शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

...तर ‘ससून’ला नेले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:53 IST

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली

पुणे : सातारा रस्त्यावरील पंचमी बसथांब्यावर निगडीला जाणाऱ्या पीएमपीची वाट पाहत होते. ही बस थांब्यावर येऊनदेखील थांबली नाही. त्यामुळे पळत जाऊन मी बसमध्ये चढले. वाहकाला म्हणाले, ‘बस का थांबवली नाही? मी बसमध्ये येताना अपघात झाला असता तर..?’ यावर वाहक म्हणाला, ‘ते चालकाला सांगा आणि काही झाले असते, तर ससूनला नेले असते...’ हा अनुभव आहे एका महिला प्रवाशाचा. वेळ मंगळवारी सकाळी ११ ची आणि बसचा क्रमांक एमएच १२-सीटी ००६१ हा होता.पीएमपीचे चालक भरधाव बस चालवतात, अनेक थांब्यांवर ते गाडी न थांबवता पुढे नेतात, असे अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. परंतु, सध्या वाहक प्रवाशांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे प्रवाशांच्या म्हणण्यावरून दिसून येत आहे.तुकाराम मुेढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना सर्व सुरळीत चालले होते. नियम मोडणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे निमूटपणे कर्मचारी काम करायचे; परंतु मुंढे यांची बदली झाली आणि पीएमपीच्या कर्मचाºयांमधील उद्धटपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीएमपी वेळेवर येत नाहीत, तर अनेकठिकाणी दोन-दोन बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.पीएमपीचे चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने अनेकांना कामाला किंंवा शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. एका प्रवाशाला मंगळवारी सकाळी सातारा रस्त्याहून निगडीची बस पकडायची होती. त्यामुळे तो पंचमी येथील थांब्यावर बसची वाट पाहत होता. बस आली तेव्हा या प्रवाशाने चालकाला हात दाखविला; परंतु त्याने बस थांबवलीच नाही. तशीच पुढे दामटली. तेव्हा प्रवाशाने पळत जाऊन बस पकडली. बसमध्ये गेल्यानंतर वाहकाला ‘बस का थांबवली नाही? मला पळत पळत बसमध्ये यावे लागले, जर अपघात झाला असता, तर काय केले असते तुम्ही?’ असे प्रवासी म्हणाला. यावर वाहक म्हणाला, ‘ते तुम्ही चालकाला सांगा की, का बस थांबवली नाही आणि तुम्हाला काही झाले असते, तर ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले असते.’ वाहकाच्या या बोलण्यावर बसमधील इतर प्रवासीदेखील संतापले. ‘या वाहकांना आता कोण बोलणार? मुंढे गेल्यामुळे यांचा मुजोरपणा वाढतोय,’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.मुंढे गेल्यामुळे कर्मचाºयांमधील शिस्त शून्य झाली आहे. कसल्याही प्रकारचा आणि कोणाचाही त्यांना दरारा राहिलेला नाही. अधिकारी पूर्णत: मोकाट सुटले आहेत. काही वाहक बस चालवताना मोबाइलवर बोलतात. मोटार वाहन कायद्याप्रमाणे अशा चालकाचे लायसन्स रद्द केले पाहिजे. कुठलीही बस वेळेवर येत नाही. कोणावरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाहकांचा उद्धटपणा वाढला आहे. किंबहुना, प्रवासी मंचाच्या काही कार्यकर्त्यांकडून तक्रार केली असता, हेल्पलाईनला दमदाटी केली जाते. बसमध्ये प्रवासी सुरक्षितता राहिलेली नाही.- जुगल राठी, प्रवासी मंच

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल