शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
6
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
8
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
9
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
10
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
11
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
12
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
13
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
14
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
15
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
16
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
17
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
18
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
19
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
20
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे; सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 20:32 IST

रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल

नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. हा राज्य मार्ग रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुळे यांनी लेखी पत्र पाठवले असून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती केली आहे. महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा राज्य मार्ग १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ – पुणे बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग असून पुण्याहून कोकणला जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असा घोषित करून त्याचे काम पूर्णत्वास जाणे अत्यावश्यक आहे, असे खा.सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले असून नसरापूर येथील महामार्ग क्र. ४८ महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार आहे.

वेल्हे तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या बनेश्वर, अमृतेश्वर, किल्ले राजगड, तोरणा तसेच मढेघाट आदि वास्तू, किल्ले आणि देवस्थानांची येथे रेलचेल आहे. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. याबरोबरच वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी फारश्या उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल. यामुळे वेल्हे तालुक्याशी आजूबाजूच्या परिसराचा संपर्क वाढून या परिसरातील पर्यटनासही चालना मिळेल. याबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तरी कृपया महाड – रानवडी – कर्णवडी – मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्ग