शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक पुसला जाणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:00 IST

वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला....

पिंपरी : आमच्या छातीवर पाचशे वर्षे असलेला कलंक आता पुसला जाणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यादिवशी देशाला नवीन ओळख मिळणार आहे. रामराज्य होणे हेच आपले स्वप्न आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते, तसेच रामराज्य तयार होईल. त्यातून वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारीदरम्यान ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. या शिबिराला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

अयोध्येमध्ये २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम आम्हा बहुजनांचा होता. तो मांसाहारी होता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत फडणवीस म्हणाले, “काही लोकांना देशात एवढा पवित्र कार्यक्रम होतोय याचेही दुःख होत आहे. कालच एक वाचाळवीर बोलला की, प्रभू राम मांसाहारी होते. असे बेताल वक्तव्य करून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले जाते. प्रभू श्रीराम देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्याबद्दल असे बोलणाऱ्या वाचाळवीरांना प्रभू रामच सद्बुद्धी देतील. सद्य:स्थितीत संपूर्ण देशातील वातावरण ‘राममय’ झाले आहे. अशा पवित्र काळात हे जनहिताचे कार्य आम्ही पुढे नेत राहू.”

वाढत्या प्रदूषणाने आजारांत वाढ : तानाजी सावंत

शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याहस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले, “हवा आणि जल प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. अशा गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी अशी शिबिरे व्हावीत.”

पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांची ऑनलाईन नोंद

शिबिरासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सोय आहे. पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांनी ऑनलाईन, तर ३० हजार रुग्णांनी ऑफलाईन नोंदणी केली. सायंकाळी पाचपर्यंत ६७ हजार नागरिकांची तपासणी झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड