शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

मार्च महिन्यातच इथे जाणवतेय पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 18:03 IST

गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता.

ठळक मुद्देतालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार

जेजुरी : पुरंदर तालुक्यात मार्च महिन्यातच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. आज सोनोरी गावठाण व सात वाड्या, दिवे गावठाण आणि तेरा वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ११ हजार लोकसंख्या सध्या पाण्याची मागणी करीत आहे. तर सिंगापूर, उदाचीवाडी, गुरोळी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, राजुरी, बहिरवाडी, राख व वाड्या-वस्त्याही तहानलेल्या आहेत. याठिकाणी पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे १६ हजार लोकसंख्येला ९ शासकीय टँकरद्वारे २८ फेऱ्या मारून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात होता. तालुक्यातील राख, वाल्हे, पिंपरी, एखतपूर, मुंजवडी साकुर्डे, जेजुरी ग्रामीण, बेलसर, दिवे या गावांना टँकर सुरू करण्यात आले होते. तर सोनोरी, मावडी, बहिरवाडी, नावळी, घेरा पुरंदर, कुंभारवळण, भोसलेवाडी, कर्नलवाडी, राजुरी, निळुंज, सोमुर्डी नायगाव, टेकवडी, झेंडेवाडी या गावांतील टँकरचे प्रस्ताव दाखल होते. त्या मानाने यंदा मागणी कमी आहे.    गेल्या वर्षी पावसाने उशिरा, पण दमदार हजेरी लावली होती. यातच पाणी फाऊंडेशन आणि शासनाच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारण झाल्याने अजूनही विहिरीतून पाणीसाठा राहिल्याने टंचाई कमी प्रमाणात जाणवत असली तरीही पुढील तीन-चार महिने पाणी पुरेल असे नियोजन करावे लागणार आहे. उन्हाळा ही अत्यंत कडक असून, तालुक्यातील केवळ सात जलाशयातच पाणीसाठा शिल्लक आहे. इतरत्र गावोगावचे पाझर तलाव, लघू पाटबंधारे विभागाचे जलाशय आज कोरडे ठाणठणीत आहेत. अनेक गावांतील पाणीपुरवठा योजनांचे जलस्रोतही आटलेले असल्याने ग्रामपंचायतींसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नाझरे जलाशयात केवळ ४२ टक्केच (३४२ दशलक्ष घनफूट) पाणीसाठा आहे. जलाशयात उपयुक्त पाणीसाठा केवळ १४२ दशलक्ष घनफूट (२४ टक्के) एवढाच उपलब्ध आहे. नाझरे जलाशयावरून सुमारे ५० गावांना पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक योजना सुरू आहेत. पुढील चार महिने पाणी पुरवण्याचे नियोजन करावे लागणार आहे. येथून जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आयएसएमटी कंपनी, मोरगाव व १६ गावे, नाझरे व पाच गावे, या योजनांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पारगाव व २३ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना वीज बिल थकल्याने बंद आहे. भविष्यात या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार असून, ही योजना ही लवकरात लवकर सुरू करावी लागणार आहे. तालुक्यातील गराडे केवळ १.९२ दशलक्ष घनफूट, पिलाणवाडी जलाशयात २७.७६ दशलक्ष घनफूट, वीरनाला ४०.१६. दशलक्ष घनफूट, घोरवडी २६.७८ दशलक्ष घनफूट, पिंगोरी १५.२७ दशलक्ष घनफूट, माहूर ३५.९८ दशलक्ष घनफूट असा पाणीसाठा आहे. या जलाशयावरून परिसरातील पाणी योजनांना पिण्याचे पाण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरीही काही गावांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत. अनेक योजनांच्या दुरुस्त्या अनेक वर्षांपासून न झाल्याने योजनांवरील गावांनाही पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागलेल्या आहेत. काही योजनांची वीजबिले थकल्याने या योजनांतून पिण्याचे पाणी उचलता येत नाही.  इतर गावांची पिण्याच्या पाण्याची तीव्रता दिवसेंदिवस तीव्र स्वरूपाची होऊ लागलेली आहे.  कऱ्हा नदीलगतच्या काही गावांना आज जरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नसली, तरी भविष्यात या ठिकाणीही टँकर सुरू करावे लागणार आहे. याशिवाय इतर गावातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे. पुढील तीन ते चार महिने टँकरने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. 

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणेPurandarपुरंदरWaterपाणी