शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘ससून’ला नेले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:53 IST

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली

पुणे : सातारा रस्त्यावरील पंचमी बसथांब्यावर निगडीला जाणाऱ्या पीएमपीची वाट पाहत होते. ही बस थांब्यावर येऊनदेखील थांबली नाही. त्यामुळे पळत जाऊन मी बसमध्ये चढले. वाहकाला म्हणाले, ‘बस का थांबवली नाही? मी बसमध्ये येताना अपघात झाला असता तर..?’ यावर वाहक म्हणाला, ‘ते चालकाला सांगा आणि काही झाले असते, तर ससूनला नेले असते...’ हा अनुभव आहे एका महिला प्रवाशाचा. वेळ मंगळवारी सकाळी ११ ची आणि बसचा क्रमांक एमएच १२-सीटी ००६१ हा होता.पीएमपीचे चालक भरधाव बस चालवतात, अनेक थांब्यांवर ते गाडी न थांबवता पुढे नेतात, असे अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. परंतु, सध्या वाहक प्रवाशांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे प्रवाशांच्या म्हणण्यावरून दिसून येत आहे.तुकाराम मुेढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना सर्व सुरळीत चालले होते. नियम मोडणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे निमूटपणे कर्मचारी काम करायचे; परंतु मुंढे यांची बदली झाली आणि पीएमपीच्या कर्मचाºयांमधील उद्धटपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीएमपी वेळेवर येत नाहीत, तर अनेकठिकाणी दोन-दोन बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.पीएमपीचे चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने अनेकांना कामाला किंंवा शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. एका प्रवाशाला मंगळवारी सकाळी सातारा रस्त्याहून निगडीची बस पकडायची होती. त्यामुळे तो पंचमी येथील थांब्यावर बसची वाट पाहत होता. बस आली तेव्हा या प्रवाशाने चालकाला हात दाखविला; परंतु त्याने बस थांबवलीच नाही. तशीच पुढे दामटली. तेव्हा प्रवाशाने पळत जाऊन बस पकडली. बसमध्ये गेल्यानंतर वाहकाला ‘बस का थांबवली नाही? मला पळत पळत बसमध्ये यावे लागले, जर अपघात झाला असता, तर काय केले असते तुम्ही?’ असे प्रवासी म्हणाला. यावर वाहक म्हणाला, ‘ते तुम्ही चालकाला सांगा की, का बस थांबवली नाही आणि तुम्हाला काही झाले असते, तर ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले असते.’ वाहकाच्या या बोलण्यावर बसमधील इतर प्रवासीदेखील संतापले. ‘या वाहकांना आता कोण बोलणार? मुंढे गेल्यामुळे यांचा मुजोरपणा वाढतोय,’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.मुंढे गेल्यामुळे कर्मचाºयांमधील शिस्त शून्य झाली आहे. कसल्याही प्रकारचा आणि कोणाचाही त्यांना दरारा राहिलेला नाही. अधिकारी पूर्णत: मोकाट सुटले आहेत. काही वाहक बस चालवताना मोबाइलवर बोलतात. मोटार वाहन कायद्याप्रमाणे अशा चालकाचे लायसन्स रद्द केले पाहिजे. कुठलीही बस वेळेवर येत नाही. कोणावरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाहकांचा उद्धटपणा वाढला आहे. किंबहुना, प्रवासी मंचाच्या काही कार्यकर्त्यांकडून तक्रार केली असता, हेल्पलाईनला दमदाटी केली जाते. बसमध्ये प्रवासी सुरक्षितता राहिलेली नाही.- जुगल राठी, प्रवासी मंच

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल