शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:48 IST

हल्ल्याच्या दिवशी आम्ही त्याठिकाणी असतो तर आज दिसलो नसतो, केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो

अवसरी (पुणे) : जम्मु काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला असून या हल्ल्याचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात देशातील विविध राज्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातील ५७ पर्यटक केवळ चार ते पाच तासापूर्वी अगोदर घटनास्थळावरून निघाल्याने थोडक्यात बचावले आहेत. 

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शरद बँकेचे मुख्य व्यवस्थापक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, जुन्नर, शीरुर तालुक्यातील ५७ पर्यटक जम्मू-काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये ७ लहान मुले २८ पुरुष , २२ महिला असा एकुण ५७ जणांचा समावेश होता. सर्व पर्यटक दिनांक १३/४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी निघाले होते.  ते जम्मू तावी झेलम ट्रेनने गेले प्रथम श्रीनगर येथे मुक्काम करुन ट्युलिप गार्डन, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे केल्यानंतर सर्व पर्यटक दि. १९/४/२०२५ रोजी पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथील आरु व्हॅली, बेताब व्हॅली, आणि चंदनवारी येथील साईड सीन पाहून त्या दिवशी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते वैष्णोदेवी दर्शनास निघाले व ते निघाल्यानंतर चार ते पाच तासातच मागे दहशतवाद्यांनी हल्ला करत २८ हिंदू बांधवांचा जीव घेतला. 

जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेले पर्यटक हे आंबेगाव, जुन्नर, शिरूर, तालुका पुणे, नगर या भागातील नोकरदार व्यापारी शेतकरी वर्गातील २५ जोडपी ट्रीप साठी गेली होती. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी सर्व पर्यटक फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर काही वेळातच बातम्यांना त्या ठिकाणी हल्ला झाल्याचे समजले त्यानंतर कुटुंबियांनी फोन करून तुम्ही सुरक्षित आहे का? असे विचारले मात्र आम्ही सुरक्षित आहे हे सांगितल्यानंतर सर्व पर्यटकांचे कुटुंबीय यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गुरुवारी रात्री सर्व पर्यटक सुखरूपृत्या घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र  दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता कुठल्या क्षणी हल्ला होऊ शकत होता. आम्ही दिनांक १९ रोजी त्या ठिकाणी उपस्थित होतो.  हल्ल्याच्या दिवशी जर आम्ही तिकडं असतो तर आज इथं दिसलो नसतो. केवळ नशीब बलवत्तर व देवाची कृपा म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो असे शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरambegaonआंबेगावtourismपर्यटन