शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

...तर सरकारने राजीनामा द्यावा - डॉ. श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 06:11 IST

‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे.

पुणे : ‘मोदी सरकार आकाशातून पडलेले नाही, तर सामान्यांच्या जीवावर निवडून आले आहे. मराठी भाषेसाठी मोदींसमोर लोटांगण का घालावे लागते,’ असा सवाल करत ‘मराठीवरचा अन्याय म्हणजे शिवरायांचा, बाबासाहेबांचा, आगरकरांचा अन्याय आहे. ५६ इंची छातीसमोर उभे राहून ‘अभिजात’चा प्रश्न लावून धरण्याची हिमंत नसेल तर फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा,’ अशा शब्दांत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सरकारच्या उदासीनतेचा खरपूस समाचार घेतला.साहित्यवेध प्रतिष्ठान आणि कोहिनूर ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार व चित्रकार सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या ९१ संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बालगंधर्व कलादालन येथे डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. हरी नरके, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, चित्रकार सुरेश लोटलीकर, भारत देसडला, सचिन ईटकर, श्याम देशपांडे, बारामती अ‍ॅग्रोचे उपाध्यक्ष रोहित पवार, संयोजक कैलास भिंगारे यांच्यासह आदी उपस्थित होते.सबनीस म्हणाले, ‘उद्धव ठाकरे, राज ठाकरे अशा राजकारण्यांना मराठीचा पुळका असेल तर अभिजातच्या दर्जाबाबत ते गप्प का? शिक्षणमंत्री विनोद तावडे राज्यातील मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेताहेत, हा अतिशय क्रूर विनोद आहे. सरकारला कोंडीत पकडून संबंधितांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचे काम आपल्यालाच करायचे आहे. लोकचळवळ उभारून मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी लढा दिला पाहिजे. मराठी राजभाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारीला लाक्षणिक उपोषण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे.’लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘अभिजात भाषेचा लढा संयमाने आणि निग्रहाने लढायचा आहे. देशात भाषिक राजकारण सुरू आहे. इंग्रजी शाळा वाढत आहेत आणि मराठी शाळा ओस पडत आहेत. मराठी भाषा चिंध्या पांघरुन जीवनदान मागत आहे. अभिजात दर्जा मिळाल्यास मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, संशोधन केंद्र उभारणे शक्य होईल. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येत रेटा वाढवला पाहिजे. गावोगावी ग्रंथालयांची उभारणी केली पाहिजे. मराठी प्रशिक्षणाचा कायदा अस्तित्वात आणला पाहिजे.’कैलास भिंगारे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार आर. के लक्ष्मण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व इतर नामवंत व्यंग्यचित्रकारांच्या गाजलेली व्यंग्यचित्रेही या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. हे प्रदर्शन २ फ्रेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते ८ वाजेपर्यंत विनामूल्य खुले राहील.मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या निमित्ताने सारस्वतांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये. वैचारिक मतभेद बाजूला ठेवून भाषेच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन आपले ध्येय साध्य होणे, आवश्यक आहे. राजकारण्यांच्या अजेंड्यावर भाषा, साहित्य, संस्कृतीला प्राधान्य दिले जात नाही. त्याचप्रमाणे, विचारवंतांची कृतिशून्यताही समाजासाठी घातक असते. त्यामुळे अभिजातच्या प्रश्नासाठी कृतिशील होण्याची गरज आहे. - प्रा. मिलिंद जोशीमराठीचे राजकारण नव्हे, तर सर्वांनी मिळून मराठीसाठी राजकारण केले पाहिजे. अभिजात दर्जामुळे मराठी शाळा, मराठी शिक्षणाला प्रतिष्ठा येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून निधी उपलब्ध होईल. मराठी ज्ञानभाषा आहेच; तिला रोजगारक्षम करण्यासाठी अभिजात दर्जा मिळणे गरजेचे आहे. - प्रा. हरी नरके

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या