमार, लिलाधर राजपूत, कन्हैलाल सिहाग आणि दशरथ रेड्डी यांच्यासह विविध राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे