शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ते निघाले अन् ४ ते ५ तासात पहलगाममध्ये दहशवाद्यांचा हल्ला झाला; पुण्यातील ५७ पर्यटक बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:48 IST

हल्ल्याच्या दिवशी आम्ही त्याठिकाणी असतो तर आज दिसलो नसतो, केवळ नशीब बलवत्तर म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो

अवसरी (पुणे) : जम्मु काश्मीर येथील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण भारत देश हादरला असून या हल्ल्याचे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात देशातील विविध राज्यातील पर्यटकांचा मृत्यू झाला असून या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र या दहशतवादी हल्ल्यात आंबेगाव तालुक्यातील ५७ पर्यटक केवळ चार ते पाच तासापूर्वी अगोदर घटनास्थळावरून निघाल्याने थोडक्यात बचावले आहेत. 

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शरद बँकेचे मुख्य व्यवस्थापक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव, जुन्नर, शीरुर तालुक्यातील ५७ पर्यटक जम्मू-काश्मीर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. त्यामध्ये ७ लहान मुले २८ पुरुष , २२ महिला असा एकुण ५७ जणांचा समावेश होता. सर्व पर्यटक दिनांक १३/४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी निघाले होते.  ते जम्मू तावी झेलम ट्रेनने गेले प्रथम श्रीनगर येथे मुक्काम करुन ट्युलिप गार्डन, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे केल्यानंतर सर्व पर्यटक दि. १९/४/२०२५ रोजी पहेलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांनी तेथील आरु व्हॅली, बेताब व्हॅली, आणि चंदनवारी येथील साईड सीन पाहून त्या दिवशी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी ते वैष्णोदेवी दर्शनास निघाले व ते निघाल्यानंतर चार ते पाच तासातच मागे दहशतवाद्यांनी हल्ला करत २८ हिंदू बांधवांचा जीव घेतला. 

जम्मू काश्मीर येथे फिरण्यासाठी गेलेले पर्यटक हे आंबेगाव, जुन्नर, शिरूर, तालुका पुणे, नगर या भागातील नोकरदार व्यापारी शेतकरी वर्गातील २५ जोडपी ट्रीप साठी गेली होती. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झालेल्या ठिकाणी सर्व पर्यटक फिरण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणावरून निघाल्यानंतर काही वेळातच बातम्यांना त्या ठिकाणी हल्ला झाल्याचे समजले त्यानंतर कुटुंबियांनी फोन करून तुम्ही सुरक्षित आहे का? असे विचारले मात्र आम्ही सुरक्षित आहे हे सांगितल्यानंतर सर्व पर्यटकांचे कुटुंबीय यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गुरुवारी रात्री सर्व पर्यटक सुखरूपृत्या घरी आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. मात्र  दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा पूर्ण प्लॅनिंग केला होता कुठल्या क्षणी हल्ला होऊ शकत होता. आम्ही दिनांक १९ रोजी त्या ठिकाणी उपस्थित होतो.  हल्ल्याच्या दिवशी जर आम्ही तिकडं असतो तर आज इथं दिसलो नसतो. केवळ नशीब बलवत्तर व देवाची कृपा म्हणून आम्ही सुखरूप घरी आलो असे शरद बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक किसन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरambegaonआंबेगावtourismपर्यटन