शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक पुसला जाणार- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 13:00 IST

वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला....

पिंपरी : आमच्या छातीवर पाचशे वर्षे असलेला कलंक आता पुसला जाणार आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. यादिवशी देशाला नवीन ओळख मिळणार आहे. रामराज्य होणे हेच आपले स्वप्न आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेचे राज्य होते, तसेच रामराज्य तयार होईल. त्यातून वाचाळवीरांनाही प्रभू राम सद्बुद्धी देतील, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या पुढाकाराने तसेच महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि अटल चॅरिटेबल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ ते ७ जानेवारीदरम्यान ‘अटल विनामूल्य महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर करण्यात आले आहे. या शिबिराला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.

अयोध्येमध्ये २२ जानेवारीला श्रीराम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘श्रीराम आम्हा बहुजनांचा होता. तो मांसाहारी होता’, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबाबत फडणवीस म्हणाले, “काही लोकांना देशात एवढा पवित्र कार्यक्रम होतोय याचेही दुःख होत आहे. कालच एक वाचाळवीर बोलला की, प्रभू राम मांसाहारी होते. असे बेताल वक्तव्य करून नागरिकांच्या भावना दुखावण्याचे काम केले जाते. प्रभू श्रीराम देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्यांच्याबद्दल असे बोलणाऱ्या वाचाळवीरांना प्रभू रामच सद्बुद्धी देतील. सद्य:स्थितीत संपूर्ण देशातील वातावरण ‘राममय’ झाले आहे. अशा पवित्र काळात हे जनहिताचे कार्य आम्ही पुढे नेत राहू.”

वाढत्या प्रदूषणाने आजारांत वाढ : तानाजी सावंत

शिबिराचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याहस्ते झाले. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी सावंत म्हणाले, “हवा आणि जल प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे. अन्नधान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. अशा गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी अशी शिबिरे व्हावीत.”

पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांची ऑनलाईन नोंद

शिबिरासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची सोय आहे. पहिल्याच दिवशी दीड लाख रुग्णांनी ऑनलाईन, तर ३० हजार रुग्णांनी ऑफलाईन नोंदणी केली. सायंकाळी पाचपर्यंत ६७ हजार नागरिकांची तपासणी झाली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड