शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड बंद करावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 04:07 IST

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट

- श्रीकिशन काळे पुणे : राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट बनली असून, येत्या वर्षभरात ही स्थिती सावरली नाही, तर बोर्डाचे कार्यालयाच बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या वर्षासाठी आर्थिक उत्पन्नासाठी आणि बोर्ड चालविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. बोर्डाचे सीईओ डी. एन. यादव यांनी ही स्थिती सांगितली असून, बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार यांनी मात्र बोर्डानेच ही स्थिती ओढावली असून, त्यासाठी त्यांनीच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची सूचना संबंधितांना केली.पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. बोर्डाचा निधी मिळविण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयात खेटे मारावे लागत असल्याने बोर्ड प्रशासन आणि सदस्य परेशान झाले आहेत. सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर, बोर्डाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले; तसेच संरक्षण मंत्रालयाकडून येणारा निधीदेखील अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे थकबाकी कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. परिणामी, बोर्ड डबघाईला आले असून, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. बोर्डाच्या या सर्व स्थितीवर सीईओ यादव आता देशभरातील सर्व कॅँटोन्मेंट बोर्डांना एकत्र करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुमारे २५ कॅँटोन्मेंट बोर्ड सोबत येतील, अशी आशा यादव यांना आहे.बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार यांनी मात्र बोर्डावर ठपका ठेवून तुम्ही कोणाकडून निधीची अपेक्षा न ठेवता उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर भर द्यावा आणि इतर खर्च कमी करावा, अशी सूचना केली. जर खिशात पैैसे नसतील, तर खर्च करायचा विचारही करू नये, असा टोलाही लगावला.३६ कोटी रुपयांची तूट कशी भरून काढणार?येत्या वर्षात बोर्डाचा खर्च ९४. ३८ कोटी रुपये प्रस्तावित आहे. परंतु, येणारे उत्पन्न हे केवळ ५८.३५ कोटी रुपये आहे. त्यामुळे ३६ कोटी रुपयांची तूट कोठून भरायची, असा प्रश्न बोर्डासमोर उभा ठाकला आहे.सध्या बोर्डाकडे कॅशबुकमध्ये ४.३६ कोटी रुपये असून, फिक्स डिपॉझिटमध्ये २८ कोटी रुपये आहेत. जर केंद्र, राज्याकडून निधी आला नाही, तर बोर्डाला फिक्स डिपॉझिट तोडावे लागण्याची शक्यता आहे....तर बोर्ड श्रीमंत होईलकेंद्राला आणि राज्याच्या प्रतिनिधींना बोर्डाच्या सदस्यांनी वेळोवेळी भेटून निधी देण्याची मागणी केली आहे; परंतु त्यावर केवळ आश्वासनेच मिळत आहेत. यावर बोर्डाच्या सदस्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या वेळी दिला आहे. जर थकीत ७५० कोटींचा निधी बोर्डाला मिळाला, तर बोर्ड श्रीमंत होईल; परंतु केंद्र, राज्याकडून निधीच मिळेत नसल्याची खंत उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी यांनी व्यक्त केली.संरक्षण विभागाच्या सर्वांना पत्रबोर्डाचे सीईओ डी. एन. यादव म्हणाले, ‘‘बोर्डाकडे पैसेच नाहीत. त्यामुळे हे कार्यालयच बंद करायची परवानगी दिली पाहिजे. कारण, ते चालविण्यासाठी सरकार आणि संरक्षण मंत्रालय उपाययोजना करीत नाही. सध्याची स्थिती अशीच राहिली तर येत्या वर्षात बोर्ड बंद करावे लागेल. बोर्डाला निधी मिळावा, यासाठी संरक्षण विभागाच्या सर्व अधिकाºयांना मी पत्र पाठवून बोर्डाची स्थिती सांगितली आहे. परंतु, त्याला काहीही उत्तर मिळालेले नाही.’’ 

टॅग्स :pune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड