शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

...तर त्यांना हक्काचे घर मिळेल! प्रस्ताव तयार करण्याचे उपजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:36 IST

गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले.

नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील सरकारी जागेवरील निवासी पात्र अतिक्रमण शासनाच्या धोरणाप्रमाणे नियमित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश मंगळवारी उपजिल्हाधिकारी विजय देशमुख यांनी मंडल अधिकारी, तलाठी तसेच ग्रामसेवक यांना मंगळवारी दिले. याची अंमलबजावणी झाली, तर त्यांना हक्काचे घर मिळू शकेल.गुळुंचे गावातील सरकारी गायरान जागेवरील वडिलोपार्जित अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला त्यामुळे शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. येथील अतिक्रमण नियमित करून त्याची गाव नमुना १ इ रजिस्टरला नोंद घेण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शाखाध्यक्ष अक्षय प्रदीप निगडे, काँग्रेस पक्षाचे नीरा गटाचे उपाध्यक्ष नितीन निगडे तसेच उमाजी नाईक ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण व इतर सुमारे ५० जणांनी नुकताच प्रांत कार्यालयापुढे सत्याग्रह केला.या वेळी केलेल्या गांधीगिरीने खडबडून जागे होऊन प्रशासनाने मंगळवारी सासवड येथे बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी तहसीलदार सचिन गिरी, पंचायत समितीचे अधिकारी श्रीयुत मोरे, मंडल अधिकारी वीरकुमार गायकवाड, तलाठी श्रीकांत अलोनी यांसह महसूल व पंचायत समितीचे विविध अधिकारी, अक्षय निगडे, नितीन निगडे, संजय चव्हाण उपस्थित होते. या वेळी वरील आदेश देण्यात आले.या वेळी अक्षय निगडे म्हणाले, की राज्य शासनाने ४ एप्रिल २००२ रोजी १९९५पूर्वीची अतिक्रमणे नियमित करण्याचा, १४ मार्च २०१८ रोजी गावठाणांची हद्द २०० मीटरनी वाढविण्याचा, १६ फेब्रुवारी २०१८ रोजी १ जानेवारी २०११ पूर्वीचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याचा, ३ आॅगस्ट २०१८ रोजी घरकुलांना सरकारी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय काढला. अतिक्रमणांच्या नोंदी घेण्यासाठी नुकतेच अ‍ॅप विकसित केले आहे, तर मग केवळ कागदांवर खर्च करायचा म्हणून हे निर्णय काढले आहेत का? असा सवाल त्यांनी केला. प्रांत तसेच तहसीलदारांच्या आजच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे निगडे यांनी सांगितले.पात्र अतिक्रमणे नियमित करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरून कार्यवाही सुरू आहे. प्रस्ताव तयार करून योग्य धोरण ठरवून त्यावर कार्यवाही केली जाईल, असे पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी सांगितले.शासन निर्णयाप्रमाणे गावातील अतिक्रमणांचे प्रस्ताव ग्रामसेवकांनी तयार करावेत. त्यांना तलाठ्यांनी मदत करावी. १ इ ला नोंदी असणारे व नसणारे असे स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत. गुळुंचे गावातील अतिक्रमण विषयाला प्राधान्य दिले जाईल. शासनाच्या सर्व धोरणांचा विचार करून २१ आॅगस्ट रोजी पुन्हा बैठक आयोजित केली जाईल.- विजय देशमुख , उपजिल्हाधिकारीपुरंदर व दौंड या तालुक्यांतील अतिक्रमणांच्या विषयाला वाचा फुटली असून, त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील पात्र निवासी अतिक्रमणे नियमित होण्याचा मार्ग मोकळा झाल्यास अनेकांना त्यांच्या हक्कांचे घर मिळू शकेल. त्यामुळे प्रांत संजय असवले यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.

टॅग्स :Homeघरnewsबातम्या