शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:48 IST

हल्ल्याच्या दिवशी आम्ही त्याठिकाणी असतो तर आज दिसलो नसतो, केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो

अवसरी (पुणे) : जम्मु काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला असून या हल्ल्याचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात देशातील विविध राज्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातील ५७ पर्यटक केवळ चार ते पाच तासापूर्वी अगोदर घटनास्थळावरून निघाल्याने थोडक्यात बचावले आहेत. 

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शरद बँकेचे मुख्य व्यवस्थापक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, जुन्नर, शीरुर तालुक्यातील ५७ पर्यटक जम्मू-काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये ७ लहान मुले २८ पुरुष , २२ महिला असा एकुण ५७ जणांचा समावेश होता. सर्व पर्यटक दिनांक १३/४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी निघाले होते.  ते जम्मू तावी झेलम ट्रेनने गेले प्रथम श्रीनगर येथे मुक्काम करुन ट्युलिप गार्डन, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे केल्यानंतर सर्व पर्यटक दि. १९/४/२०२५ रोजी पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथील आरु व्हॅली, बेताब व्हॅली, आणि चंदनवारी येथील साईड सीन पाहून त्या दिवशी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते वैष्णोदेवी दर्शनास निघाले व ते निघाल्यानंतर चार ते पाच तासातच मागे दहशतवाद्यांनी हल्ला करत २८ हिंदू बांधवांचा जीव घेतला. 

जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेले पर्यटक हे आंबेगाव, जुन्नर, शिरूर, तालुका पुणे, नगर या भागातील नोकरदार व्यापारी शेतकरी वर्गातील २५ जोडपी ट्रीप साठी गेली होती. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी सर्व पर्यटक फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर काही वेळातच बातम्यांना त्या ठिकाणी हल्ला झाल्याचे समजले त्यानंतर कुटुंबियांनी फोन करून तुम्ही सुरक्षित आहे का? असे विचारले मात्र आम्ही सुरक्षित आहे हे सांगितल्यानंतर सर्व पर्यटकांचे कुटुंबीय यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गुरुवारी रात्री सर्व पर्यटक सुखरूपृत्या घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र  दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता कुठल्या क्षणी हल्ला होऊ शकत होता. आम्ही दिनांक १९ रोजी त्या ठिकाणी उपस्थित होतो.  हल्ल्याच्या दिवशी जर आम्ही तिकडं असतो तर आज इथं दिसलो नसतो. केवळ नशीब बलवत्तर व देवाची कृपा म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो असे शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरambegaonआंबेगावtourismपर्यटन