शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

...तर ‘ससून’ला नेले असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 06:53 IST

पीएमपी वाहकाची अरेरावी; हात दाखवूनही बस नाही थांबली

पुणे : सातारा रस्त्यावरील पंचमी बसथांब्यावर निगडीला जाणाऱ्या पीएमपीची वाट पाहत होते. ही बस थांब्यावर येऊनदेखील थांबली नाही. त्यामुळे पळत जाऊन मी बसमध्ये चढले. वाहकाला म्हणाले, ‘बस का थांबवली नाही? मी बसमध्ये येताना अपघात झाला असता तर..?’ यावर वाहक म्हणाला, ‘ते चालकाला सांगा आणि काही झाले असते, तर ससूनला नेले असते...’ हा अनुभव आहे एका महिला प्रवाशाचा. वेळ मंगळवारी सकाळी ११ ची आणि बसचा क्रमांक एमएच १२-सीटी ००६१ हा होता.पीएमपीचे चालक भरधाव बस चालवतात, अनेक थांब्यांवर ते गाडी न थांबवता पुढे नेतात, असे अनुभव अनेकदा प्रवाशांना येतात. परंतु, सध्या वाहक प्रवाशांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत असल्याचे प्रवाशांच्या म्हणण्यावरून दिसून येत आहे.तुकाराम मुेढे हे पीएमपीचे अध्यक्ष असताना सर्व सुरळीत चालले होते. नियम मोडणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जात होती. त्यामुळे निमूटपणे कर्मचारी काम करायचे; परंतु मुंढे यांची बदली झाली आणि पीएमपीच्या कर्मचाºयांमधील उद्धटपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पीएमपी वेळेवर येत नाहीत, तर अनेकठिकाणी दोन-दोन बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे.पीएमपीचे चालक थांब्यावर बस थांबवत नसल्याने अनेकांना कामाला किंंवा शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. एका प्रवाशाला मंगळवारी सकाळी सातारा रस्त्याहून निगडीची बस पकडायची होती. त्यामुळे तो पंचमी येथील थांब्यावर बसची वाट पाहत होता. बस आली तेव्हा या प्रवाशाने चालकाला हात दाखविला; परंतु त्याने बस थांबवलीच नाही. तशीच पुढे दामटली. तेव्हा प्रवाशाने पळत जाऊन बस पकडली. बसमध्ये गेल्यानंतर वाहकाला ‘बस का थांबवली नाही? मला पळत पळत बसमध्ये यावे लागले, जर अपघात झाला असता, तर काय केले असते तुम्ही?’ असे प्रवासी म्हणाला. यावर वाहक म्हणाला, ‘ते तुम्ही चालकाला सांगा की, का बस थांबवली नाही आणि तुम्हाला काही झाले असते, तर ससून रुग्णालयात उपचारांसाठी नेले असते.’ वाहकाच्या या बोलण्यावर बसमधील इतर प्रवासीदेखील संतापले. ‘या वाहकांना आता कोण बोलणार? मुंढे गेल्यामुळे यांचा मुजोरपणा वाढतोय,’ अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.मुंढे गेल्यामुळे कर्मचाºयांमधील शिस्त शून्य झाली आहे. कसल्याही प्रकारचा आणि कोणाचाही त्यांना दरारा राहिलेला नाही. अधिकारी पूर्णत: मोकाट सुटले आहेत. काही वाहक बस चालवताना मोबाइलवर बोलतात. मोटार वाहन कायद्याप्रमाणे अशा चालकाचे लायसन्स रद्द केले पाहिजे. कुठलीही बस वेळेवर येत नाही. कोणावरही कोणाचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाहकांचा उद्धटपणा वाढला आहे. किंबहुना, प्रवासी मंचाच्या काही कार्यकर्त्यांकडून तक्रार केली असता, हेल्पलाईनला दमदाटी केली जाते. बसमध्ये प्रवासी सुरक्षितता राहिलेली नाही.- जुगल राठी, प्रवासी मंच

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएल