शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शेतकरी उभारणार ‘तिसरा पर्याय’; पुण्यात राष्ट्रीय किसान परिषद, १४ राज्यांतील प्रतिनिधी सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:55 IST

शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. 

ठळक मुद्देहुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेतर्फे राष्ट्रीय किसान परिषद२६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची करण्यात येणार आखणी

पुणे : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने काही केले नाही. या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. देशात शेतकऱ्यांना वाली उरलेला नाही. शेतकरी आणि शेती जगविण्यासाठी देशातील विविध शेतकरी संघटनांची मोट बांधून  ‘तिसरा पर्याय’ उभा करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा सूर राष्ट्रीय किसान परिषदेमध्ये उमटला. हुतात्मा बाबू गेनू व शरद जोशी यांच्या स्मृतीनिमित्त शेतकरी संघटनेने राष्ट्रीय किसान परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेला देशभरातील चौदा राज्यांमधील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. या परिषदेचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा करण्यात आली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांना घातक असलेली धोरणं बदलायला तयार नाही. त्यामुळे जनतेला एकत्र करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तिसऱ्या पर्यायाचा विचार पुढे आला आहे. जनआंदोलन उभे करुन जनमत एकत्र करावे लागणार आहे. देशपातळीवर २६ जानेवारीपासून दर महिन्याला एक आंदोलन याप्रमाणे आंदोलनांची आखणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याला व्यथित करुन देशात बुलेट ट्रेन, स्मार्ट सिटी असा विकास केला जात आहे. मात्र, विकासाच्या खोट्या स्वप्नांव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या पदरी काहीही पडत नाही. भाजपा, काँग्रेस यांच्यासह विविध राजकीय पक्षांनी शेती आणि शेतकऱ्याला ओझे समजूनच आजवरची वाटचाल केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जनता शहरात जाऊन मोलमजुरी करते. देशातील ८0 टक्के जनतेला गुलाम ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत का असा प्रश्नही करण्यात आला. शेतकऱ्यांनी संघटित होणे, संघर्ष करणे अपरिहार्य झाले असून त्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही राजकीय पक्षाकडून आशा राहिलेल्या नाहीत. शेतकऱ्यांचे हिन दिन असे रंगवले जाणारे चित्र बदलले पाहिजे. आम्हाला या राजकीय पक्षांपेक्षाही नेमका पर्याय द्या अशी मागणीही संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. शेतकऱ्यांनी मुलांना अत्याधुनिक शिक्षणासोबतच शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान शिकविल्यास शेतीचे चित्र पालटेल असा विश्वास व्यक्त झाला. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आमदार-खासदार बड्या उद्योजकांच्या आणि भांडवलदारांच्या मांडीला मांडी लावून बसतात. तेच शेतकऱ्यांचे नुकसान करतात. जेव्हा ते गावाकडे परत येतात तेव्हा हाच शेतकरी त्यांचे हार तुरे घालून सत्कार करतो. त्यांना हारतुरे घालणे बंद करुन थेट जाब विचारण्याची आवश्यकता आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी काय केले याचा जाहीर जाब विचारुन नेमक्या कोणत्या योजना आणल्या याचे स्पष्टीकरण मागा असे मत हरियाणाहून आलेले समशेरसिंग दहिया यांनी व्यक्त केले.आजच्या सत्रांमध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, क्रांतिसिंह नाना पाटील,  ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखोले, शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रमुख दिनकर दाभाडे, किशोर ढमाले, गणेश जगताप, समशेरसिंग दहिया, योगेश दहिया, सतनामसिंग बेरु,चेगल रेड्डी, आर. व्हि. गिरी, शांताकुमार, लिलाधर राजपूत, कन्हैलाल सिहाग आणि दशरथ रेड्डी यांच्यासह विविध राज्यातील शेतकरी प्रतिनिधींनी मार्गदर्शन केले.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे