शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

महिन्याला ५०० जण होताहेत नापास

By admin | Updated: January 6, 2015 00:34 IST

संकेतस्थळावर अर्ज करावा लागत असल्याने परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दर महिन्याला ५०० जण नापास होत आहेत.

पिंपरी : वाहनपरवाना काढण्यासाठी नागरिकांना संकेतस्थळावर अर्ज करुन वेळ घ्यावी लागते. संकेतस्थळावर अर्ज करावा लागत असल्याने परवाना देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत दर महिन्याला ५०० जण नापास होत आहेत. संकेतस्थळावरुन वेळ घेऊन परिक्षेसाठी ८ हजार ८८५ लोकांनी शिकाऊ परवाना काढण्याची परीक्षा दिली आहे. त्यामध्ये ६ हजार ७०२ जण पास झाले तर २ हजार १४३ जण नापास झाले आहेत. संकेतस्थळ सुरु झाल्यापासून नापास होण्याचे प्रमाण वाढले आहे. संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी लागत असल्यामुळे परीक्षा हॉलमध्ये काय होते,याचीही माहिती अद्यावत ठेवावी लागते. सुरुवातीला कार्यालयातून वाहन चालवण्याचा परवाना देण्यात येत होता. त्यामुळे दलालांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने परवाना सहज मिळत असे. ना परीक्षा देण्याचे काम ना गाडी चालवण्याचे त्यामध्ये सगळा गोंधळच होता. पैसे दिले तर कोणालाही सहज परवाना मिळत असे. परवाना मिळाला की गाडी चालवता येते असा समजही संबंधित करुन घेत व गाड्या चालवत त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आपल्या बरोबरच इतर नागरिकांचाही जीव धोक्यात घातला जात असे. त्यामुळे परवाना देतानाच त्यांना वाहन चालवता येते की नाही, रस्त्यावर असलेल्या खुणा, पाट्या याचे अर्थ त्यांना कळतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. व त्यामध्ये पास होणाऱ्या नागरिकांनाच शिकाऊ परवाना देण्यात येतो. तर नापास झालेल्या नागरिकांना परत परीक्षा द्यावी लागते. परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तीन महिने त्यांना शिकाऊ वाहन परवाना मिळतो. तीन महिन्यानंतर अधिकाऱ्यांसमोर गाडी चालवून दाखवावी लागते. त्या वेळी त्यांना वाहन चालवण्याचा पक्का परवाना देण्यात येतो. ज्या व्यक्तीला रस्त्यावरील नियम माहिती आहेत. ते सहज या परीक्षेत पास होतात. मात्र, ज्यांना याचा गंध नाही. त्यांना ही परीक्षा अत्यंत कठीण वाटते. परीक्षा हॉलमध्ये जाण्याआधी त्यांना एक पत्रक दिले जाते. रस्त्यावर पुढे धोक्याचे वळण आहे, चढ आहे, घाट आहे, असे अनेक फलक लावलेले दिसतात. ते फलक वाहनचालकाला समजावे. वाहन चालवताना कोणती कागतपत्रे जवळ असावीत, कोणत्या बाजूने वाहन चालवावे यावर यामध्ये प्रश्न विचारले जातात. परीक्षेत एकूण २० प्रश्न आहेत. त्यामध्ये १२ प्रश्नांची बरोबर उत्तरे देतील ते पास होतात. विभागामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि दलालांचा हस्तकक्षेप कमी करण्यासाठी व नागरिकांची कार्यालयात चकरा मारण्याचा त्रास वाचावा यासाठी विभागाने सप्टेंबर महिन्यात संकेतस्थळ सुरु केले. या संकेतस्थळावर नाव नोंदणी केली की त्यांना कार्यालयात येण्याची तारीख व वेळही मिळतो. त्यावेळेला ते हजर झाले की त्यांचा इतर त्रास वाचतो. कामही लवकर होत असल्यामुळे नागरिकांना समाधान मिळते. पूर्वी कार्यालयात गर्दी होत असे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत होता. चांगल्या प्रकारे काम होत नव्हते. गर्दी कमी करण्यासाठी तातडीने परीक्षा घेऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न होत होता. (प्रतिनिधी)संकेतस्थळावर अर्ज केला जात असल्यामुळे कार्यालयातील गर्दी कमी झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामकाजावरही ताण पडत होता. परवाना देण्याच्या कामामध्ये सुसूत्रता आण्यासाठी संकेतस्थळ सुरु केले आहे. त्यांचा चांगला फायदा नागरिकांना आणि प्रशासनालाही झाला आहे. - अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी४संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने अर्ज भरल्यानंतर त्यांना दिवस व वेळ ठरवून दिली जाते. त्या वेळी ते उपस्थित राहिले नाही. तर त्यांना सगळी प्रक्रिया परत करावी लागते. एखादी व्यक्ती नापास झाली तर त्यांना दुसऱ्या दिवशीही परीक्षा परत देता येत आहे, अशी व्यवस्था कार्यालयाने सुरु केली आहे. महिनापासनापासएकूण सप्टेंबर१३३४४९२१८२६आॅक्टोबर१६७६४३९२११५नोव्हेंबर२०७९५९९२६७८डिसेंबर१४८५५८२२०६७जानेवारी१२८३११५९