शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मार्च महिन्यातच इथे जाणवतेय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:03 IST

गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता.

ठळक मुद्देतालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार

जेजुरी : पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आज सोनोरी गावठाण व सात वाड्या, दिवे गावठाण आणि तेरा वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ११ हजार लोकसंख्या सध्या पाण्याची मागणी करीत आहे. तर सिंगापूर, उदाचीवाडी, गुरोळी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, राजुरी, बहिरवाडी, राख व वाड्या-वस्त्याही तहानलेल्या आहेत. याठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, दिवे या गावांना टँकर सुरू करण्यात आले होते. तर सोनोरी, मावडी, बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी, निळुंज, सोमुर्डी नायगाव, टेकवडी, झेंडेवाडी या गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल होते. त्या मानाने यंदा मागणी कमी आहे.    गेल्या वर्षी पावसाने उशिरा, पण दमदार हजेरी लावली होती. यातच पाणी फाऊंडेशन आणि शासनाच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारण झाल्याने अजूनही विहिरीतून पाणीसाठा राहिल्याने टंचाई कमी प्रमाणात जाणवत असली तरीही पुढील तीन-चार महिने पाणी पुरेल असे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळा ही अत्यंत कडक असून, तालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक आहे. इतरत्र गावोगावचे पाझर तलाव, लघू पाटबंधारे विभागाचे जलाशय आज कोरडे ठाणठणीत आहेत. अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोतही आटलेले असल्याने ग्रामपंचायतींसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नाझरे जलाशयात केवळ ४२ टक्केच (३४२ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा आहे. जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ १४२ दशलक्ष घनफूट (२४ टक्के) एवढाच उपलब्ध आहे. नाझरे जलाशयावरून सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना सुरू आहेत. पुढील चार महिने पाणी पुरवण्याचे नियोजन करावे लागणार आहे. येथून जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आयएसएमटी कंपनी, मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे, या योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पारगाव व २३ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना वीज बिल थकल्याने बंद आहे. भविष्यात या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असून, ही योजना ही लवकरात लवकर सुरू करावी लागणार आहे. तालुक्यातील गराडे केवळ १.९२ दशलक्ष घनफूट, पिलाणवाडी जलाशयात २७.७६ दशलक्ष घनफूट, वीरनाला ४०.१६. दशलक्ष घनफूट, घोरवडी २६.७८ दशलक्ष घनफूट, पिंगोरी १५.२७ दशलक्ष घनफूट, माहूर ३५.९८ दशलक्ष घनफूट असा पाणीसाठा आहे. या जलाशयावरून परिसरातील पाणी योजनांना पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरीही काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत. अनेक योजनांच्या दुरुस्त्या अनेक वर्षांपासून न झाल्याने योजनांवरील गावांनाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. काही योजनांची वीजबिले थकल्याने या योजनांतून पिण्याचे पाणी उचलता येत नाही.  इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागलेली आहे.  कऱ्हा नदीलगतच्या काही गावांना आज जरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली, तरी भविष्यात या ठिकाणीही टँकर सुरू करावे लागणार आहे. याशिवाय इतर गावातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणेPurandarपुरंदरWaterपाणी