शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाेटबंदीनंतरची तीन वर्षे मंदीचीच ; व्यावसायिकांच्या प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 20:37 IST

नाेटबंदीनंतरच्या तीन वर्षात व्यवासायिकांवर काय परिणाम झाला याचा घेतलेला आढावा.

पुणे : नाेटबंदीकरुन आज तीन वर्षे झाली. 8 नाेव्हेंबर 2016 राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी देशाला संबाेधित करत नाेटबंदीची घाेषणा केली हाेती. देशातील काळा पैसा बाहेर यावा, भ्रष्टाचार थांबावा आणि दहशतवाद्यांचे कंबरडे माेडावे यासाठी ही नाेटबंदी केल्याचे माेदी म्हणाले हाेते. अचानक करण्यात आलेल्या नाेटबंदीमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला हाेता. असंघटित क्षेत्राला या नाेटबंदीचा माेठा फटका बसला हाेता. नाेटबंदीच्या तीन वर्षपूर्तीनंतर व्यावसायिकांना काय वाटतं त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नाेटबंदीनंतरची तीन वर्षे ही मंदितच गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी व्यक्त केली. 

बॅगचे व्यावसायिक असलेले गजानन फडतरे म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवसायात माेठी घट झाली. तीन वर्षात ती सावरली नाही. नाेटबंदीच्या आधी व्यवसाय व्यवस्थित सुरु हाेता. नाेटबंदीनंतर जी मंदी आली ती अद्यापही सुरुच आहे. 50 टक्क्याहून अधिक व्यवसाय कमी झाला आहे. कॅशचे व्यवहार माेठ्याप्रमाणावर कमी झाले आहेत. तरुण विविध ऑनलाईन पद्धतीने पैसे देतात. परंतु त्याबद्दल फारशी माहिती नसल्याने ती अ‍ॅप वापरण्यात अडचणी येतात. 

कपड्यांचे व्यावसायिक कृपालसिंह हुडा म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवसाय हळूहळू कमी हाेत चालला आहे. लाेक विचार करुन खरेदी करत आहेत. नाेटबंदीनंतर आम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देखील सुरु केली. परंतु तरी देखील ग्राहकांची संख्या माेठ्याप्रमाणावर कमी झाली आहे. नाेटबंदीच्या आधीचे चित्र वेगळे हाेते. त्यावेळी व्यवासाय सुस्थितीत चालत हाेता. नवीन ऑनलाईन खरेदी वेबसाईटमुळे देखील माेठा ताेटा सहन करावा लागत आहे. नाेटबंदीनंतर अनेकांना आपली दुकाने बंद करावी लागली. 

नाेटबंदीनंतर कॅश व्यवहारावर माेठा परिणाम झाला. कॅश व्यवहार माेठ्याप्रमाणावर कमी झाला आहे. लाेक ऑनलाईन अ‍ॅप वापरुन अनेक ग्राहक पैसे देतात, परंतु ते बॅंकेच्या खात्यावर जात असल्याने आम्हाला दैनंदिन व्यवहारात त्याचा उपयाेग करता येत नाही. बॅकेच्या अकाऊंटवर पैसे दिसतात परंतु ते तात्काळ काढता येत नाहीत. नाेटबंदीनंतर व्यवासाय 70 ते 80 टक्क्यांनी कमी झाला. नाेटबंदीच्या आधी लाेक सर्व व्यवहार कॅशमध्ये करायचे. नाेटबंदीनंतर कॅश व्यवहारातून कमी झाल्याने आता अनेक अडचणी येत आहेत. सराकरने व्यवहारात चलन वाढवायला हवे. नाेटबंदीनंतर घरची आर्थिक घटी सुद्धा विस्कटली आहे. अशी प्रतिक्रीया कपड्याचे छाेटे दुकान असणाऱ्या राजेश यांनी व्यक्त केली. 

हमाल असलेले गजेंद्र साेनवणे म्हणाले, नाेटबंदीनंतर व्यवहारातून नाेटा बाद झाल्याने त्याचा व्यापाऱ्याच्या व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे आम्हाला काम मिळणे अवघड झाले. आधी सारखे चलन सहज उपलब्ध हाेत नाही. नाेटबंदीच्या आधी परिस्थिती चांगली हाेती परंतु नाेटबंदीनंतर ती बिकट झाली आहे. अजूनही काम मिळणे अवघड जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेNote BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी