शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

Supriya Sule: मुख्यमंत्री बदलण्याच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही; विरोधकांनी बोलत राहावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 12:42 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे

पुणे : कोविड काळात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीचं कौतुक परदेशात झाले. केंद्र सरकारनेही महाराष्ट्र सरकारचे कौतुक केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी करत असलेल्या कामाचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. असं असताना मुख्यमंत्री बदलण्याची जी काही मागणी होत आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागील अनेक दिवसांपासून सक्रिय नसल्यामुळे कार्यवाह मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या कुणाला तरी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी सातत्याने भाजपकडून करण्यात येते. त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुण्यातील वारजे परिसरात एका कार्यक्रमासाठी आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, विरोधकांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांनी बोलत राहावं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचं काम करत राहतील. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळात केलेल्या कामगिरीचं कौतूक परदेशात झालं आणि केंद्र सरकारनेही केलं आहे. त्यामुळे विरोधकांच्या या मागणीला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही. राज्यासमोर दुसरी अनेक महत्त्वाची कामं असून महाविकासआघाडीचे सर्व मंत्री या कामात व्यस्त आहेत.

उत्तर प्रदेशची जनता पुन्हा एकदा अखिलेश यादव यांना संधी देईल

उत्तर प्रदेशात ज्याप्रकारे लोकं भाजपमधून बाहेर पडत आहेत ते पाहता उत्तर प्रदेशात नवीन आणि चांगला बदल दिसून येतोय. गेल्या पाच वर्षात उत्तर प्रदेशात मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, मोठी पॉलिसी मेकिंग असं काही झालेलं दिसत नाही. घोषणा खूप झाल्या असतील परंतु प्रत्यक्षात मात्र यातले काही झालेलं दिसत नाही .अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांना मिळणारा प्रतिसाद पाहता उत्तर प्रदेश बदलाच्या दिशेने जात असल्याचे दिसून येत आहे. आम्ही सगळे अखिलेश यादव आणि जैन चौधरी यांच्याकडे खूप अपेक्षेने पाहात आहोत. अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यकाळ उत्तम राहिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशची जनता पुन्हा  एकदा या दोघांना सेवा करण्याची संधी देईल.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीCentral Governmentकेंद्र सरकार