शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"नानासाहेबांचे विचार आचरणात आणा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:18 IST

‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता.

वारजे : ‘नानासाहेब धर्माधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हादेखील त्याचा ध्यास होता. त्यामुळे त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजेत. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.वनदेवी मंदिर कर्वेनगर ते शिंदेपूल शिवणे या मुख्य एनडीए रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पथ असे नामकरण करण्यात आले. या नामकरण फलकाचे उद््घाटन शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी झाले.या वेळी शरद पवार यांना पद्मविभूषण व तीर्थरूप डॉ. अप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा छत्रपती शिवाजीमहाराज यांची साडेतीन फुटांची प्रतिमा व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.गणपती माथा येथील एनडीएच्या मैदानात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे यांच्यासह धर्माधिकारी परिवारातील उमेश, सचिन, राहुल, अर्चना, स्वराली श्रेयस हे आणि शारवीय देशपांडे, सचिन दोडके, कुमार गोसावी, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता धनकवडे, संजय जगताप, सचिन बराटे काका चव्हाण व्यासपीठावर होते. सामान्य माणसांवर योग्य संस्कार, विचार देण्याचे काम व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी नानासाहेबांनी आयुष्यभर कष्ट केले. म्हणून त्यांचे नाव या रस्त्याला दिले आहे. बैठकीतील लोकांनी परिसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केले.>तुमच्याकडून शिस्त शिकण्याची गरज२० ते २५ हजारांचा जनसमुदाय असूनही कार्यक्रमात कुठेही रेटारेटी, गोंधळ झाला नाही. सर्व नागरिक भरउन्हात दुपारी दीडपर्यंत शांत बसले होते. याचे कौतुक करताना खासदार सुळे म्हणाल्या, की सदस्यांच्या शिस्तीची दाद देते. माझ्याकडे तुमच्यासारखी शिस्त नाही. निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा येथे राहून शिस्त शिकणार. समाजाला अध्यात्मची गरज आहे. धर्माधिकारी परिवार गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत आहे. एवढा मोठ्या संख्येने जनसमुदाय आल्यानतर सकाळी काही काळ येथील रस्ते व चौकात कोंडी होत होती. काही सदस्य तर सकाळी सात वाजताच मैदानात येऊन बसले होते. कार्यक्रमानंतरही स्वयंसेवकांनी केलेल्या योग्य नियोजनानंतर फारशी गडबड न होता नागरिक आपापल्या घरी परतले.>‘‘अशा बैठकांमुळे माणसा-माणसांमध्ये बंधुत्व, प्रेम वाढत आहे. माणसाच्या या शक्तीचा उपयोग समाजातील अन्य घटकांच्या उभारणीसाठी केला जावा. सामूहिक शक्तीच्या माध्यमातून देश बलशाली व बलदंड करण्याची गरज आहे. ही गरज नानासाहेब धर्माधिकारी यांनी मांडली. तो वारसा अप्पासाहेब व सचिन धर्माधिकारी जपत आहेत, असे पवार म्हणाले.अप्पा धर्माधिकारी म्हणाले, ‘‘चांगल्या विचारांची आज गरज आहे. मन स्वच्छ असले तरच सर्व स्वच्छ दिसेल. सध्या अनेक जण चंगळवादाकडे वळत आहे. त्यांच्यापर्यंत संतसाहित्याच्या माध्यमातून मानवता धर्माची शिकवण ही पोहोचविली पाहिजे. संशयामुळे माणूस भरकटतो. सध्या बहुतेक ठिकाणी होत असलेल्या समर्थ बैठकीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार